शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

बेशिस्तीमुळे वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 02:46 IST

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर निगडी ते दापोडी दरम्यान सर्रासपणे अवैध रिक्षा वाहतूक सुरू आहे. या रस्त्यादरम्यान येणाऱ्या प्रत्येक चौकात रिक्षाचालक बेशिस्तपणे उभे असतात.

रहाटणी : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर निगडी ते दापोडी दरम्यान सर्रासपणे अवैध रिक्षा वाहतूक सुरू आहे. या रस्त्यादरम्यान येणाऱ्या प्रत्येक चौकात रिक्षाचालक बेशिस्तपणे उभे असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. या रिक्षाचालकांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले; मात्र बेशिस्त रिक्षाचालकांमुळे अनेक चौकांना बकालपणाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक चौक म्हणजे पिंपरी-चिंचवड शहराचा मुख्य चौक समजाला जातो. मात्र याच चौकात सर्वांत जास्त रिक्षा बेशिस्तपणे उभ्या असल्याचे दिसून येते. या चौकातून मोरवाडी आणि चिंचवड स्टेशनकडे जाणाºया रस्त्यावर रिक्षा बेशिस्तपणे उभ्या केल्या जातात. या चौकातील सिग्नलजवळच या रिक्षा उभ्या असतात. त्यामुळे सिग्नल सुटल्यानंतर अन्य वाहनांचा या रिक्षांचा अडथळा होतो. बीआरटीएस मार्गिकेमुळे हा रस्ता अरुंद झाला आहे. असे असतानाही चौकात भर रस्त्यात रिक्षा उभ्या केल्या जातात. रस्त्याच्या दुसºया बाजूला पदपथाजवळ पथारीवाले, हातगाडीधारकांनी अतिक्रमण केले आहे. त्यांच्या पुढच्या बाजूला रिक्षाचालक थांबतात. त्यामुळे रस्ता आणखी अरुंद झाला आहे. महामार्गावर वाहनांची कायम वर्दळ असते. सिग्नल सुटल्यानंतर चौकातच रस्त्याच्या बाजूला नव्हे, तर रस्त्याच्या मधोमध रिक्षाचालक उभे असतात. त्यामुळे वाहतूककोंडी होते. मात्र याकडे वाहतूक पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येते.वाहतूक पोलिसांच्या भूमिकेबाबत साशंकतारस्त्यावरील वाहतूक व्यवस्थित आहे किंवा नाही, कोणी वाहतुकीचे नियम मोडत नाही ना, चौकात वाहतूककोंडी होणार नाही याच्यावर लक्ष ठेवणे यासह अनेक जबाबदाºया वाहतूक पोलिसांवर असतात. असे असतानाही पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि मोरवाडी चौकात पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसून येतात. बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. बेशिस्त रिक्षाचालकांना पाठीशी का घातले जात आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.अन्य वाहनचालकांना दंडचौकातील सिग्नलवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केले म्हणून चारचाकी, दुचाकी आणि अन्य वाहनचालकांना वाहतूक पोलिसांकडून दंड आकारण्यात येतो. ही कारवाई योग्य असली, तरी बेशिस्त रिक्षाचालकांना मात्र यातून सूट देण्यात येत असल्याचे दिसून येते. वाहतूककोंडी झाल्यास केवळ शिटी वाजवून रिक्षाचालकांना सूचित करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येत नाही किंवा कोणती कारवाईही होत नाही. यामागे नेमके काय गौडबंगाल आहे, असा प्रश्न अन्य वाहनचालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.मोरवाडी चौकातही रिक्षावाल्यांचा बेशिस्तपणा दिसून येतो. या चौकात रस्त्याच्या दुतर्फा हीच परिस्थिती आहे. प्रवाशांना आपल्या रिक्षात बसवण्यासाठी रिक्षाचालक नियम धाब्यावर टांगताना दिसत आहेत. एखाद्या प्रवाशाने हात दाखवल्यावर मागे-पुढे न पाहता रिक्षाचालक त्वरित रिक्षा बाजूला घेतो. यामुळे त्याच्या मागे असणाºया दुचाकीस्वारांना व इतर वाहनांना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे छोटे-मोठे अपघात रोजच घडत आहेत. डाव्या बाजूला वळण घेताना वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. महापालिकेने शहरात प्रशस्त रस्ते उभारले आहेत. मात्र असे असतानाही रिक्षाचालकांच्या बेशिस्तीमुळे वाहतुकीच्या समस्या कायम आहेत.