शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

‘वाहतूककोंडी’बाबत उपाययोजनांचे भिजत घोंगडे; कारवाईची आवश्यकता, विद्यार्थ्यांचा प्रवास धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 04:28 IST

शाळा परिसरात होणारी वाहतूककोंडी व यामधून रस्ता शोधत धावणारे विद्यार्थी हे वास्तव आहे. ही समस्या सुटावी, यासाठी शाळा व्यवस्थापन प्रयत्न करत नाही. तर पालकांनी शाळा परिसरातील अतिक्रमण व वाहतूककोंडीविषयी तक्रारी करूनही पोलीस लक्ष देत नाहीत. या दिरंगाईच्या कारभाराचे विद्यार्थी बळी ठरत आहेत.

पिंपरी : शाळा परिसरात होणारी वाहतूककोंडी व यामधून रस्ता शोधत धावणारे विद्यार्थी हे वास्तव आहे. ही समस्या सुटावी, यासाठी शाळा व्यवस्थापन प्रयत्न करत नाही. तर पालकांनी शाळा परिसरातील अतिक्रमण व वाहतूककोंडीविषयी तक्रारी करूनही पोलीस लक्ष देत नाहीत. या दिरंगाईच्या कारभाराचे विद्यार्थी बळी ठरत आहेत.आकुर्डी येथील म्हाळसाकांत विद्यालयाजवळ ट्रकच्या धडकेत अशीष पावसकर या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा सुरू होताना आणि सुटताना तेथील रस्त्यावर जड वाहनांना बंदी घालणे गरजेचे आहे. तसेच परिसरातील सिग्नल व्यवस्था सुरळीत करणे गरजेचे आहे. चिंचवडमधील काकडे पार्क, श्रीधरनगर, भोईरनगर, पवनानगर, वाल्हेकरवाडी परिसरात विविध शाळेंसमोर विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनांची वर्दळ असते. चापेकर चौक व जुना जकात नाका परिसरात असणाºया शाळा व महाविद्यालयाच्या मुख्य रस्त्यावर विद्यार्थी बसची वाट पहात उभे असतात. येथे बस थांबे नसल्याने विद्यार्थी रस्त्यावर उभे राहतात. शाळेची इमारत दिघी गावठाणात असून, परिसरातील शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांची संख्या ३५० च्या वर आहे. शाळेत येण्यासाठी दिघी-आळंदी रस्ता ओलांडून यावे लागते. लक्ष्मणनगर शाळा भरण्याच्या वेळेस विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी आलेले पालक रस्त्यातच वाहने पार्क करतात.वाहनपरवाना असल्याशिवाय महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना पार्किंग करू देऊ नये, तसेच पालकांनी पाल्याला परवाना असल्याशिवाय गाडी हातात देऊ नये, यासारख्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.माणुसकी हरवतेयअपघात घडल्यानंतर जखमींना मदत करण्याऐवजी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे फोटो काढण्याची घाईच जादा झालेली असते. तर अनेक जण बघ्याची भूमिका घेतात. वेळेवर उपचार मिळाले नाहीत, त्यामुळे अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे. जखमीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे. पण अपघातानंतर हे चित्र दिसत नाही. त्यामुळे माणुसकी हरवत चालली आहे, असे मत व्यक्त होत आहे.विद्यार्थ्यांची स्टंटबाजी जिवावरशहर परिसरात अनेक विद्यार्थी विनापरवाना वाहन चालवितात. तसेच ते अनेक वेळा स्टंटबाजी करतात. त्यामुळे लहान-मोठे अपघात झाले आहेत. फोनवरच बोलत वाहन चालविण्याचा नवा फंडा तयार केला आहे. त्यामुळे अनेक वेळा हॉर्न वाजविला तर ऐकायला न येणे, पुढून येणारे वाहन न दिसणे यासारखे प्रकार घडत आहेत. मुलांची स्टंटबाजी रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड