शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

...तर वाहने पेटवून देऊ; डेपो परिसरातील नगरसेवक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 03:26 IST

महापालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या कच-यातून वीजनिर्मिती अर्थात वेस्ट टू एनर्जीवरून गेल्या पंधरा दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू होते. सत्ताधारी नगरसेवकांनीही या प्रकल्पाबाबत साशंकता व्यक्त केली होती.

पिंपरी : महापालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या कच-यातून वीजनिर्मिती अर्थात वेस्ट टू एनर्जीवरून गेल्या पंधरा दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू होते. सत्ताधारी नगरसेवकांनीही या प्रकल्पाबाबत साशंकता व्यक्त केली होती. प्रशासनाने माहिती का दडवली असा प्रश्न उपस्थित केला. प्रकल्प मंजूर न केल्यास वाहने पेटवून देऊ, अशी भूमिका कचरा डेपो परिसरातील नगरसेवकांनी घेतली. साधक,बाधक चर्चा व प्रशासनाच्या सादरीकरणानंतर वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला.महापालिकेची सर्वसाधारण सभा आज झाली. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. दोन दिवसांपूर्वी विरोधकांप्रमाणेच भाजपाच्या नगरसेविका माया बारणे यांनी या प्रकल्पासंदर्भात प्रशासनास धारेवर धरले होते. त्यामुळे या प्रकल्पावर गोंधळ होण्याची चिन्हे होती.सुरुवातीला विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी हा प्रकल्प खरच गरजेचा आहे. पारदर्शक कारभार आहे, मग नगरसेवकांना याचे सादरीकरण का केले नाही, यामागे गौडबंगाल काय? निविदा ही २१ वर्षांसाठी का आहे? काळ्या यादीतील ठेकेदाराला काम कसे दिले, असे प्रश्न केले. त्यास सत्ताधारी पक्षाच्या समाविष्ट गावांतील महिला नगरसेवकांनी या प्रकल्पाचे जोरदार समर्थन केले. सत्ताधारी काही नगरसेवक आणि विरोधक विरोध करीत असल्याचे लक्षात येताच समाविष्ठ गावांतील महिला सदस्यांनी ‘विषय मंजूर केला नाही तरकचरा कोंडी करू, असा इशारा दिला. एकही गाडी कचरा डेपोत येऊ देणार नाही. वेळ पडल्यास गाड्या पेटवू, यास प्रशासन आणि विरोधक जबाबदार असतील.’’माजी महापौर मंगला कदम म्हणाल्या, ‘‘वेस्ट टू एनर्जी’चा विषय चांगला आहे. शहरातील कचºयाचा प्रश्न सुटण्यासाठी चांगले प्रकल्प होणे गरजेचे आहे. ‘वेस्ट टू एनर्जी’चा कोट्यवधी रुपयांचा विषय आहे. या विषयाची सर्व नगरसेवकांना माहिती देणे गरजेचे होते. या कामाच्या ठेकेदारांचा एकच पत्ता आहे. त्यामुळे संशयाला वाव आहे. विषयाची सर्वांना माहिती द्यावी, तोपर्यंत हा विषय तहकूब ठेवावा.’’चर्चेत मनसेचे गटनेते सचिन चिखले, विक्रांत लांडे, माया बारणे, हर्शल ढोरे, सुजाता पालांडे, उत्तम केंदळे, विकास डोळस, मीनल यादव, सुलक्षणा धर, डॉ. वैशाली घोडेकर, जावेद शेख, राहुल जाधव, निर्मला गायकवाड यांनी सहभाग घेतला.अखेरीस महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. त्यानंतर महापौरांनी प्रकल्पाला मंजुरी दिली.अजित गव्हाणे म्हणाले, ‘‘ठेकेदार ब्लॅक लिस्टमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. पालिका ब्लॅक लिस्ट कंपनीला जागा देणार आहे का? हा विषय महत्त्वाचा आहे. त्याला आमचा विरोध नाही. माहिती दिली पाहिजे.’’विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले, ‘‘चांगल्या आणि निवडक कामाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध नाही. प्रशासनाकडून काय उणिवा राहिल्या आहेत. त्या दुरुस्त केल्या पाहिजेत.’’ सोनाली गव्हाणे म्हणाल्या, ‘‘कचºयाचा प्रश्न सुटणार आहे. हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. परंतु, विरोधक त्याला विरोध का करत आहेत, हे समजत नाही.’’नाना काटे म्हणाले, ‘‘वेस्ट टू एनर्जीचे काम करणारा ठेकेदार चार ते पाच ठिकाणी ब्लॅक लिस्टमध्ये आहे.’’सुवर्णा बुर्डे म्हणाल्या, ‘‘प्रकल्पाला विरोधक विरोध करीत आहेत. हे चुकीचे आहे. विरोध केल्यास सोमवारपासून मोशीत आम्ही कचरा गाडी येऊ देणार नाही. पालिकेसमोर आंदोलन करू, रस्त्यावर उतरू, कचºयाच्या गाड्या पेटवून दिल्या जातील.’’शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे म्हणाले, ‘‘पालिकेचे पैसे या प्रकल्पासाठी कशासाठी टाकायचे. २१ वर्षांसाठी हे काम आपण का देणार आहोत.’’प्रमोद कुटे म्हणाले, ‘‘एवढा मोठा प्रकल्प असताना त्याची नगरसेवकांना माहिती का दिली नाही.’’सारिका बोºहाडे म्हणाल्या, ‘‘हा प्रकल्प झाल्यास कचºयाची समस्या सुटणार आहे. परंतु, एवढ्या चांगल्या प्रकल्पाला विरोधक विरोध करत आहेत. हे चुकीचे आहे.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड