शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
3
Operation Sindoor Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिल्लीत हालचाली; कॅबिनेट बैठकीला सुरुवात
4
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
5
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
6
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
7
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
8
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
9
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
10
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
11
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
12
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
13
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
14
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
15
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
16
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
17
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
18
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
20
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!

तळवडे गावठाण विकणे आहे

By admin | Updated: October 11, 2016 01:27 IST

महापालिकेची फेब्रुवारी/मार्च २०१७मध्ये निवडणूक होणार असून, प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आहे. प्रभागरचना करताना तळवडे

तळवडे : महापालिकेची फेब्रुवारी/मार्च २०१७मध्ये निवडणूक होणार असून, प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आहे. प्रभागरचना करताना तळवडे आयटी पार्क, जोतिबानगर भाग, सोनवणेवस्ती, पाटीलनगर, चिखली गावठाण, गणेशनगर आणि मोरेवस्तीपर्यंतचा भाग प्रभाग क्रमांक एकमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. प्रभाग बनवताना पूर्वी असलेल्या वॉर्डची मोठ्या प्रमाणात विभागणी करण्यात आली असल्याने तळवडे ग्रामस्थांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. असंतोष व्यक्त करण्यासाठी ग्रामस्थांनी गावातील मुख्य चौकात निवडणूक प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करताना तळवडे गावठाण विकणे आहे, चिखलीकरांना प्राधान्य अशा आशयाचा फलक लावला आहे.तळवडे गावठाणचा महापालिकेत समावेश होण्यापूर्वी तळवडे व रुपीनगर हा ग्रामपंचायत असलेला भाग महापालिकेत समावेश झाल्यानंतर वॉर्ड रचनेत तळवडे व रुपीनगर हा एक नंबरचा वॉर्ड होता. पण, आता प्रभागरचनेत तळवडेचा एक नंबर प्रभागात, तर रुपीनगरचा बारा नंबर प्रभागात समावेश करण्यात आल्यामुळे प्रभाग क्रमांक एकचे विभाजन झाले आहे. महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी तळवडे रुपीनगर ग्रामपंचायत होती. त्यानंतर तळवडे गावठाण रुपीनगर, चिखली, त्रिवेणीनगर, मोरे वस्ती, म्हेत्रेवस्ती असा वॉर्ड होता. त्यानंतर तळवडे गावठाण आणि रुपीनगर असा वॉर्डरचना करण्यात आली. या प्रत्येक वेळेस रचना करताना ग्रामपंचायतीचा भाग अविभाज्य ठेवला गेला. पण, २०१७च्या निवडणुकीसाठी मात्र प्रभागरचना करताना तळवडे ग्रामपंचायत असलेल्या तळवडे आणि रुपीनगर भागाचे शीर आणि धड असे विभाजन केली असल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत. (वार्ताहर)ग्रामस्थ संतप्त : प्रतिनिधित्व न मिळण्याची भीतीमुळातच तळवडे व रुपीनगर परिसर पहिल्यापासून एकाच प्रभागात अथवा वॉर्डमध्ये असून, रेड झोन आणि त्यानुषंगाने असलेल्या अनधिकृत बांधकाम, शास्तीकर, तसेच विकासाच्या दृष्टीने असलेल्या समस्याही सारख्याच आहेत. महापालिका सभागृहात या समस्यांची जाण असलेला प्रतिनिधी पोटतिडकीनं समस्या मांडू शकतो, म्हणून तळवडे विभागाचा समावेश प्रभाग क्रमांक १२मध्ये असणे सोयीचे ठरेल, पण प्रभागरचना करताना चिखली येथील मतदार संख्येच्या मानाने तळवडेची मतदार संख्या अतिशय तुटपुंजी संख्या ठरेल. अशी प्रभागरचना केल्यामुळे निवडणुकीपूर्वीच तळवडे गावातील प्रतिनिधी निवडला जाऊ शकत नसल्याचे उघड झाले असल्यामुळे ग्रमस्थांतर्फे निवडणूक प्रशासनाचा निषेध केला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.