शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
2
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
3
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
4
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
5
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
6
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
7
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
8
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
9
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
10
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
11
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
12
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
13
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
14
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
15
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
16
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
17
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
18
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
19
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
20
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)

पावसामुळे रस्त्यांचे वाजले तीनतेरा

By admin | Updated: July 3, 2017 03:03 IST

शहरात काही दिवसांपासून सतत अधूनमधून सुरू असलेल्या पावसामुळे रहाटणी परिसरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्करहाटणी : शहरात काही दिवसांपासून सतत अधूनमधून सुरू असलेल्या पावसामुळे रहाटणी परिसरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असल्याने वाहनचालकासह नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, रहाटणी येथील महात्मा फुले कॉलनी व भालेराव कॉलनी या ठिकाणी रस्त्यात मोठ्या प्रमाणात चिखल व पाणी साचल्याने रहिवाशांना ये-जा करणे जिकिरीचे झाले आहे. रस्त्यावर खड्डे व पाणी की, पाण्यात रस्ते म्हणण्याची वेळ येथील रहिवाशांवर आली आहे. अनेक वेळा पालिका प्रशासनाचे संबंधित अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही त्याकडे अधिकारी काणाडोळा करीत असल्याची खंत येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. पावसाळा सुरू झाला की, दर वर्षी परिसरातील अनेक अंतर्गत व मुख्य रस्त्यावर लहान-मोठे खड्डे पडलेले असतात. अनेक ठिकाणचे खड्डे दिसून येत नाहीत. त्यामुळे लहान-मोठे अपघात होत आहेत. त्याचा वाहनचालकांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या रस्त्यावर खड्डे किरकोळ प्रमाणात आहेत. मात्र, भालेराव कॉलनीत पावसाळा सुरू झाला, त्या दिवसापासून रस्त्यावर पाणी साचलेले आहे. चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे. त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. या परिसरातील नागरिक नरकयातना भोगत असल्याची भावना व्यक्त करीत आहेत. स्वच्छ भारत संकल्पना अमलात आणणारे प्रशासन नागरिकांच्या आरोग्याकडे साधे लक्षही देत नसल्याची खंत येथील रहिवासी व्यक्त करीत आहेत. या कॉलनीत काही दिवसांपूर्वी रस्ता खोदून पाण्याची पाइपलाइन टाकण्यात आली. तसेच भूमी अंतर्गत विद्युतपुरवठा लाइन टाकण्यात आली; मात्र खोदलेली जमीन पुन्हा योग्य प्रकारे बुजविण्यात न आल्याने सध्या रस्त्यावर चिखल पसरला आहे. वेळीच जर यावर डांबर टाकले असते, तर आता एवढ्या मोठ्या प्रमाणात चिखल पसरला नसता व रस्त्यात पावसाच्या पाण्याचे डोह साचले नसते. या साचलेल्या पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी यांना या रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून रस्ता काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. मुरूम आला एक खड्डा बुजविला भालेराव कॉलनीत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले असून, काही ठिकाणी खड्डा पडला आहे, तर रस्त्यावर चिखल झाला असल्याचे येथील रहिवाशांनी पालिका अधिकारी यांच्याकडे व येथील लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मुरमाचा ट्रक आला. रहिवाशांना वाटले, रस्त्यावरच्या पाण्यापासून व चिखलापासून आपली सुटका झाली. मात्र, त्या ट्रकवाल्याने एक खड्डा बुजविला व निघून गेला. त्यामुळे रस्त्याची आहे तीच परिस्थिती आहे. साथींच्या आजाराची भीती एकीकडे पालिका म्हणते, नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवावा व दुसरीकडे नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करावे हा कुठला न्याय, असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. या कॉलनीत पावसाचे पाणी मागील काही दिवसांपासून साचले आहे. दुर्गंधी पसरली आहे, तरी पालिकेच्या संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी साधे फिरकले नसल्याची तक्रार येथील नागरिक करीत आहेत. पावसाळा सुरू असल्याने डेंगी, मलेरिया, साधा ताप यांसारख्या आजाराने नागरिक हैराण होतात, मग याचे काय असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे.