शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
4
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
5
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
6
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
7
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
8
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
9
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
10
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
11
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
12
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
13
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
14
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
15
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
16
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
17
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
18
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
19
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
20
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय

आठवडे बाजारामुळे वाहतूककोंडी

By admin | Updated: May 15, 2017 06:38 IST

येथील डांगे चौकात भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे दर रविवारी अक्षरश: वाहतूककोंडीचा

लोकमत न्यूज नेटवर्कथेरगाव : येथील डांगे चौकात भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे दर रविवारी अक्षरश: वाहतूककोंडीचा उच्चांक पहावयास मिळतो. दर रविवारी भरणाऱ्या बाजारामुळे होणाऱ्या कोंडीला वाहनचालक आणि नागरिक त्रस्त झाले आहे. डांगे चौक हा शहरातील महत्त्वाचा रस्ता असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिवसभर वाहनांची वर्दळ असते. औंध-रावेत आणि चिंचवड-हिंजवडी असा हा रोड मुंबई हायवे आणि हिंजवडी आयटी पार्कला जात असल्यामुळे या ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या वाहतूककोंडीला सर्वच प्रवासी वैतागले आहेत. हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून ‘जैसे थे’च आहे. काही दिवसांपूर्वी अतिक्रमण कारवाईच्या विरोधात व्यावसायिकांनी रास्ता रोको केले, तर अधिकाऱ्यांनीपुढच्या रविवारपासून येथे बसू नका, अशा सूचना केल्या. त्यानंतर काही आठवडे बाजार नसल्याने वाहतूक सुरळीत होती. मात्र पुन्हा आठवडे बाजार राजरोसपणे रस्त्यावरच भरत आहे. डांगे चौकातील चारही रस्त्यांना जणू अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. मंडईचे पुनर्वसन लवकरात लवकर करू असे आश्वासन दिले जाते; पण त्या दृष्टीने कोणीही ठोस असे पाऊल उचलताना दिसत नसल्याचे दृश्य दिसते आहे. या ठिकाणी आठवडे बाजाराला फक्त स्थानिक नागरिक येत नसून, आसपासच्या गावागावातून ट्रक, टेम्पो भरून नागरिक बाजार करण्यासाठी येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दीचे प्रमाण वाढते. व्यावसायिकांना योग्य प्रकारे मंडई उपलब्ध नसल्यामुळे पोट भरण्यासाठी रस्त्यावरच भाजीपाला विकावा लागतो व आपला उदरनिर्वाह करावा लागतो. जर लवकरात लवकर मंडईचे पुनर्वसन झाले, तर हा कोंडीचा प्रश्न मार्गी लागू शकतो. त्यामुळे मंडईचे पुनर्वसन होणार कधी, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.