शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

‘वाहतूककोंडी’बाबत उपाययोजनांचे भिजत घोंगडे; कारवाईची आवश्यकता, विद्यार्थ्यांचा प्रवास धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 04:28 IST

शाळा परिसरात होणारी वाहतूककोंडी व यामधून रस्ता शोधत धावणारे विद्यार्थी हे वास्तव आहे. ही समस्या सुटावी, यासाठी शाळा व्यवस्थापन प्रयत्न करत नाही. तर पालकांनी शाळा परिसरातील अतिक्रमण व वाहतूककोंडीविषयी तक्रारी करूनही पोलीस लक्ष देत नाहीत. या दिरंगाईच्या कारभाराचे विद्यार्थी बळी ठरत आहेत.

पिंपरी : शाळा परिसरात होणारी वाहतूककोंडी व यामधून रस्ता शोधत धावणारे विद्यार्थी हे वास्तव आहे. ही समस्या सुटावी, यासाठी शाळा व्यवस्थापन प्रयत्न करत नाही. तर पालकांनी शाळा परिसरातील अतिक्रमण व वाहतूककोंडीविषयी तक्रारी करूनही पोलीस लक्ष देत नाहीत. या दिरंगाईच्या कारभाराचे विद्यार्थी बळी ठरत आहेत.आकुर्डी येथील म्हाळसाकांत विद्यालयाजवळ ट्रकच्या धडकेत अशीष पावसकर या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा सुरू होताना आणि सुटताना तेथील रस्त्यावर जड वाहनांना बंदी घालणे गरजेचे आहे. तसेच परिसरातील सिग्नल व्यवस्था सुरळीत करणे गरजेचे आहे. चिंचवडमधील काकडे पार्क, श्रीधरनगर, भोईरनगर, पवनानगर, वाल्हेकरवाडी परिसरात विविध शाळेंसमोर विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनांची वर्दळ असते. चापेकर चौक व जुना जकात नाका परिसरात असणाºया शाळा व महाविद्यालयाच्या मुख्य रस्त्यावर विद्यार्थी बसची वाट पहात उभे असतात. येथे बस थांबे नसल्याने विद्यार्थी रस्त्यावर उभे राहतात. शाळेची इमारत दिघी गावठाणात असून, परिसरातील शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांची संख्या ३५० च्या वर आहे. शाळेत येण्यासाठी दिघी-आळंदी रस्ता ओलांडून यावे लागते. लक्ष्मणनगर शाळा भरण्याच्या वेळेस विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी आलेले पालक रस्त्यातच वाहने पार्क करतात.वाहनपरवाना असल्याशिवाय महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना पार्किंग करू देऊ नये, तसेच पालकांनी पाल्याला परवाना असल्याशिवाय गाडी हातात देऊ नये, यासारख्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.माणुसकी हरवतेयअपघात घडल्यानंतर जखमींना मदत करण्याऐवजी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे फोटो काढण्याची घाईच जादा झालेली असते. तर अनेक जण बघ्याची भूमिका घेतात. वेळेवर उपचार मिळाले नाहीत, त्यामुळे अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे. जखमीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे. पण अपघातानंतर हे चित्र दिसत नाही. त्यामुळे माणुसकी हरवत चालली आहे, असे मत व्यक्त होत आहे.विद्यार्थ्यांची स्टंटबाजी जिवावरशहर परिसरात अनेक विद्यार्थी विनापरवाना वाहन चालवितात. तसेच ते अनेक वेळा स्टंटबाजी करतात. त्यामुळे लहान-मोठे अपघात झाले आहेत. फोनवरच बोलत वाहन चालविण्याचा नवा फंडा तयार केला आहे. त्यामुळे अनेक वेळा हॉर्न वाजविला तर ऐकायला न येणे, पुढून येणारे वाहन न दिसणे यासारखे प्रकार घडत आहेत. मुलांची स्टंटबाजी रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड