शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

वाहतुकीच्या नियमांची ऐशीतैशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 02:54 IST

मध्यवर्ती शहरात बेशिस्त; वाहतूककोंडीची ‘डोकेदुखी’, प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष, कारवाईकडे काणाडोळा

पिंपरी : महापालिकेचे रस्त्यावरील अनियमित फलक, दुतर्फा पार्किंग, अरुंद रस्त्यामुळे होणारी वाहतूककोंडी या सर्व समस्यामुळे वाहतुकीच्या नियमांचा खेळखंडोबा झाला आहे. शहरात येणारा सर्व पेठांचा भाग, मुख्य रस्ता, मध्यवर्ती भागात नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.पिंपरी कॅम्प आणि पिंपरी उड्डाणपुलावरच्या रस्त्यावर वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जात नाही. तर त्या भागातील बंद सिग्नल, खड्डे, फलके, पार्किंग अशा अनेक समस्या ‘लोकमत’ पाहणीतून दिसून आल्या आहेत.शहरातील अनेक वाहतुकीच्या समस्या दिसून येतात. मोरवाडी येथे नो-पार्किंग फलकांसमोर दुचाकी पार्किंग केली जाते. या चौकात नो-पार्किगचे फलक लावूनही दररोज दुतर्फा पार्किंग केले जाते. या फलकांसमोर दुचाकी वाहनांची पार्किंग असूनही त्याठिकाणी चार चाकी वाहने लावली जातात. पिंपरी कँम्पातील रस्त्यावर मोठे ट्रक माल उतरवण्यासाठी थांबतात. जवळपास एक-दीड तास ही वाहने तिथून हलत नाहीत. या रस्त्यावरून येणारी बस व इतर मोठ्या वाहनांना जाण्यास अडथळा निर्माण होतो.तसेच रस्त्यावर चारचाकी वाहने पार्क केली जातात. वाहनचालकांना गोष्टीचा खूप त्रास होतो. रस्ता ओलांडण्यास नागरिकांना सिग्नलची मदत होत असते. परंतु सिग्नल तोडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, व महिलांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. नियमांचे उल्लघंन करणाºया वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.अरुंद रस्त्यामुळे अडचणमेट्रोच्या कामामुळे मोरवाडी चौक ते पिंपरी चौक हा रस्ता अरुंद झाला आहे. या ठिकाणी दुतर्फा पार्किंग केली जाते. पोलीस नेहमी येऊन कारवाई करतात, वाहनांना जॅमर लावतात. पण काही उपयोग होत नाही. दिवसेंदिवस ही वाहतुकीची समस्या वाढत चालली आहे.पिंपरीहून निगडीकडे जाणाºया रस्त्यावर रिक्षाचालक रस्त्यात रिक्षा उभ्या करतात. बºयाच वेळा वाहतूक पोलीस या रिक्षात बसून असतात. त्यामुळे रिक्षाचालकांवर कारवाई कोण करणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.नो र्पाकिंगमध्ये केले जाते पार्किंगनिगडी प्राधिकरणातील पवळे चौकात खाद्यपदार्थच्या खूपच गाड्या दिसून येतात. येथे पीएमपीचा बसथांबा आहे. त्या ठिकाणी या गाड्या उभारण्यात आल्या आहेत. या चौकात चारही बाजूने वाहने वेगाने येतात. त्यामुळे विस्कळीत वाहन व्यवस्था दिसून येते. गुरुवारी येथील वाहतूक नियंत्रक दिवे बंद असतात. त्यामुळे या ठिकाणी अपघाताच्या घटना घडतात. येथील कोहिनूर आर्केडजवळ नो पार्किंगमध्ये वाहने उभी केली जातात. या ठिकाणी पोलिसांची कारवाई होते. पण नावापुरतीच असल्याने पुन्हा परिस्थिती जैसे-थे आहे.टिळक चौकात सिग्नलची गरजटिळक चौक ते भेळ चौक या रस्त्यावर पी १, पी २ अशी फलके लावूनही दुतर्फा पार्किंग केले जाते. तसेच या रस्त्यावर असणाºया हॉटेलसमोर चारचाकी वाहने पार्क केली जातात.त्यामुळे येथे वाहतूककोंडी निर्माण होते. तसेच मोती चौकात पाणीपुरी, वडापाव, डोसा, इडली चटणी अशा खाद्यपदार्थ गाड्या आहेत.यामुळे नागरिक या ठिकाणी खाद्यपदार्थाचा आस्वाद घेत असतात. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. मोती चौक हा मुख्य रस्त्यावर आहे. या चौकात सिग्नलची गरज असूनही सिग्नल नाही.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूकpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड