शहरं
Join us  
Trending Stories
1
'जात नाही, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे', सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
2
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
3
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
4
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
5
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
6
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
7
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
8
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
9
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
10
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
11
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
12
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
13
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
14
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
15
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
16
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
18
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
19
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
20
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करण्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 02:12 IST

मराठी भाषा रसाळ आहे. कथा, कविता, कादंबरी वाचल्याने जीवन घडते. नारायण सुर्वे, अण्णा भाऊ साठे यांसारख्या लेखकांच्या

पिंपरी : मराठी भाषा रसाळ आहे. कथा, कविता, कादंबरी वाचल्याने जीवन घडते. नारायण सुर्वे, अण्णा भाऊ साठे यांसारख्या लेखकांच्या कविता, कादंब-या मुलांनी वाचल्या पाहिजेत. त्यासाठी पुस्तकांशी मैत्री करा, असे विचार बालकुमार साहित्य संमेलनात गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले.श्री शिवछत्रपती शिवाजीराजे विद्यालय, चिंचवड व महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरी यांच्या वतीने ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कवी विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित बालकुमार साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. साहित्य संमेलनाची सुरुवात बालकुमार दिंडीने झाली. ग्रंथदिंडीत विद्यालयातील विद्यार्थी विविध वेशभूषांत सहभागी झाले होते. ग्रंथदिंडीतील पालखीमध्ये गाथा, भगवद्गीता, ग्रामगीता, श्यामची आई इत्यादी पुस्तके ठेवण्यात आली होती. संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताई, संत तुकाराम, संत गाडगेमहाराज या संतांची तर महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजीमहाराज, भारतमाता, झाशीची राणी अशा महान व्यक्तींची वेशभूषा करून विद्यालयातील मुले दिंडीत सहभागी झाले होते. तसेच महाविद्यालयातील लेझीम पथकही दिंडीत सहभागी झाले होते. शाळेच्या आवारात दिंडी पोहोचताच दिंडीचे पूजन करण्यात आले.बालकुमारच्या दिंडीनंतर उद्घाटनाचा सोहळा पार पडला. बालवर्गातील विपुदा जतकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी गिरीश प्रभुणे, उपमहापौर शैलजा मोरे, संमेलनाचे अध्यक्ष अनुराधा प्रभुदेसाई, स्वागताध्यक्ष रामचंद्र जाधव, महाराष्ट्र साहित्य परिषद कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, मुख्य कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह उद्धव कानडे, सुदाम भोरे आदी उपस्थित होते.या वेळी विपुदा जतकर हिने कथाकथनामध्ये चल रे भोपळ्या टुणूक टुणूक ही कथा सादर केली. तसेच आसाम येथे झालेल्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या प्रियांशु शेळके यांचा विशेष सत्कार करण्यात आला.स्वागताध्यक्ष रामचंद्र जाधव यांच्यासह उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. विंदा करंदीकर यांच्या ‘देणाºयाने देत जावे घेणाºयाने घेत जावे’ या पद्यपंक्तीने उद्घाटन सोहळ्याचा समारोप झाला.प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले, तर मुरलीधर साठे, विजय जाधव, पुरुषोत्तम सदाफुले, मुकुंद आवटे, अनिल कर्पे, रोहित खर्गे, मुख्याध्यापक बाळाराम पाटील, मुख्याध्यापिका प्रतिभा देशपांडे यांनी संयोजन केले.