शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीचे अध्यक्ष उद्विग्न; महापालिका आयुक्तांकडूनही दखल घेतली जात नसल्याचे निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 05:56 IST

स्थायी समितीत ठराव मंजूर होतो... कंत्राटदाराला कामाचे आदेश द्यायचे असतात...तरच कामाची पुढील कार्यवाही सुरू होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेत मात्र स्थायीत ठराव मंजूर झाल्यानंतरही कामाचे आदेश होतीलच, याची शाश्वती राहत नाही.

पिंपरी : स्थायी समितीत ठराव मंजूर होतो... कंत्राटदाराला कामाचे आदेश द्यायचे असतात...तरच कामाची पुढील कार्यवाही सुरू होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेत मात्र स्थायीत ठराव मंजूर झाल्यानंतरही कामाचे आदेश होतीलच, याची शाश्वती राहत नाही. वर्क आॅर्डर देऊनही अंमलबजावणीची प्रक्रिया पुढे सरकतच नाही. महापालिका प्रशासनाचे प्रमुख असलेल्या आयुक्तांकडूनही काहीच दखल घेतली जात नाही. अडथळ्यांच्या शर्यतीत काम तरी कसे करायचे, अशा उद्विग्न सवाल स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी उपस्थित केला.शहराच्या विविध भागातील रस्ते विकासासाठी ४५० कोटींच्या खर्चास स्थायी समितीने महिनाभरापूर्वी मान्यता दिली आहे. त्यामध्ये डांबरीकरण, मजबुतीकरण, रस्ते विकसित करणे, तसेच रस्त्याच्या कडेने विविध सेवावाहिन्या टाकणे या खर्चाचा समावेश होता. कामे सुरुवात करण्याच्या सूचना स्थायी समितीने प्रशासनाला दिल्या होत्या. परंतु, अद्यापपर्यंत ही कामे सुरूच होऊ शकली नाहीत. महापालिकेत काम करताना, प्रत्येक बाबींचा स्थायी समिती अध्यक्षांनी पाठपुरावा करणे शक्य नाही. अनधिकृत फलकांबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, असे स्थायी समिती सभेत वारंवार सुचविण्यात आले. मात्र त्याची दखल घेतली नाही.अधिका-यांच्या बैठकीला दांडीएखाद्या अधिकाºयास काम का होत नाही, असा जाब विचारावा, तर अधिकारी जाणीवपूर्वक बैठकांना अनुपस्थित राहतात. कंत्राटदार सूचनांचे पालन करीत नाहीत. अधिकारी ऐकत नाहीत, काम कसे करायचे, असा संतप्त सवालसावळे यांनी स्थायी समिती सभेत उपस्थित केला. अधिकारी पदाधिकाºयांचे ऐकत नाहीत, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सावळे यांनी उद्यान विभाग अधिकाºयांना फैलावर घेतले.हितसंबंधांचा अडथळावृक्ष प्राधिकरण समितीच्या दोन सदस्यांची एक समिती नियुक्त केली आहे. हे सदस्य पाहणी करणार, त्यानंतर कामाच्या आदेशाबातचा निर्णय होईल. सक्षम समितीने मंजुरी दिली असताना कामे सुरू का होत नाहीत, हा मुद्दा आहे. या कार्यपद्धतीमुळे रस्ते विकासाची ४५० कोटींची कामे रखडली आहेत. मुदतवाढ, वाढीव खर्चाचे प्रायोजन असावे, त्यात हितसंबंध जोपासले जात आहेत का, असा सवालही सावळे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड