शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

रावेत बंधाऱ्यात दलदल; कचऱ्यातून पाणीउपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 02:47 IST

गाळ साचल्याने जलपर्णी व कचऱ्याने दलदल झाली आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यातून उपसा केला जात असूनही हेच पाणी प्रक्रियेनंतर पिंपरी-चिंचवडकरांच्या गळी उतरविले जाते.

पिंपरी : पवना नदीतून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने रावेत बंधाऱ्यातील पाणी पातळीत घट होत आहे. या बंधाऱ्यातून पाणी उपसा केला जातो. त्या ठिकाणी कोणतीही सुरक्षाव्यवस्था नसल्याने बंधाऱ्यात कचऱ्याचे साम्राज्य वाढले आहे. गाळ साचल्याने जलपर्णी व कचऱ्याने दलदल झाली आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यातून उपसा केला जात असूनही हेच पाणी प्रक्रियेनंतर पिंपरी-चिंचवडकरांच्या गळी उतरविले जाते.शहराला पवना नदीतून १०० टक्के पाणीपुरवठा केला जातो. पवना नदीवर रावेत येथे बंधारा बांधला आहे. या बंधाºयातून रोज ४७० एमएलडी पाणी उपसा करून त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण शहराला पुरवठा केला जातो. सध्या संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने अपुरा पुरवठा होत आहे.शहरात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, महापालिकेच्या आरोग्य व पाणीपुरवठा विभागाकडून योग्य दक्षता घेतली जात नाही. रावेत बंधाºयाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्याने कचरा टाकला जात आहे. तसेच, परिसरातील राडारोडा येथे टाकण्यात येतो. त्यामुळे बंधाºयात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून, जलपर्णी निर्माण झाली आहे. या दलदलीच्या व दुर्गंधीयुक्त पाण्याचा उपसा शुद्धीकरण केंद्राकडे होत आहे. त्यामुळे रोगराई आणखी पसरण्याची भीती स्थानिक नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.रावेत बंधारा येथे सुरक्षाव्यवस्था नसल्याने कोणीही सहजपणे या ठिकाणी कचरा वा राडारोडा टाकून जाते. या ठिकाणाहून पिंपरी महापालिका, जलसंपदा विभाग व एमआयडीसी यांच्याकडून उपसा केला जातो. मात्र, तिन्ही विभागांत समन्वय नसल्याने अनेक वर्षांपासून येथे गाळ साचून दलदल निर्माण झाली आहे. येथील गाळ काढण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती स्थानिक कार्यकर्ते संजय फडके व विजय भोंडवे यांनी दिली.

टॅग्स :ravetरावेत