शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

वाहतूक पोलिसांची सुरक्षा रामभरोसे, महापालिकेसह शासनही उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 03:21 IST

ऊन, वारा, पाऊस यांची कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून रात्री अपरात्री काम करण्याची तयारी ठेवणारे वाहतूक पोलीस, मात्र कर्तव्य बजावीत असताना अनेक अडचणींना सामोरे जात आहेत.

रहाटणी : ऊन, वारा, पाऊस यांची कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून रात्री अपरात्री काम करण्याची तयारी ठेवणारे वाहतूक पोलीस, मात्र कर्तव्य बजावीत असताना अनेक अडचणींना सामोरे जात आहेत. जीव मुठीत धरून चौकात उभे रहावे लागत आहे. रोजच वाढती वाहतूक, अपुरे मनुष्यबळ, त्यात बारा तास काम, असे एक ना अनेक समस्या वाहतूक पोलिसांच्या दिसून येत आहेत. मायबाप सरकारला त्यांच्याकडे पहाण्यास वेळ नाही. आई जेवण देईना, बाप भिक मागू देईना, अशी परिस्थिती झाल्याने वाहतूक पोलिसांना होणारा त्रास सहन करावा लागत आहे.रहाटणी, काळेवाडी व पिंपळे सौदागर परिसरातील बीआरटीएस अंतर्गत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. त्यासाठी वाहतूक पोलिसांवर त्याचा काय परिणाम होईल याचा साधा विचारही महापालिका प्रशासनाने केला नसल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी खोदकाम करताना वाहतुकीच्या समस्येचा विचार करण्यात येत नाही. कोणत्याही मार्गाने वाहतूक वळविण्यात येते. वाहतुकीचे नियोजन करताना पोलिसांवर कोणत्या प्रकारचा ताण येणार याचा विचार होत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र वाहतूककोंडी झाली की, सर्व दोष वाहतूक पोलिसांना. खरे तर बीआरटीएस रस्त्यावरील अनेक चौक ५० ते ५५ मीटर पेक्षा जास्त रुंदीचे झाले आहेत. मुळात नियमानुसार रस्ता ३५ मीटर रुंदीचा असला पाहिजे. याला खऱ्या अर्थाने प्रशासनाकडून खो देण्यात आला आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून चौकांचे रुंदीकरण झाल्याने वाहतूक सुरळीत करताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे.पूर्वी वाहतूक पोलिसांना चौकात उभे राहाण्यासाठी स्वतंत्र निवाºयाची अर्थात कॅबिनची व्यवस्था असे. त्यामुळे थोडीतरी ऊन, वारा, पाऊस यापासून सुरक्षा होती. सध्या ते पण नाही. ऊन, वारा, पावसात उघड्या आभाळाखाली उभे राहून कर्तव्य बजवावे लागत आहे. रहाटणी येथील साई चौकाचे रुंदीकरण झाल्याने व चौकातील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने चौकाच्या चारही बाजूने उभे राहून वाहतूक नियमन करावे लागत आहे. पोलिसांना आपला जीव मुठीत धरून उन्हात उभे रहावे लागते, त्यांच्यासाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था दिसून येत नाही.वाहतूक पेलिसांना मानसिक ताणतणाववाहनांची संख्या वाढत आहे. त्यात प्रदूषणाची भर पडत आहे. या प्रदूषणापासून वाहतूक पोलिसांचा बचाव व्हावा म्हणून प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा उपाय केल्याचे दिसून येत नाही. वाहनावर जाताना प्रदूषणापासून बचाव व्हावा म्हणून अनेक जण तोंडाला मास्क, रुमाल बांदताना दिसतात़ मात्र वहातूक पोलीस दररोज दहातास प्रदूषणात उभा आसतो तरी शहारातील एकही जागरूक नागरिक, सामाजिक संघटना यावर आवाज उठवीत नाही किंवा संबंधित प्रशासन यावर ठोस उपाय करताना दिसून येत नसल्याने वाहतूक पोलिसांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. याला जबाबदार कोण हा खरा प्रश्न आहे.प्रदूषणामुळे आरोग्याला फटकाबहुतांश वाहतूक पोलीस वाढत्या प्रदूषणामुळे दमा, खोकला अशा आजारांनी बाधित आहेत. त्यांना प्रदूषणपासून बचावासाठी सरकार दरबारी कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली आहे. ऊन, वारा, पाऊस यापासूनही वाहतूक पोलिसांना बचाव होण्यासाठी चौकामध्ये योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.स्वच्छतागृह नसल्याने कुचंबणाशहरातील बहुतांश ठिकाणच्या चौकात स्वच्छतागृहसुद्धा नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. साई चौक, काळेवाडी फाटा, तापकीर चौक, शिवार चौक, कोकणे चौक अशा मोठ्या चौकांमध्ये स्वच्छातागृहांविना पोलिसांची कुचंबणा होत आहे. बहुतांशवेळा चौकाशेजारील एखाद्या दुकानाचा किंवा हॉटेलचा आधार त्यांना घ्यावा लागतो.राजकीय दबावाचा वापरवाहतूक पोलीस वाहतूक नियमन करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. मात्र बहुतांश वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. अशा बेशिस्त वाहनचालकांना दंड आकारताना वाहतूक पोलिसांवर राजकीय दबाव टाकण्यात येतो. त्यासाठी संबंधित बेशिस्त वाहनचालक राजकीय पदाधिकाºयांना फोन करून वाहतूक पोलिसांवर दबाव टाकतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांना मानसिक ताणतणावालाही सामोरे जावे लागते. विना परवाना वाहन चालविणे, नियमाचे उल्लंघन करणे आणि त्यासाठी दंड झालाच तर पोलिसांनाच बदनाम करण्याचे प्रकार बेशिस्त वाहनचालकांकडून होतात.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस