शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आठवडे बाजारामुळे वाहतूककोंडी

By admin | Updated: May 15, 2017 06:38 IST

येथील डांगे चौकात भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे दर रविवारी अक्षरश: वाहतूककोंडीचा

लोकमत न्यूज नेटवर्कथेरगाव : येथील डांगे चौकात भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे दर रविवारी अक्षरश: वाहतूककोंडीचा उच्चांक पहावयास मिळतो. दर रविवारी भरणाऱ्या बाजारामुळे होणाऱ्या कोंडीला वाहनचालक आणि नागरिक त्रस्त झाले आहे. डांगे चौक हा शहरातील महत्त्वाचा रस्ता असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिवसभर वाहनांची वर्दळ असते. औंध-रावेत आणि चिंचवड-हिंजवडी असा हा रोड मुंबई हायवे आणि हिंजवडी आयटी पार्कला जात असल्यामुळे या ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या वाहतूककोंडीला सर्वच प्रवासी वैतागले आहेत. हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून ‘जैसे थे’च आहे. काही दिवसांपूर्वी अतिक्रमण कारवाईच्या विरोधात व्यावसायिकांनी रास्ता रोको केले, तर अधिकाऱ्यांनीपुढच्या रविवारपासून येथे बसू नका, अशा सूचना केल्या. त्यानंतर काही आठवडे बाजार नसल्याने वाहतूक सुरळीत होती. मात्र पुन्हा आठवडे बाजार राजरोसपणे रस्त्यावरच भरत आहे. डांगे चौकातील चारही रस्त्यांना जणू अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. मंडईचे पुनर्वसन लवकरात लवकर करू असे आश्वासन दिले जाते; पण त्या दृष्टीने कोणीही ठोस असे पाऊल उचलताना दिसत नसल्याचे दृश्य दिसते आहे. या ठिकाणी आठवडे बाजाराला फक्त स्थानिक नागरिक येत नसून, आसपासच्या गावागावातून ट्रक, टेम्पो भरून नागरिक बाजार करण्यासाठी येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दीचे प्रमाण वाढते. व्यावसायिकांना योग्य प्रकारे मंडई उपलब्ध नसल्यामुळे पोट भरण्यासाठी रस्त्यावरच भाजीपाला विकावा लागतो व आपला उदरनिर्वाह करावा लागतो. जर लवकरात लवकर मंडईचे पुनर्वसन झाले, तर हा कोंडीचा प्रश्न मार्गी लागू शकतो. त्यामुळे मंडईचे पुनर्वसन होणार कधी, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.