शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

वृक्षतोडीने वाढले तापमान

By admin | Updated: April 10, 2017 02:34 IST

गेले अनेक दिवस शहर, जिल्ह्याच्या वातावरणामध्ये उष्णतेचे प्रमाण वाढत चालले आहे. पाच वर्षांपूर्वी

रावेत : गेले अनेक दिवस शहर, जिल्ह्याच्या वातावरणामध्ये उष्णतेचे प्रमाण वाढत चालले आहे. पाच वर्षांपूर्वी शहराचे तापमान मार्चअखेरीस ३५ अंशांच्या जवळपास स्थिर असायचे. परंतु वाढते शहरीकरण व वृक्षतोडीमुळे तापमानात वाढ होत असून, ही चिंताजनक बाब आहे. पिंपरी-चिंचवड शहर, पुणे शहर आणि आजूबाजूची उपनगरे आणि जिल्ह्याचा ग्रामीण भाग यांचे २०१२ नंतर मोठा प्रमाणात विस्तारीकरण होत गेले. चाकण, रांजणगाव, शिरूर, तळेगाव, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी अशा चारही बाजूंनी उद्योगधंद्यांचे जाळे वाढत गेले. त्याचबरोबर कार्बन उत्सर्जनाचे प्रमाणसुद्धा वाढत गेले. वाढत्या विकासाबरोबर जमिनीवर सिमेंटची जंगले उभी राहिली. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. मावळ-मुळशी, तसेच पश्चिम घाट परिसरामधील ३५ टक्क्यांपेक्षा जास्त हरितपट्टा नामशेष झाला आहे. हरित नियमांचे पालन न केल्यामुळे पुढील काळामध्ये तापमान वाढतच गेल्याची नोंद झाली. सन २०१२ ते २०१७ चा विचार केला असता, मार्चअखेर आणि एप्रिलमध्ये तापमानात एक एक अंशांनी वाढतच गेले. ३५ अंशांपर्यंत असणारे तापमान आता वाढ होत जाऊन ४० अंशांच्या आसपास पोहोचले आहे.वाढत्या तापमानामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला असून, नागरिक घराबाहेर पडणेही टाळत आहेत. या गोष्टी टाळण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन राखण्याबाबत गांभीर्याने पावले उचलणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस वाढत असणारे तापमान चिंताजनक असल्याचे प्राधिकरण नागरी सुरक्षा समिती अध्यक्ष विजय पाटील, विजय मुनोत, रवी भावके, तुकाराम दहे, विजय जगताप, विद्या शिंदे आदींनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)याकरिता काय करणे गरजेचे आहेनगर परिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद, महापालिका यांनी एकत्रितपणे संयुक्तपणे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेणे आवश्यक. सिमेंटमुळे सर्वांत जास्त कार्बन उत्सर्जन होते. त्याकरिता ‘ग्रीन हाउस’ प्रोजेक्ट हाती घेणे आवश्यक.शहर परिसरात, आरक्षित, मोकळ्या भूखंडांवर, रस्त्याच्या दुतर्फा, शाळा-महाविद्यालय परिसर, उद्योगनगरी परिसर, नदी पात्र परिसर अशा सर्व ठिकाणी जास्तीत जास्त झाडे लावणे आवश्यकदेशी झाडे, कमी पाण्यावर जगणारी झाडे (वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब, अशोक) या झाडांचे रोपण आवश्यकहरित क्रांती करून हरित पट्ट्यांची निर्मिती करून कार्बन डाय आॅक्साइडवर नियंत्रण ठेवू शकता येईल.सौर ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त वाढवावाहरितपट्टा, जंगल कायदा याचे काटेकोरपणे पालन व्हावे. वृक्षतोड न करता पुनर्रोपण पद्धतीचा वापर वाढवावा.