शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रिंगरोडबाबत पुन:सर्वेक्षण; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 01:21 IST

स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीच्या कार्यकर्त्यांनी दिले निवेदन

रावेत : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रस्तावित रिंगरोडमधील बाधितांचा सकारात्मक विचार नक्कीच केला जाईल. घरांचा प्रश्न महत्त्वाचा आहे, रिंगरोडबाधितांचा प्रश्न सोडवण्यात येईल, तसेच दाट लोकवस्तीतून जाणाऱ्या मार्गाकरिता पुन:सर्वेक्षण केले जाईल. त्याचप्रमाणे शहर सुधारित विकास आराखडा औरंगाबाद नगररचना यांचे १५ सदस्य टीमचे कार्य त्वरित कार्यान्वित केले जाईल. दंडशुल्क आणि शास्तीबाबत नागरी हिताचा विचार नक्की केला जाईल, असे आश्वासन शहरातील रिंगरोड आणि अनधिकृत बांधकामासाठी लढा देत असलेल्या स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळ आणि घर बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिले.स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळ आणि घर बचाव संघर्ष समिती यांचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पिंपरी येथे भेट घेतली. चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर स्मारकाच्या भूमिपूजनासाठी आज मुख्यमंत्री पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. उद्घाटनापूर्वी पिंपरी येथे स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीचे समन्वयक धनाजी येळकर पाटील, मनोहर पवार, राजेंद्र देवकर, शिवाजी पाटील, भालचंद्र फुगे, देवेंद्र भदाने, गौरव धनवे, राजश्री शिरवळकर, अतुल वरपे, जितेंद्र पाटील,सुनील पाटील, राजू पवार, तर घर बचाव संघर्ष समितीचे विजय पाटील,शिवाजी ईबितदार,रेखा भोळे,उमाकांत सोनवणे,नारायण चिघळीकर, अमरसिंग आदियाल,राजू गायकवाड,आशा पाटील,गोपाळ बिरारी या शिष्टमंडळाबरोबर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या प्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट,आमदार लक्ष्मण जगताप, आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते.स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीचे धनाजी येळकर पाटील यांनी प्रमुख तीन मागण्या मांडल्या. १९७२मध्ये प्राधिकरणाची स्थापना ही सर्वसामान्य आर्थिक दुर्बल घटकांसाठी स्वस्तात घर उपलब्ध करून देण्यासाठीच झाली. परंतु आजतागायत या उद्देशाला हरताळ फासत फक्त ७४०० घरे उपलब्ध करून दिली.या वेळी स्वाभिमानी घरबचाव संघर्ष समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडण्यात आल्या. घरे अधिकृत करण्याची मागणी करण्यात आली.आॅक्टोबर २०१७ च्या प्रशमन कायद्यामधील जाचक अटी व प्रचंड दंडामुळे बांधकाम नियमितीकरणास काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तसेच कालबाह्य रिंगरोड रद्द करण्यात यावा अन्यथा त्यामुळे तीन हजार पाचशे कुटुंबे रस्त्यावर येतील. तसेच जाचक शास्तीकर पूर्णपणे रद्द करून आपण दिलेला शब्द पाळावा. दंडशुल्क आणि शास्तीबाबत नागरी हिताचा विचार केला जाईल, या बाबीला गती देण्याचे तोंडी आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले.धनाजी येळकर पाटील म्हणाले, ‘‘आतापर्यंत राज्यकर्त्यांनी अनधिकृत घराचे निवडणुकीत भांडवल केले गेले.परंतु २०१९च्या लोकसभा,विधानसभा निवडणुकीत याचे राजकारण चिडलेली जनता सहन करणार नाही, याची दखल घेऊन हा प्रश्न लवकर सोडवावा. आम्ही १५ सप्टेंबरपर्यंत निर्णयाची वाट पाहू अन्यथा आंदोलन तीव्र करू. वर्षभरापासून रिंगरोडबाधित शहरात विविध माध्यमांतून हक्कांच्या घरासाठी आंदोलन करीत आहेत.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड