शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

शहरात तीन वर्षांत पीएमपीच्या ताफ्यात नाही एकही नवी बस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 01:58 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपी) मागील तीन वर्षांत एकही बस पीएमपीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेली नाही.

- शीतल मुंडे पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपी) मागील तीन वर्षांत एकही बस पीएमपीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेली नाही. त्यामुळे प्रवाशांना जुन्या आणि नादुरुस्त बसमध्ये प्रवास करावा लागत आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कुठल्याही रस्त्यावर किमान एकतरी बस बंद पडलेली दिसते. शिवाय पीएमपी ताफ्यात दर वर्षी व प्रत्येक महिन्याला बस स्क्रॅप होत आहे.पीएमपीच्या ताफ्यात २०१२ ते २०१४ या तीन वर्षांत एकही बस दाखल नाही. त्यानंतर २०१५ ते २०१७ या तीन वर्षांत केवळ बारा नव्या बस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. २०१८ मध्ये जुन्या झालेल्या आणि वैधता संपलेल्या १०२ बसेस स्क्रॅप करण्यात आल्या. यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील जुन्या बसचा भरणा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. याच बसचे बे्रकडाऊनचे प्रमाणदेखील अधिक आहे. रस्त्यावरील पीएमपी बस ब्रेकडाऊनची वाढती संख्या, खिळखिळ्या बस व धूर सोडून प्रदूषण वाढविणाऱ्या बस यामुळे प्रवाशांकडून बसबाबतच्या तक्रारींमध्ये वाढ झालेली आहे. पीएमपीच्या ताफ्यात जुन्या बसेसची संख्या वाढलेली आहे. १२ वर्षांपेक्षा जास्त वापर करण्यात आलेल्या एकूण १६५ बस आताच्या स्थितीला पीएमपीच्या ताफ्यात आहेत. ११ ते १२ वर्षे झालेल्या १९० बस आहेत. जुन्या बसमुळे तक्रारीमध्ये वाढ होत आहे. नवीन बस खरेदीबाबत पीएमपी प्रशासन उदासीन असल्याचे सातत्याने समोर आले आहे. याचा नाहक त्रास प्रवाशांना व नागरिकांना सहन करावा लागत आहे. रस्त्यावर बंद पडणाºया पीएमपी बस, ब्रेकडाऊन होण्याचे वाढलेले प्रमाण, बसमधून विचित्र आवाज येणे, बसमधून काळा धूर निघणे, बसला आग लागणे अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते.>पीएमपी ताफ्यामध्ये भंगार बसचे प्रमाण अधिक आहे. काही भंगार बसमुळे प्रदूषणात वाढ होते. पीएमपीच्या ताफ्यात २०१३ - १४ या आर्थिक वर्षात एकही बस पीएमपी प्रशासनाने खरेदी केलेली नाही. २०१४-१५ या आर्थिक वर्षातदेखील पीएमपी प्रशासनाने बस खरेदी केली नाही. २०१५-१६ या आर्थिक वर्षात पीएमपी ताफ्यात मात्र ११ बस दाखल झाल्या होत्या. त्यांनतर २०१८ च्या शेवटी २०० मीडी बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल झालेल्या आहेत. पीएमपी ताफ्यात नव्या बस नसल्याने जुन्या बसचा वापर सुरू आहे. - सुभाष गायकवाड,जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल>पीएमपीच्या बहुतांश बसची स्थिती अतिशय खराब आहे. एखाद्या बसमध्ये बसलो तरीदेखील आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे, तिथपर्यंत आपण पोहोचणार किंवा नाही, याची खात्री नसते. त्याचे कारणही तसेच आहे. पीएमपीची बस कुठेही बंद पडते. त्यानंतर दुसºया बस बदलत जावे लागते. यामुळे वेळदेखील जास्त जातो. एकतर एक-दोन तासानंतर बस येते एकतर बसला गर्दी जास्त असते. - मोहिनी पवार, प्रवासी