शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

रावेत बंधाऱ्यात दलदल; कचऱ्यातून पाणीउपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 02:47 IST

गाळ साचल्याने जलपर्णी व कचऱ्याने दलदल झाली आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यातून उपसा केला जात असूनही हेच पाणी प्रक्रियेनंतर पिंपरी-चिंचवडकरांच्या गळी उतरविले जाते.

पिंपरी : पवना नदीतून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने रावेत बंधाऱ्यातील पाणी पातळीत घट होत आहे. या बंधाऱ्यातून पाणी उपसा केला जातो. त्या ठिकाणी कोणतीही सुरक्षाव्यवस्था नसल्याने बंधाऱ्यात कचऱ्याचे साम्राज्य वाढले आहे. गाळ साचल्याने जलपर्णी व कचऱ्याने दलदल झाली आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यातून उपसा केला जात असूनही हेच पाणी प्रक्रियेनंतर पिंपरी-चिंचवडकरांच्या गळी उतरविले जाते.शहराला पवना नदीतून १०० टक्के पाणीपुरवठा केला जातो. पवना नदीवर रावेत येथे बंधारा बांधला आहे. या बंधाºयातून रोज ४७० एमएलडी पाणी उपसा करून त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण शहराला पुरवठा केला जातो. सध्या संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने अपुरा पुरवठा होत आहे.शहरात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, महापालिकेच्या आरोग्य व पाणीपुरवठा विभागाकडून योग्य दक्षता घेतली जात नाही. रावेत बंधाºयाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्याने कचरा टाकला जात आहे. तसेच, परिसरातील राडारोडा येथे टाकण्यात येतो. त्यामुळे बंधाºयात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून, जलपर्णी निर्माण झाली आहे. या दलदलीच्या व दुर्गंधीयुक्त पाण्याचा उपसा शुद्धीकरण केंद्राकडे होत आहे. त्यामुळे रोगराई आणखी पसरण्याची भीती स्थानिक नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.रावेत बंधारा येथे सुरक्षाव्यवस्था नसल्याने कोणीही सहजपणे या ठिकाणी कचरा वा राडारोडा टाकून जाते. या ठिकाणाहून पिंपरी महापालिका, जलसंपदा विभाग व एमआयडीसी यांच्याकडून उपसा केला जातो. मात्र, तिन्ही विभागांत समन्वय नसल्याने अनेक वर्षांपासून येथे गाळ साचून दलदल निर्माण झाली आहे. येथील गाळ काढण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती स्थानिक कार्यकर्ते संजय फडके व विजय भोंडवे यांनी दिली.

टॅग्स :ravetरावेत