शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

वृक्षतोडीने वाढले तापमान

By admin | Updated: April 10, 2017 02:34 IST

गेले अनेक दिवस शहर, जिल्ह्याच्या वातावरणामध्ये उष्णतेचे प्रमाण वाढत चालले आहे. पाच वर्षांपूर्वी

रावेत : गेले अनेक दिवस शहर, जिल्ह्याच्या वातावरणामध्ये उष्णतेचे प्रमाण वाढत चालले आहे. पाच वर्षांपूर्वी शहराचे तापमान मार्चअखेरीस ३५ अंशांच्या जवळपास स्थिर असायचे. परंतु वाढते शहरीकरण व वृक्षतोडीमुळे तापमानात वाढ होत असून, ही चिंताजनक बाब आहे. पिंपरी-चिंचवड शहर, पुणे शहर आणि आजूबाजूची उपनगरे आणि जिल्ह्याचा ग्रामीण भाग यांचे २०१२ नंतर मोठा प्रमाणात विस्तारीकरण होत गेले. चाकण, रांजणगाव, शिरूर, तळेगाव, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी अशा चारही बाजूंनी उद्योगधंद्यांचे जाळे वाढत गेले. त्याचबरोबर कार्बन उत्सर्जनाचे प्रमाणसुद्धा वाढत गेले. वाढत्या विकासाबरोबर जमिनीवर सिमेंटची जंगले उभी राहिली. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. मावळ-मुळशी, तसेच पश्चिम घाट परिसरामधील ३५ टक्क्यांपेक्षा जास्त हरितपट्टा नामशेष झाला आहे. हरित नियमांचे पालन न केल्यामुळे पुढील काळामध्ये तापमान वाढतच गेल्याची नोंद झाली. सन २०१२ ते २०१७ चा विचार केला असता, मार्चअखेर आणि एप्रिलमध्ये तापमानात एक एक अंशांनी वाढतच गेले. ३५ अंशांपर्यंत असणारे तापमान आता वाढ होत जाऊन ४० अंशांच्या आसपास पोहोचले आहे.वाढत्या तापमानामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला असून, नागरिक घराबाहेर पडणेही टाळत आहेत. या गोष्टी टाळण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन राखण्याबाबत गांभीर्याने पावले उचलणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस वाढत असणारे तापमान चिंताजनक असल्याचे प्राधिकरण नागरी सुरक्षा समिती अध्यक्ष विजय पाटील, विजय मुनोत, रवी भावके, तुकाराम दहे, विजय जगताप, विद्या शिंदे आदींनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)याकरिता काय करणे गरजेचे आहेनगर परिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद, महापालिका यांनी एकत्रितपणे संयुक्तपणे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेणे आवश्यक. सिमेंटमुळे सर्वांत जास्त कार्बन उत्सर्जन होते. त्याकरिता ‘ग्रीन हाउस’ प्रोजेक्ट हाती घेणे आवश्यक.शहर परिसरात, आरक्षित, मोकळ्या भूखंडांवर, रस्त्याच्या दुतर्फा, शाळा-महाविद्यालय परिसर, उद्योगनगरी परिसर, नदी पात्र परिसर अशा सर्व ठिकाणी जास्तीत जास्त झाडे लावणे आवश्यकदेशी झाडे, कमी पाण्यावर जगणारी झाडे (वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब, अशोक) या झाडांचे रोपण आवश्यकहरित क्रांती करून हरित पट्ट्यांची निर्मिती करून कार्बन डाय आॅक्साइडवर नियंत्रण ठेवू शकता येईल.सौर ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त वाढवावाहरितपट्टा, जंगल कायदा याचे काटेकोरपणे पालन व्हावे. वृक्षतोड न करता पुनर्रोपण पद्धतीचा वापर वाढवावा.