शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे रस्त्यांचे वाजले तीनतेरा

By admin | Updated: July 3, 2017 03:03 IST

शहरात काही दिवसांपासून सतत अधूनमधून सुरू असलेल्या पावसामुळे रहाटणी परिसरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्करहाटणी : शहरात काही दिवसांपासून सतत अधूनमधून सुरू असलेल्या पावसामुळे रहाटणी परिसरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असल्याने वाहनचालकासह नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, रहाटणी येथील महात्मा फुले कॉलनी व भालेराव कॉलनी या ठिकाणी रस्त्यात मोठ्या प्रमाणात चिखल व पाणी साचल्याने रहिवाशांना ये-जा करणे जिकिरीचे झाले आहे. रस्त्यावर खड्डे व पाणी की, पाण्यात रस्ते म्हणण्याची वेळ येथील रहिवाशांवर आली आहे. अनेक वेळा पालिका प्रशासनाचे संबंधित अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही त्याकडे अधिकारी काणाडोळा करीत असल्याची खंत येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. पावसाळा सुरू झाला की, दर वर्षी परिसरातील अनेक अंतर्गत व मुख्य रस्त्यावर लहान-मोठे खड्डे पडलेले असतात. अनेक ठिकाणचे खड्डे दिसून येत नाहीत. त्यामुळे लहान-मोठे अपघात होत आहेत. त्याचा वाहनचालकांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या रस्त्यावर खड्डे किरकोळ प्रमाणात आहेत. मात्र, भालेराव कॉलनीत पावसाळा सुरू झाला, त्या दिवसापासून रस्त्यावर पाणी साचलेले आहे. चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे. त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. या परिसरातील नागरिक नरकयातना भोगत असल्याची भावना व्यक्त करीत आहेत. स्वच्छ भारत संकल्पना अमलात आणणारे प्रशासन नागरिकांच्या आरोग्याकडे साधे लक्षही देत नसल्याची खंत येथील रहिवासी व्यक्त करीत आहेत. या कॉलनीत काही दिवसांपूर्वी रस्ता खोदून पाण्याची पाइपलाइन टाकण्यात आली. तसेच भूमी अंतर्गत विद्युतपुरवठा लाइन टाकण्यात आली; मात्र खोदलेली जमीन पुन्हा योग्य प्रकारे बुजविण्यात न आल्याने सध्या रस्त्यावर चिखल पसरला आहे. वेळीच जर यावर डांबर टाकले असते, तर आता एवढ्या मोठ्या प्रमाणात चिखल पसरला नसता व रस्त्यात पावसाच्या पाण्याचे डोह साचले नसते. या साचलेल्या पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी यांना या रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून रस्ता काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. मुरूम आला एक खड्डा बुजविला भालेराव कॉलनीत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले असून, काही ठिकाणी खड्डा पडला आहे, तर रस्त्यावर चिखल झाला असल्याचे येथील रहिवाशांनी पालिका अधिकारी यांच्याकडे व येथील लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मुरमाचा ट्रक आला. रहिवाशांना वाटले, रस्त्यावरच्या पाण्यापासून व चिखलापासून आपली सुटका झाली. मात्र, त्या ट्रकवाल्याने एक खड्डा बुजविला व निघून गेला. त्यामुळे रस्त्याची आहे तीच परिस्थिती आहे. साथींच्या आजाराची भीती एकीकडे पालिका म्हणते, नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवावा व दुसरीकडे नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करावे हा कुठला न्याय, असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. या कॉलनीत पावसाचे पाणी मागील काही दिवसांपासून साचले आहे. दुर्गंधी पसरली आहे, तरी पालिकेच्या संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी साधे फिरकले नसल्याची तक्रार येथील नागरिक करीत आहेत. पावसाळा सुरू असल्याने डेंगी, मलेरिया, साधा ताप यांसारख्या आजाराने नागरिक हैराण होतात, मग याचे काय असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे.