शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

वृक्षतोडीने वाढले तापमान

By admin | Updated: April 10, 2017 02:34 IST

गेले अनेक दिवस शहर, जिल्ह्याच्या वातावरणामध्ये उष्णतेचे प्रमाण वाढत चालले आहे. पाच वर्षांपूर्वी

रावेत : गेले अनेक दिवस शहर, जिल्ह्याच्या वातावरणामध्ये उष्णतेचे प्रमाण वाढत चालले आहे. पाच वर्षांपूर्वी शहराचे तापमान मार्चअखेरीस ३५ अंशांच्या जवळपास स्थिर असायचे. परंतु वाढते शहरीकरण व वृक्षतोडीमुळे तापमानात वाढ होत असून, ही चिंताजनक बाब आहे. पिंपरी-चिंचवड शहर, पुणे शहर आणि आजूबाजूची उपनगरे आणि जिल्ह्याचा ग्रामीण भाग यांचे २०१२ नंतर मोठा प्रमाणात विस्तारीकरण होत गेले. चाकण, रांजणगाव, शिरूर, तळेगाव, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी अशा चारही बाजूंनी उद्योगधंद्यांचे जाळे वाढत गेले. त्याचबरोबर कार्बन उत्सर्जनाचे प्रमाणसुद्धा वाढत गेले. वाढत्या विकासाबरोबर जमिनीवर सिमेंटची जंगले उभी राहिली. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. मावळ-मुळशी, तसेच पश्चिम घाट परिसरामधील ३५ टक्क्यांपेक्षा जास्त हरितपट्टा नामशेष झाला आहे. हरित नियमांचे पालन न केल्यामुळे पुढील काळामध्ये तापमान वाढतच गेल्याची नोंद झाली. सन २०१२ ते २०१७ चा विचार केला असता, मार्चअखेर आणि एप्रिलमध्ये तापमानात एक एक अंशांनी वाढतच गेले. ३५ अंशांपर्यंत असणारे तापमान आता वाढ होत जाऊन ४० अंशांच्या आसपास पोहोचले आहे.वाढत्या तापमानामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला असून, नागरिक घराबाहेर पडणेही टाळत आहेत. या गोष्टी टाळण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन राखण्याबाबत गांभीर्याने पावले उचलणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस वाढत असणारे तापमान चिंताजनक असल्याचे प्राधिकरण नागरी सुरक्षा समिती अध्यक्ष विजय पाटील, विजय मुनोत, रवी भावके, तुकाराम दहे, विजय जगताप, विद्या शिंदे आदींनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)याकरिता काय करणे गरजेचे आहेनगर परिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद, महापालिका यांनी एकत्रितपणे संयुक्तपणे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेणे आवश्यक. सिमेंटमुळे सर्वांत जास्त कार्बन उत्सर्जन होते. त्याकरिता ‘ग्रीन हाउस’ प्रोजेक्ट हाती घेणे आवश्यक.शहर परिसरात, आरक्षित, मोकळ्या भूखंडांवर, रस्त्याच्या दुतर्फा, शाळा-महाविद्यालय परिसर, उद्योगनगरी परिसर, नदी पात्र परिसर अशा सर्व ठिकाणी जास्तीत जास्त झाडे लावणे आवश्यकदेशी झाडे, कमी पाण्यावर जगणारी झाडे (वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब, अशोक) या झाडांचे रोपण आवश्यकहरित क्रांती करून हरित पट्ट्यांची निर्मिती करून कार्बन डाय आॅक्साइडवर नियंत्रण ठेवू शकता येईल.सौर ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त वाढवावाहरितपट्टा, जंगल कायदा याचे काटेकोरपणे पालन व्हावे. वृक्षतोड न करता पुनर्रोपण पद्धतीचा वापर वाढवावा.