शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

एसटी महामंडळाच्या वायफाय सुविधेचा बोजवारा, लाखो रुपये खर्च करूनही मिळत नाही सेवा, प्रवाशांमध्ये नाराजी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 03:46 IST

प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने बसमध्ये लाखो रुपये खर्च करून वायफाय सुविधा महाराष्ट्रभर सुरू केली. सध्या मात्र बसमधील ही सुविधा बारगळल्याने प्रवाशांच्या मनोरंजनावर विरजण पडल्याचे दिसून येत आहे.

पिंपळे गुरव : प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने बसमध्ये लाखो रुपये खर्च करून वायफाय सुविधा महाराष्ट्रभर सुरू केली. सध्या मात्र बसमधील ही सुविधा बारगळल्याने प्रवाशांच्या मनोरंजनावर विरजण पडल्याचे दिसून येत आहे.महाराष्ट्रात दिवस-रात्र हजारो बसमधून लाखो प्रवासी प्रवास करतात. शहरांसह ग्रामीण भागातील प्रवाशांना प्रवास करताना मोबाइलवर आनंद मिळावा म्हणून ही सुविधा सुरू केली. बसमध्ये वायफाय मशिन असून अडचण नसून खोळंबा या म्हणीप्रमाणे बुजगावणे म्हणून पाहण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. राज्य महामार्गावर एसटी महामंडळाच्या हजारो बस धावतात.लांब पल्ल्यांच्या बसमध्ये प्रवाशांचे मनोरंजन व्हावे, या हेतूने ही वायफाय सुविधा बसमध्ये सुरू करण्यात आली. बहुतांशबसमध्ये वायफाय मशिन आहे, पण त्या बंद अवस्थेत आहेत. याबाबत चालक व वाहकांना विचारले असता, या मशिन बसमध्ये बसविल्यापासून बंदच आहेत. वायफाय सुविधा सुरू झालीच नाही. प्रवाशांना हे मशिन फक्त शो पीस म्हणून पाहावे लागत आहे.एसटीमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध असेल या अपेक्षेने प्रवासी बसमधून प्रवास करतात. मात्र, ऐनवेळी वायफाय बंद असल्याचे समजताच प्रवाशांमध्ये निराशा पसरते. तरी एसटी प्रशासनाने याची दखल घेऊन एसटीमध्ये ही सुविधा विनाअडथळा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.एसटीचे घोषवाक्यठरतेय निरर्थकशासनाच्या वतीने अनेक योजना जाहीर केल्या जातात, मात्र प्रभावीपणे राबविल्या जात नाहीत. लाभधारकांना प्रत्यक्ष त्या योजनेचा लाभ मिळतो किंवा नाही या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अनेक योजना बारगळल्याचे दिसून येत आहे. एसटीमध्ये प्रवास, करमणूक हमखास हे घोषवाक्य निरर्थक आहे. यामुळे प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर आगारामध्ये ५८ बस आहेत. त्या सर्व बसमध्ये वायफाय सुविधा सहा महिन्यांपासून सुरू आहे. एखाद्या बसमधील वायफाय मशिन बंद पडल्यानंतर कर्मचारी लगेच दुरुस्त करून घेतात. ही प्रवाशांसाठीची वायफाय सुविधा प्रभावीपणे राबविणार आहे.- अनिल भिसे,आगार व्यवस्थापक, वल्लभनगरशिवाजीनगर आगारातील तीन बस शालेय सहलीसाठी आणल्या होत्या. त्या तीनही बसमध्ये वायफाय सुविधा मशिन होत्या. मात्र या मशिन बंद अवस्थेत होत्या. ही सुविधा पूर्णत: फसवी असल्यामुळे प्रवाशांची दिशाभूल होत आहे. पीएमपीप्रमाणे कर्तव्यदक्ष अधिकाºयांची नितांत आवश्यकता आहे.- बिपीन बनकर, शिक्षक, औंध