शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सदनिकांची थकबाकी न भरणाऱ्यांवर कारवाई करणार

By admin | Updated: April 23, 2016 00:34 IST

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने विकसित केलेल्या गृहप्रकल्पातील सदनिकांची थकबाकी न भरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे

निगडी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने विकसित केलेल्या गृहप्रकल्पातील सदनिकांची थकबाकी न भरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, तसेच निर्धारित वेळेत प्लॉट विकसित न करणाऱ्यांचे प्लॉट काढून घेण्यात येतील, अशी माहिती पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्याधिकारी सुरेश जाधव यांनी लोकमतशी बोलताना दिली.पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने दहा गावांमध्ये पेठा विकसित केल्या आहेत. सुरुवातीच्या कालखंडात सदनिका तयार करून त्याची विक्री करण्यात आली. तसेच काही प्लॉट कंपन्या, तसेच गृहनिर्माण संस्थांना देण्यात आले. विकसित पेठामधील नागरिकांच्या प्रश्नाविषयी लोकमतने मागील आठवड्यात वृत्तमालिका प्रकाशित केली होती. त्यात सदनिका हस्तांतरण, वाढीव बांधकामे, लीज होल्ड फ्री होल्ड, घरांची थकीत रक्कम, गृहनिर्माण संस्थांमधील नागरी सुविधांचा अभाव, वारसांची नोंद, सदनिकांची गुणवत्ता या विषयांवर प्रकाश टाकला होता. याविषयी मुख्याधिकाऱ्यांनी यातील प्रश्नाविषयी भूमिका मांडली. गृहनिर्माण संस्थांमधील नागरी सुविधांविषयी जाधव म्हणाले, ‘‘प्राधिकरणाने सदनिकांची विक्री केल्यानंतर त्या संदर्भात निर्माण केलेल्या गृहनिर्माण संस्थांनी देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विविध उत्पन्न गटातील नागरिकांना घर उपलब्ध करून देणे, याची जबाबदारी प्राधिकरणावर होती. संबंधित घरे गृहनिर्माण संस्थांकडे हस्तांतरित केल्यानंतर तेथील अंतर्गत नागरी सुविधांविषयीची जबाबदारी सोसायट्यांवर आहे. सोसायट्यांनी पिण्याच्या पाण्याच्या टाक्यासंदर्भात काही बदल करायचे झाल्यास याबाबत प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक आहे.’’नागरिकांना सदनिकांसाठी जागा देऊनही विकसित का झाल्या नाहीत? दंडात्मक कारवाईविषयीचे धोरण काय? याविषयी जाधव म्हणाले, ‘‘प्राधिकरणाने विकसित केलेल्या एकूण गृहप्रकल्पांपैकी सुमारे पन्नास टक्के सदनिकाधारकांनी हप्ते थकवलेले आहेत. वास्तविक घरांचा ताबा मिळाल्यानंतर नियमितपणे हप्ते भरण्याची जबाबदारी सदनिकाधारकांची होती. अत्यल्प हप्ता असूनही तो भरला नाही, अशांना वारंवार नोटिसा दिल्या आहेत. दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत. सदनिकाधारकांनी हप्ते न भरल्यास कायदेशीर कारवाई करणे भाग पडणार आहे.’’ (वार्ताहर)> १वारस नोंद, हस्तांतरणाच्या विषयावर जाधव म्हणाले, ‘‘एमआरटीपी अ‍ॅक्टनुसार मेट्रोपोलिटन सिटीसाठी वारस नोंद आणि हस्तांतरणासंदर्भात जो नियम आहे, त्याचीच अंमलबजावणी होत आहे. याची पद्धत सर्व शहरांप्रमाणे एकसारखीच आहे. वारस नोंदीसाठी न्यायालयाच्या आदेशाची आवश्यकता असते. त्या आदेशानुसार अत्यल्प शुल्क भरून नोंद केली जाते. मात्र, प्राधिकरणाच्या अनेक सदनिकांची विक्री करून त्याची रीतसर नोंदणी न केल्याने काही लोकांना अडचणी येतात. त्यामुळे प्राधिकरणाने भाडेपट्ट्याने दिलेली घरे मूळ मालकाने अनेक जणांना विकल्याची नोंद आता वास्तव्यास असणाऱ्याकडे नसतात. तशी नोंद सदनिकाधारक प्राधिकरणाकडेही करीत नाहीत. त्यामुळे हस्तांतरणास कायदेशीर अडचणी येतात. याबाबत सदनिकाधाकांनी सदनिका विकत घेताना पूर्वीची सर्व कागदपत्रे जुन्या मालकाकडून घेणे आवश्यक असते.’’२विविध शासकीय संस्थांना दिलेल्या गृहप्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीविषयी जाधव म्हणाले, ‘‘प्राधिकरणाचे नवनगर विकसित करताना काही केंद्र आणि राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीसाठी गृहप्रकल्प निर्माण केले आहेत. तसेच काहींना गृहप्रकल्पांसाठी जागा दिली आहे. त्या वसाहतींची देखभाल दुरुस्तीसंदर्भात तक्रारी येतात. परंतु, प्लॉट किंवा सदनिका हस्तांतरित केल्यानंतर देखभाल दुरुस्तीची जबाबदारी प्राधिकरणाची नाही. शासनाच्या संबंधित विभागाने किंवा गृहनिर्माण सोसायट्यांनी देखभाल दुरुस्ती करायला हवी. गृहनिर्माण संस्थेच्या परिसरात अंतर्गत काही बदल करणार असतील, तर याबाबत प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक आहे. नागरी सुविधांविषयीच्या परवानग्यांना कधीही उशीर लावला जाणार नाही.’’