शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

वाहतुकीचे नियम तुडविले जातात पायदळी, बेशिस्त वाहनचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 03:50 IST

पादचाऱ्याला रस्त्यावरचा राजा समजले जाते. पादचा-याला प्रथम प्राधान्य दिले जाते. प्रत्यक्षात मात्र हा राजा रोजच जीव मुठीत धरून वावरताना दिसत आहे. डांगे चौकात पादचा-यांची कुचंबणा होत आहे. वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगवरच वाहने थांबवत असल्याने पादचा-यांनी चालायचे कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

थेरगाव - पादचाऱ्याला रस्त्यावरचा राजा समजले जाते. पादचा-याला प्रथम प्राधान्य दिले जाते. प्रत्यक्षात मात्र हा राजा रोजच जीव मुठीत धरून वावरताना दिसत आहे. डांगे चौकात पादचा-यांची कुचंबणा होत आहे. वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगवरच वाहने थांबवत असल्याने पादचा-यांनी चालायचे कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.डांगे चौकात वाहने झेब्रा क्रॉसिंगवर उभी केली जातात. त्यामुळे पादचाºयांना रस्ता ओलांडण्यात अनेक अडचणी येत आहेत. या गजबजीच्या रस्त्यांवर नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांकडून अनेकदा कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, त्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’च होते. या ठिकाणी वाहतूक पोलीसही केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत. डांगे चौकातील सिग्नलवर एका बाजूला झेब्रा क्रासिंगचे पट्टे पुसट झालेले आहेत. दुसºया एका बाजूला झेब्रा पट्टे दिसत नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे वाहने सर्रास झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे येऊन थांबतात. त्याचबरोबर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे दर तीन महिन्यांनी रंगवायला हवेत म्हणजे या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे स्पष्ट दिसतील. शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. दररोज नवीन वाहने रस्त्यावर दाखल होत आहेत. त्यामुळे वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. एकीकडे वाहनांची संख्या वाढत असताना पादचाºयांच्या सुरक्षेचा व त्यांच्या सोयी-सुविधांचा फारसा विचार होताना दिसत नाही.पादचाºयांना सुरक्षित रस्ता ओलांडता यावा, यासाठी लागणाºया विशिष्ट सिग्नलची संख्या शहरात बोटावर मोजण्या इतकीच आहे. त्यातही झेब्रा क्रॉसिंगच्या नियमाचे पालन करणाºयांची संख्या कमीच आहे. वाहनचालकांनी जरी झेब्रा क्रॉसिंगची शिस्त पाळणे अपेक्षित असले, तरी रस्ते व झेब्रा क्रॉसिंगची रचना निर्दोष असणे तितकेच गरजेचे आहे. प्रशासनाचे या सर्व बाबींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी अपघात झालेले आहेत.शहरात सर्वत्र रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. रस्ता सुरक्षा पंधरवडा राबविण्यात आला. त्यानिमित्त शहरात वाहतूक पोलिसांतर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले.वाहनचालकांना वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. हेल्मेट वापरणे, सीटबेल्ट लावणे, वाहन चालविताना मोबाईल फोनवर न बोलणे, ट्रीपल सीट न जाणे, झेब्रा क्रॉसिंग पट्ट्यांवर वाहन न थांबविणे, पादचाºयांना रस्ता देणे आदी सुरक्षा घेण्याबाबत जनजागृती करण्यात आली. असे असतानाही बहुतांश वाहनचालक याकडे दुर्लक्ष करून वाहतूक नियम पायदळी तुडवत आहेत.वाहतूक पोलिसांकडून केवळ दंड वसूल करण्यात येतो. मात्र नियमितपणे शिस्त लावण्याबाबत प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे दंड भरल्यानंतरही वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होते. केवळ रस्ता सुरक्षा पंधरवडा राबवून वाहनचालकांमध्ये जागृती होणार नाही, असे यावरून दिसून येते. त्यासाठी वाहतूक पोलिसांना नियमितपणे प्रयत्न करावे लागतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. दंड वसूल करण्याबरोबरच पादचाºयांच्या सुरक्षेलाही वाहतूक पोलिसांनी प्राधान्य दिले पाहिजे.महापालिका प्रशासन याबाबत उदासीन असल्याचे दिसून येते. चौकांचे रुंदीकरण केल्यानंतर वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून शास्त्रोक्त उपाययोजना करण्यात महापालिका प्रशासन कमी पडत आहे. वाहतूक पोलिसांवर जबाबदारी ढकलून देत महापालिकेचे अधिकारी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतात. परिणामी बेशिस्त वाहनचालकांचे फावते आणि सातत्याने वाहतूककोंडी होते. यातूनच अपघात होऊन हकनाक बळी जातात. अनेकजण जायबंदीही होतात.व्यावसायिकांचे अतिक्रमणडांगे चौकात रस्त्यावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. हातगाडीवाले, पथारीवाले यासह अन्य व्यावसायिकांनी रस्त्यावरव्यवसाय थाटल्याचे दिसून येते. काही दुकानदारांनी त्यांच्या दुकानातील विक्रीचे साहित्य दुकानाबाहेर मांडल्याचे दिसून येते.या दुकानांसमोर ग्राहक बेशिस्तपणे वाहने पार्क करतात. त्यामुळेयेथील वाहतूककोंडीत भर पडते. तसेच पादचाºयांना चालण्यासाठीहीरस्ता शिल्लक राहत नाही. यातून पादचाºयांची कुचंबणा होते.भर रस्त्यातून ये-जा करावी लागत असल्याने पादचाºयांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.वर्दळीचा चौकडांगे चौकात सातत्याने वर्दळ असते. हिंजवडी आणि वाकड कडून काळाखडकमार्गे या चौकात येणारी वाहने मोठ्या संख्येने आहेत. तसेच चिंचवडगावातून या चौकात येणारी वाहनेही मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे या वाहनांचा या चौकात सकाळी आणि सायंकाळी खोळंबा होतो. परिणामी सातत्याने वाहतूक कोंडी होते. यातून काही बेशिस्त वाहनचालक इतर वाहनचालकांना अरेरावी करतात. त्यामुळे वाहनचालकांमध्ये वादाचे प्रकार होतात.क्षमतेपेक्षा जास्त वाहने रस्त्यावररस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वाहने या चौकातील रस्त्यांवर असतात. त्यामुळे रुंदीकरण केल्यानंतरही वाहतुकीची समस्या कायम आहे. पीएमपीएमएल बस, रिक्षा, दुचाकीसह अवजड वाहनांचा यात समावेश आहे. कोणत्याही प्रकारची शिस्त नसल्यामुळे वाहतूक कोंडी होते. यातच बहुतांशवेळा पीएमपीएमएल बस भर रस्त्यात बंद पडण्याच्या घटना घडतात. त्यामुळे अधिक अडचण निर्माण होते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTrafficवाहतूक कोंडी