शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

शहरात तीन वर्षांत पीएमपीच्या ताफ्यात नाही एकही नवी बस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 01:58 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपी) मागील तीन वर्षांत एकही बस पीएमपीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेली नाही.

- शीतल मुंडे पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपी) मागील तीन वर्षांत एकही बस पीएमपीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेली नाही. त्यामुळे प्रवाशांना जुन्या आणि नादुरुस्त बसमध्ये प्रवास करावा लागत आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कुठल्याही रस्त्यावर किमान एकतरी बस बंद पडलेली दिसते. शिवाय पीएमपी ताफ्यात दर वर्षी व प्रत्येक महिन्याला बस स्क्रॅप होत आहे.पीएमपीच्या ताफ्यात २०१२ ते २०१४ या तीन वर्षांत एकही बस दाखल नाही. त्यानंतर २०१५ ते २०१७ या तीन वर्षांत केवळ बारा नव्या बस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. २०१८ मध्ये जुन्या झालेल्या आणि वैधता संपलेल्या १०२ बसेस स्क्रॅप करण्यात आल्या. यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील जुन्या बसचा भरणा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. याच बसचे बे्रकडाऊनचे प्रमाणदेखील अधिक आहे. रस्त्यावरील पीएमपी बस ब्रेकडाऊनची वाढती संख्या, खिळखिळ्या बस व धूर सोडून प्रदूषण वाढविणाऱ्या बस यामुळे प्रवाशांकडून बसबाबतच्या तक्रारींमध्ये वाढ झालेली आहे. पीएमपीच्या ताफ्यात जुन्या बसेसची संख्या वाढलेली आहे. १२ वर्षांपेक्षा जास्त वापर करण्यात आलेल्या एकूण १६५ बस आताच्या स्थितीला पीएमपीच्या ताफ्यात आहेत. ११ ते १२ वर्षे झालेल्या १९० बस आहेत. जुन्या बसमुळे तक्रारीमध्ये वाढ होत आहे. नवीन बस खरेदीबाबत पीएमपी प्रशासन उदासीन असल्याचे सातत्याने समोर आले आहे. याचा नाहक त्रास प्रवाशांना व नागरिकांना सहन करावा लागत आहे. रस्त्यावर बंद पडणाºया पीएमपी बस, ब्रेकडाऊन होण्याचे वाढलेले प्रमाण, बसमधून विचित्र आवाज येणे, बसमधून काळा धूर निघणे, बसला आग लागणे अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते.>पीएमपी ताफ्यामध्ये भंगार बसचे प्रमाण अधिक आहे. काही भंगार बसमुळे प्रदूषणात वाढ होते. पीएमपीच्या ताफ्यात २०१३ - १४ या आर्थिक वर्षात एकही बस पीएमपी प्रशासनाने खरेदी केलेली नाही. २०१४-१५ या आर्थिक वर्षातदेखील पीएमपी प्रशासनाने बस खरेदी केली नाही. २०१५-१६ या आर्थिक वर्षात पीएमपी ताफ्यात मात्र ११ बस दाखल झाल्या होत्या. त्यांनतर २०१८ च्या शेवटी २०० मीडी बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल झालेल्या आहेत. पीएमपी ताफ्यात नव्या बस नसल्याने जुन्या बसचा वापर सुरू आहे. - सुभाष गायकवाड,जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल>पीएमपीच्या बहुतांश बसची स्थिती अतिशय खराब आहे. एखाद्या बसमध्ये बसलो तरीदेखील आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे, तिथपर्यंत आपण पोहोचणार किंवा नाही, याची खात्री नसते. त्याचे कारणही तसेच आहे. पीएमपीची बस कुठेही बंद पडते. त्यानंतर दुसºया बस बदलत जावे लागते. यामुळे वेळदेखील जास्त जातो. एकतर एक-दोन तासानंतर बस येते एकतर बसला गर्दी जास्त असते. - मोहिनी पवार, प्रवासी