शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

‘वाहतूककोंडी’बाबत उपाययोजनांचे भिजत घोंगडे; कारवाईची आवश्यकता, विद्यार्थ्यांचा प्रवास धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 04:28 IST

शाळा परिसरात होणारी वाहतूककोंडी व यामधून रस्ता शोधत धावणारे विद्यार्थी हे वास्तव आहे. ही समस्या सुटावी, यासाठी शाळा व्यवस्थापन प्रयत्न करत नाही. तर पालकांनी शाळा परिसरातील अतिक्रमण व वाहतूककोंडीविषयी तक्रारी करूनही पोलीस लक्ष देत नाहीत. या दिरंगाईच्या कारभाराचे विद्यार्थी बळी ठरत आहेत.

पिंपरी : शाळा परिसरात होणारी वाहतूककोंडी व यामधून रस्ता शोधत धावणारे विद्यार्थी हे वास्तव आहे. ही समस्या सुटावी, यासाठी शाळा व्यवस्थापन प्रयत्न करत नाही. तर पालकांनी शाळा परिसरातील अतिक्रमण व वाहतूककोंडीविषयी तक्रारी करूनही पोलीस लक्ष देत नाहीत. या दिरंगाईच्या कारभाराचे विद्यार्थी बळी ठरत आहेत.आकुर्डी येथील म्हाळसाकांत विद्यालयाजवळ ट्रकच्या धडकेत अशीष पावसकर या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा सुरू होताना आणि सुटताना तेथील रस्त्यावर जड वाहनांना बंदी घालणे गरजेचे आहे. तसेच परिसरातील सिग्नल व्यवस्था सुरळीत करणे गरजेचे आहे. चिंचवडमधील काकडे पार्क, श्रीधरनगर, भोईरनगर, पवनानगर, वाल्हेकरवाडी परिसरात विविध शाळेंसमोर विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनांची वर्दळ असते. चापेकर चौक व जुना जकात नाका परिसरात असणाºया शाळा व महाविद्यालयाच्या मुख्य रस्त्यावर विद्यार्थी बसची वाट पहात उभे असतात. येथे बस थांबे नसल्याने विद्यार्थी रस्त्यावर उभे राहतात. शाळेची इमारत दिघी गावठाणात असून, परिसरातील शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांची संख्या ३५० च्या वर आहे. शाळेत येण्यासाठी दिघी-आळंदी रस्ता ओलांडून यावे लागते. लक्ष्मणनगर शाळा भरण्याच्या वेळेस विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी आलेले पालक रस्त्यातच वाहने पार्क करतात.वाहनपरवाना असल्याशिवाय महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना पार्किंग करू देऊ नये, तसेच पालकांनी पाल्याला परवाना असल्याशिवाय गाडी हातात देऊ नये, यासारख्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.माणुसकी हरवतेयअपघात घडल्यानंतर जखमींना मदत करण्याऐवजी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे फोटो काढण्याची घाईच जादा झालेली असते. तर अनेक जण बघ्याची भूमिका घेतात. वेळेवर उपचार मिळाले नाहीत, त्यामुळे अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे. जखमीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे. पण अपघातानंतर हे चित्र दिसत नाही. त्यामुळे माणुसकी हरवत चालली आहे, असे मत व्यक्त होत आहे.विद्यार्थ्यांची स्टंटबाजी जिवावरशहर परिसरात अनेक विद्यार्थी विनापरवाना वाहन चालवितात. तसेच ते अनेक वेळा स्टंटबाजी करतात. त्यामुळे लहान-मोठे अपघात झाले आहेत. फोनवरच बोलत वाहन चालविण्याचा नवा फंडा तयार केला आहे. त्यामुळे अनेक वेळा हॉर्न वाजविला तर ऐकायला न येणे, पुढून येणारे वाहन न दिसणे यासारखे प्रकार घडत आहेत. मुलांची स्टंटबाजी रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड