शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

सरकारकडून रॅन्ड सारखे अत्याचार

By admin | Updated: February 13, 2017 23:13 IST

सरकारकडून रॅन्ड सारखे अत्याचार

 पिंपरी :  लोक तुम्हाला घाबरतात; मग भयमुक्त सरकार कसले देणार? भ्रष्टाचार आणि काळा पैसा नोटाबंदीने काय साधले? तुमच्यासारख्या सामान्य माणसांकडे आहे का काळा पैसा? सामान्यांना वेठीस धरले. तासन्तास रांगेत उभे केले. देश चोरांचा आहे, असे भासवून सर्वांना कामाला लावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यात हवा गेली आहे. नोटाबंदीने दोनशेच्या वर बळी गेले. पुण्यात रँडने प्लेगचे कारण दाखवून घरात घुसून अत्याचार केले. तसेच अत्याचार आता सुरू आहेत. आम्ही हा हैदोस घालू देणार नाही, अशी घणाघाती टीका शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदी निर्णयाचा समाचार घेतला.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी आकुर्डीतील खंडोबामाळावरील सभेत ठाकरे बोलत होते. सुमारे ५० मिनिटांच्या भाषणात त्यांनी भारतीय जनता पक्षाचा फोलपणा जनतेसमोर उघडा केला. नोटाबंदी निर्णयाचे परिणाम, राज्य सरकारचा कारभार, मुख्यमंत्र्यांची गाजराची शेती, शेतकरी कर्जमाफी, भाजपात गुंडांना मिळणारे प्रोत्साहन, शरद पवार यांचे पद््मविभूषण यावर जोरदार टीका केली. 

भाजपाचे राष्टÑवादीकरण यावर टीका करताना ठाकरे म्हणाले, ‘‘मला लोक विचारतात, तुम्ही भाजपावर कशी काय टीका करता? राष्टÑवादी आणि काँग्रेसमधली अर्धी माणसे भाजपात गेली. ज्यांच्यावर आरोप करायचे त्यांच्यात काही दम राहिलेला नाही. म्हणून भाजपावर टीका करावी लागते. मध्यावधी निवडणुकांचे भाकीत केले आहे. भ्रष्टाचाराविरोधात बोलणाºया सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंना पद्भूषण आणि ज्यांच्यावर भाजपाने निवडणुकीपूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांना पद्विभूषण. कसा आहे हा कारभार? भ्रष्टाचाराचे आरोप करून निवडणुका जिंकल्या. आता निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी पुण्यात येऊन पवारांचे बोट धरून मी राजकारणात आलो, असे म्हणतात. पाहा हे गुरू-शिष्य. या एकाच नाण्याच्या नव्हे आता कॅशलेस व्यवहार होऊ लागल्याने एकाच कार्डच्या दोन बाजू आहेत. तुम्ही बोललेले विसराल. मात्र, लोक विसरणार नाहीत.’’

भाजपाचा सदस्य पाकिस्तानचा हेर

गुंडगिरीवर ठाकरे म्हणाले, ‘‘शिवसेनेत गुंड आहेत, असा आरोप भाजपा करते. माझ्या पक्षात गुंडापुडांना स्थान नाही. भाजपानेच इतर पक्षांतील गुंडांना स्थान दिले आहे. तमाम गुंड भाजपात जात आहेत, हे वास्तव आहे. आणि त्यांचे मंत्री वाल्ह्याचा वाल्मीकी असे समर्थन करीत आहेत. मध्यप्रदेशात भाजपाचा एक सदस्य पाकिस्तानचा हेर असल्याचे निष्पन्न झाले. मग पाहा कोण गुंडांना पोसतेय?’’ 

 

१) शेतकºयांना कर्जमुक्त करा, अशी शिवसेनेची मागणी आहे. शेतकºयांचे कर्ज माफ करीत असाल, तर आमचा तुम्हाला कायम पाठिंबा राहील.

२) चरखा म्हटल्यावर महात्मा गांधीजीच शोभून दिसतात. दोन वर्षांपूर्वीच हिंदुस्थान जन्माला आला आणि मोदींनी चरखा हाती घेतला, असे भासवीत आहेत. त्यांनी ना सत्याग्रह केला, ना फासावर गेले. चरख्यावरील गांधीजींचा फोटो काढला हे चुकीचे. भाजपा हा भ्रमाचा भोपळा आहे.

३) मोदींवर टीका का, असा प्रश्न विचारतात. मनपाच्या निवडणुकीत शहरभर मोदीचेच फ्लेक्स आहेत. विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीनंतर भाजपा मोदीशिवाय दुसरा चेहरा देऊ शकले नाहीत.

४) मिसकॉल दिला की भाजपाचा सदस्य. इंटरनॅशनल पक्ष आहे, आता परग्रहावरही सदस्य आहेत. निवडणूकांमध्ये भाजपा प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान आणि मुख् यमंत्री येतात. हे चुकीचे. एखाद्या पक्षाचा प्रचार कसा काय करू शकतात? हा खरा प्रश्न.

५) नोटाबंदीनंतर महिलांच्या बचतीकडे लक्ष देणार? असे भाजपाले म्हणाले. महिलांनी डब्यात काही बचत केली. हा काय चोरीचा, काळा पैसा आहे. कोणी जर डबे तपासायला आले तर डबे उघडून त्यात त्यांचे डोके बुडवा. रॅड सारखा अत्याचार सुरू आहे. याला स्वातंत्र्य म्हणायचे.

६) स्वतला कोणी देशाचे भाग्यविधाते समजत असेल तर ते चुकीचे आहे, हे मोहन भागवत यांची टीका मोदींना उद्देशून.

७) सर्जिकल स्टईक म्हणजे बागेला पाणी घालण्यासारखे आहे का? जवनांनी सर्जिकल स्टाईक केले शौर्य त्यांचे आणि फोटो काढून श्रेय घेतले भाजपाने. कोण गेले होते सर्जिकल स्टईक करायला. श्रेय घेता तसे अपश्रेय घ्या. 

८) पालकमंत्री गिरीश बापट खरे बोलले, देवेंद्र फडणीसांच्या काळांत ६५ हजार शेतकºयांना आत्महत्या केल्या. पारदर्शकतेची शपथ घेताना पालकमंत्री खरे बोलून गेले. 

९) हत्ती उधळायला लागला, सत्तांध झाला तर जनतेसाठी त्यांच्या डोक्यावर अंकुश मारायलाच हवा. 

१0) नितीमत्ता, विचारधारा असणारा भाजपाच्या व्यासपीठावर पूर्वी साधू-संत महंत असायचे आणि मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला गुंड पुंड बसतात. खंडण्या गोळा करून, खूनाचे गुन्हे असणाºयांना पक्षात घेऊन हे कसले भयमुक्त सरकार देणार. मंत्रालय गुंडालय करणार.