शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

विकासात योगदान हवे

By admin | Updated: July 3, 2017 03:11 IST

उद्योगपतींनी पुढे येऊन सीएसआरच्या माध्यमातून देशसेवा करावी व पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : उद्योगपतींनी पुढे येऊन सीएसआरच्या माध्यमातून देशसेवा करावी व पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सीएसआर बैठकीच्या वेळी ते बोलत होते. या वेळी महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर,मराठा चेंबर आॅफ कॉमर्स व अग्रीकल्चर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, अनंत सरदेशमुख, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, सह आयुक्त दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, रवींद्र दुधेकर, सहायक आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर, डॉ. महेशकुमार डोईफोडे, मिनीनाथ दंडवते, अण्णा बोदडे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, बजाज आॅटोचे एस. के. मुखर्जी, थायसन क्रुपचे आर.एस. नागेशकर, उपस्थित होते. जगताप म्हणाले, ‘‘भारत हा देश कृषिप्रधान देश आहे. शेतकऱ्यांकडून नागरिकांच्या सर्व गरजा पूर्ण होत असल्याने त्याला राजा समजले जायचे. आता औद्योगिक विकासामुळे व्यापार व उद्योग क्षेत्राला मोठे स्थान निर्माण झालेले आहे. त्यामुळे उद्योजकांनी समाजाच्या सामाजिक उपक्रमासाठी सीएसआरच्या माध्यमातून सहकार्य करावे.’’ सावळे म्हणाल्या, ‘‘महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावला पाहिजे. मुलांना इंग्रजी शिकविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. देशात मोठ्या प्रमाणात महिला ब्रेस्ट कॅन्सरच्या आजाराने पीडित आहेत. ब्रेस्ट कॅन्सरवरील औषधे महाग असल्याने गरीब कुटुंबांना ती परवडत नाहीत. या दोन्ही कामांसाठी सीएसआरच्या माध्यमातून सहकार्य करावे.’’ एकनाथ पवार म्हणाले, ‘‘शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी कंपन्यांनी पुढे यावे. नवे प्रकल्प राबविता येतील.महापौर काळजे म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पहिल्यांदाच सीएसआरबाबत अशा प्रकारच्या बैठकीचे आयोजन केले आहे. उद्योजकांनी सीएसआरमार्फत विविध कामे केली आहेत व काही सुरू आहेत. परंतु पिंपरी-चिंचवड शहरातील प्रकल्पांसाठी सहकार्याचा हात द्यावा, असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी या वेळी केले. हर्डीकर म्हणाले, ‘‘या शहरात मोठ्या प्रमाणात कारखानदारी अस्तित्वात असून, शहरातून तीन नद्या वाहत आहेत. या शहरात काम करण्यास भरपूर वाव आहे. येत्या पाच वर्षांत पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटी म्हणून नावारूपाला येईल. शहरामध्ये प्रभावीपणे स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. तसेच नागरिकांच्या समस्या त्वरित सोडविण्यासाठी सारथी हेल्पलाइन सुविधा २४ तास उपलब्ध आहे. या शहरातील सीएसआरच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योजकांनी पुढे यावे, असे आवाहनही या वेळी त्यांनी केले. महानगरपालिकेने सीएसआरसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना केली असून, लवकरच तो कार्यान्वयीत करण्यात येईल.’’