शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

तळवडे गावठाण विकणे आहे

By admin | Updated: October 11, 2016 01:27 IST

महापालिकेची फेब्रुवारी/मार्च २०१७मध्ये निवडणूक होणार असून, प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आहे. प्रभागरचना करताना तळवडे

तळवडे : महापालिकेची फेब्रुवारी/मार्च २०१७मध्ये निवडणूक होणार असून, प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आहे. प्रभागरचना करताना तळवडे आयटी पार्क, जोतिबानगर भाग, सोनवणेवस्ती, पाटीलनगर, चिखली गावठाण, गणेशनगर आणि मोरेवस्तीपर्यंतचा भाग प्रभाग क्रमांक एकमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. प्रभाग बनवताना पूर्वी असलेल्या वॉर्डची मोठ्या प्रमाणात विभागणी करण्यात आली असल्याने तळवडे ग्रामस्थांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. असंतोष व्यक्त करण्यासाठी ग्रामस्थांनी गावातील मुख्य चौकात निवडणूक प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करताना तळवडे गावठाण विकणे आहे, चिखलीकरांना प्राधान्य अशा आशयाचा फलक लावला आहे.तळवडे गावठाणचा महापालिकेत समावेश होण्यापूर्वी तळवडे व रुपीनगर हा ग्रामपंचायत असलेला भाग महापालिकेत समावेश झाल्यानंतर वॉर्ड रचनेत तळवडे व रुपीनगर हा एक नंबरचा वॉर्ड होता. पण, आता प्रभागरचनेत तळवडेचा एक नंबर प्रभागात, तर रुपीनगरचा बारा नंबर प्रभागात समावेश करण्यात आल्यामुळे प्रभाग क्रमांक एकचे विभाजन झाले आहे. महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी तळवडे रुपीनगर ग्रामपंचायत होती. त्यानंतर तळवडे गावठाण रुपीनगर, चिखली, त्रिवेणीनगर, मोरे वस्ती, म्हेत्रेवस्ती असा वॉर्ड होता. त्यानंतर तळवडे गावठाण आणि रुपीनगर असा वॉर्डरचना करण्यात आली. या प्रत्येक वेळेस रचना करताना ग्रामपंचायतीचा भाग अविभाज्य ठेवला गेला. पण, २०१७च्या निवडणुकीसाठी मात्र प्रभागरचना करताना तळवडे ग्रामपंचायत असलेल्या तळवडे आणि रुपीनगर भागाचे शीर आणि धड असे विभाजन केली असल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत. (वार्ताहर)ग्रामस्थ संतप्त : प्रतिनिधित्व न मिळण्याची भीतीमुळातच तळवडे व रुपीनगर परिसर पहिल्यापासून एकाच प्रभागात अथवा वॉर्डमध्ये असून, रेड झोन आणि त्यानुषंगाने असलेल्या अनधिकृत बांधकाम, शास्तीकर, तसेच विकासाच्या दृष्टीने असलेल्या समस्याही सारख्याच आहेत. महापालिका सभागृहात या समस्यांची जाण असलेला प्रतिनिधी पोटतिडकीनं समस्या मांडू शकतो, म्हणून तळवडे विभागाचा समावेश प्रभाग क्रमांक १२मध्ये असणे सोयीचे ठरेल, पण प्रभागरचना करताना चिखली येथील मतदार संख्येच्या मानाने तळवडेची मतदार संख्या अतिशय तुटपुंजी संख्या ठरेल. अशी प्रभागरचना केल्यामुळे निवडणुकीपूर्वीच तळवडे गावातील प्रतिनिधी निवडला जाऊ शकत नसल्याचे उघड झाले असल्यामुळे ग्रमस्थांतर्फे निवडणूक प्रशासनाचा निषेध केला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.