शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

तळवडे गावठाण विकणे आहे

By admin | Updated: October 11, 2016 01:27 IST

महापालिकेची फेब्रुवारी/मार्च २०१७मध्ये निवडणूक होणार असून, प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आहे. प्रभागरचना करताना तळवडे

तळवडे : महापालिकेची फेब्रुवारी/मार्च २०१७मध्ये निवडणूक होणार असून, प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आहे. प्रभागरचना करताना तळवडे आयटी पार्क, जोतिबानगर भाग, सोनवणेवस्ती, पाटीलनगर, चिखली गावठाण, गणेशनगर आणि मोरेवस्तीपर्यंतचा भाग प्रभाग क्रमांक एकमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. प्रभाग बनवताना पूर्वी असलेल्या वॉर्डची मोठ्या प्रमाणात विभागणी करण्यात आली असल्याने तळवडे ग्रामस्थांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. असंतोष व्यक्त करण्यासाठी ग्रामस्थांनी गावातील मुख्य चौकात निवडणूक प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करताना तळवडे गावठाण विकणे आहे, चिखलीकरांना प्राधान्य अशा आशयाचा फलक लावला आहे.तळवडे गावठाणचा महापालिकेत समावेश होण्यापूर्वी तळवडे व रुपीनगर हा ग्रामपंचायत असलेला भाग महापालिकेत समावेश झाल्यानंतर वॉर्ड रचनेत तळवडे व रुपीनगर हा एक नंबरचा वॉर्ड होता. पण, आता प्रभागरचनेत तळवडेचा एक नंबर प्रभागात, तर रुपीनगरचा बारा नंबर प्रभागात समावेश करण्यात आल्यामुळे प्रभाग क्रमांक एकचे विभाजन झाले आहे. महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी तळवडे रुपीनगर ग्रामपंचायत होती. त्यानंतर तळवडे गावठाण रुपीनगर, चिखली, त्रिवेणीनगर, मोरे वस्ती, म्हेत्रेवस्ती असा वॉर्ड होता. त्यानंतर तळवडे गावठाण आणि रुपीनगर असा वॉर्डरचना करण्यात आली. या प्रत्येक वेळेस रचना करताना ग्रामपंचायतीचा भाग अविभाज्य ठेवला गेला. पण, २०१७च्या निवडणुकीसाठी मात्र प्रभागरचना करताना तळवडे ग्रामपंचायत असलेल्या तळवडे आणि रुपीनगर भागाचे शीर आणि धड असे विभाजन केली असल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत. (वार्ताहर)ग्रामस्थ संतप्त : प्रतिनिधित्व न मिळण्याची भीतीमुळातच तळवडे व रुपीनगर परिसर पहिल्यापासून एकाच प्रभागात अथवा वॉर्डमध्ये असून, रेड झोन आणि त्यानुषंगाने असलेल्या अनधिकृत बांधकाम, शास्तीकर, तसेच विकासाच्या दृष्टीने असलेल्या समस्याही सारख्याच आहेत. महापालिका सभागृहात या समस्यांची जाण असलेला प्रतिनिधी पोटतिडकीनं समस्या मांडू शकतो, म्हणून तळवडे विभागाचा समावेश प्रभाग क्रमांक १२मध्ये असणे सोयीचे ठरेल, पण प्रभागरचना करताना चिखली येथील मतदार संख्येच्या मानाने तळवडेची मतदार संख्या अतिशय तुटपुंजी संख्या ठरेल. अशी प्रभागरचना केल्यामुळे निवडणुकीपूर्वीच तळवडे गावातील प्रतिनिधी निवडला जाऊ शकत नसल्याचे उघड झाले असल्यामुळे ग्रमस्थांतर्फे निवडणूक प्रशासनाचा निषेध केला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.