शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: August 5, 2015 03:15 IST

येथील ग्रामपंचायतींच्या १७ जागांसाठी ७५ जण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सर्वांचे भवितव्य मतदान यंत्रात सीलबंद झाले आहे. सहा आॅगस्ट रोजी देहूचे नवे कारभारी

देहूगाव : येथील ग्रामपंचायतींच्या १७ जागांसाठी ७५ जण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सर्वांचे भवितव्य मतदान यंत्रात सीलबंद झाले आहे. सहा आॅगस्ट रोजी देहूचे नवे कारभारी नक्की कोण असणार याचा फैसला होणार आहे.उमेदवारसमर्थक व घरातील सुवासिनींनी मतदान यंत्राची पूजा करून मतदानाला सुरुवात केली. पहिल्या दोन तासांतच उमेदवारांच्या घरातील मतदारांनी व जवळच्या कार्यकर्त्यांनी मतदान करून घेतले. काही कार्यकर्ते मतदारांना घरोघरी जाऊन मतदानाचे आवाहन करीत होते. त्यामुळे पहिल्या दोन तासांतच मतदानाचा वेग चांगला होता. दहाच्या सुमारास वॉर्ड क्रमांक तीन, पाच व सहामध्ये काहीसे मंद गतीने मतदान सुरू होते. त्यामुळे मतदानाचा वेगही मंदावला होता आणि मतदान कर्मचारी मतदारांची वाट पाहत असल्याचे चित्र होते. दुपारी तीन वाजल्यानंतर मतदार खऱ्या अर्थाने घराबाहेर पडले आणि मतदान केंद्रांच्या बाहेर रांग लागण्यास सुरुवात झाली. काही उमेदवार १०० मीटर अंतराच्या आत, तर काही उमेदवारांचे समर्थक मतदान इमारतीच्या परिसरात उभे राहून मतदारांना मार्गदर्शन करताना दिसत होते. पोलिसांना बंदोबस्तासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. काही कार्यकर्ते वॉर्डातील वयस्कर लोकांना आणत होते, मतदान केंद्र लांब असल्याने काही कार्यकर्ते वाहने घेऊन आणण्याचे काम करीत होते. मतदारांना मतदान स्लिप देण्यासाठी मतदान बूथवर लॅपटॉप, मोबाईल या साधनांचा वापर करून तत्काळ मतदारयादीचा नंबर व खोली क्रमांक देत होते. विठ्ठलनगरमधील पाच व सहा वार्डमध्ये उमेदवारही अनुक्रमे १७ व १४ होते. त्यामुळे त्यांचे देहू-आळंदी रस्त्यावर मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी बूथ रस्त्याच्या कडेला टाकलेले असल्याने कार्यकर्त्यांची गर्दी असल्याने वाहतुकीची दिवसभर कोंडीच होती. त्यामुळे वाहतुकीचा बोजबारा उडाला होता. दुपारच्या वेळी सर्वच उमेदवारांच्या बूथमधीलकार्यकर्त्यांना व मतदान प्रतिनिधींना नाष्टा पुरविण्याचे काम करत होते. मतदानाची वेळ संपत आली तशी उमेदवारांची मतदान करून घेण्यासाठी तगमग सुरू झाली. परिणामी चार वाजल्यानंतर वार्ड क्रमांक २, तीनच्या मतदान केंद्राबाहेर लांब रांगा लागण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पोलिसांनाही मतदानप्रक्रिया, वाहतूक व्यवस्था, कार्यकर्त्यांना आवर घालणे हे जिकिरीचे होत होते. प्रशासकीय यंत्रणाही सतर्क होती. (वार्ताहर)