शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करण्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 02:12 IST

मराठी भाषा रसाळ आहे. कथा, कविता, कादंबरी वाचल्याने जीवन घडते. नारायण सुर्वे, अण्णा भाऊ साठे यांसारख्या लेखकांच्या

पिंपरी : मराठी भाषा रसाळ आहे. कथा, कविता, कादंबरी वाचल्याने जीवन घडते. नारायण सुर्वे, अण्णा भाऊ साठे यांसारख्या लेखकांच्या कविता, कादंब-या मुलांनी वाचल्या पाहिजेत. त्यासाठी पुस्तकांशी मैत्री करा, असे विचार बालकुमार साहित्य संमेलनात गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले.श्री शिवछत्रपती शिवाजीराजे विद्यालय, चिंचवड व महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरी यांच्या वतीने ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कवी विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित बालकुमार साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. साहित्य संमेलनाची सुरुवात बालकुमार दिंडीने झाली. ग्रंथदिंडीत विद्यालयातील विद्यार्थी विविध वेशभूषांत सहभागी झाले होते. ग्रंथदिंडीतील पालखीमध्ये गाथा, भगवद्गीता, ग्रामगीता, श्यामची आई इत्यादी पुस्तके ठेवण्यात आली होती. संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताई, संत तुकाराम, संत गाडगेमहाराज या संतांची तर महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजीमहाराज, भारतमाता, झाशीची राणी अशा महान व्यक्तींची वेशभूषा करून विद्यालयातील मुले दिंडीत सहभागी झाले होते. तसेच महाविद्यालयातील लेझीम पथकही दिंडीत सहभागी झाले होते. शाळेच्या आवारात दिंडी पोहोचताच दिंडीचे पूजन करण्यात आले.बालकुमारच्या दिंडीनंतर उद्घाटनाचा सोहळा पार पडला. बालवर्गातील विपुदा जतकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी गिरीश प्रभुणे, उपमहापौर शैलजा मोरे, संमेलनाचे अध्यक्ष अनुराधा प्रभुदेसाई, स्वागताध्यक्ष रामचंद्र जाधव, महाराष्ट्र साहित्य परिषद कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, मुख्य कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह उद्धव कानडे, सुदाम भोरे आदी उपस्थित होते.या वेळी विपुदा जतकर हिने कथाकथनामध्ये चल रे भोपळ्या टुणूक टुणूक ही कथा सादर केली. तसेच आसाम येथे झालेल्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या प्रियांशु शेळके यांचा विशेष सत्कार करण्यात आला.स्वागताध्यक्ष रामचंद्र जाधव यांच्यासह उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. विंदा करंदीकर यांच्या ‘देणाºयाने देत जावे घेणाºयाने घेत जावे’ या पद्यपंक्तीने उद्घाटन सोहळ्याचा समारोप झाला.प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले, तर मुरलीधर साठे, विजय जाधव, पुरुषोत्तम सदाफुले, मुकुंद आवटे, अनिल कर्पे, रोहित खर्गे, मुख्याध्यापक बाळाराम पाटील, मुख्याध्यापिका प्रतिभा देशपांडे यांनी संयोजन केले.