शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

दक्षिण प्रवेशद्वार वाहतूक समस्यांच्या गर्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 03:14 IST

पिंपरी-चिंचवड शहराचे दक्षिण दिशेला असलेला हिंजवडी-वाकड परिसर आयटीपार्कच्या वर्दळीमुळे कायमच वाहतुकीच्या समस्येने ग्रासलेला असतो

हिंजवडी : पिंपरी-चिंचवड शहराचे दक्षिण दिशेला असलेला हिंजवडी-वाकड परिसर आयटीपार्कच्या वर्दळीमुळे कायमच वाहतुकीच्या समस्येने ग्रासलेला असतो. येथील वाढते शहरीकरण, शैक्षणिक संस्था, कोलमडलेली वाहतूक व्यवस्था, वाहनांच्या संख्येत होणारी लक्षणीय वाढ आणि त्या तुलनेत तोकडी व्यवस्था यामुळे परिस्थिती अतिशय गंभीर होत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांना जोडणा-या मार्गावर वेळीच उपाययोजना न केल्यास वाहतुकीची समस्या अधिक गंभीर होणार आहे.हिंजवडी परिसरात आयटीपार्कमुळे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सध्या आयटीपार्कमध्ये तीन लाख कर्मचारी काम करत आहेत. यासाठी खासगी व सार्वजनिक अशा जवळपास तीन हजार बसेस वाहतुकीसाठी उपलब्ध आहेत. परिसरातील रस्त्यावर रोज किमान एक लाखांपेक्षा अधिक चारचाकी वाहने धावतात. लाखोंच्या संख्येत दुचाकीस्वार आहेत. पुढील दोन वर्षांत दीड लाख कर्मचाऱ्यांची भर आयटीपार्कमध्ये पडणार आहे. यामुळे वाहतुकीसाठी अधिक सक्षम पर्यायांचा विचार करावा लागणार आहे. आयटी पार्कसाठी सहा रस्ते दोन वर्षांपूर्वी मंजूर झाले आहेत. त्यांचे काम प्रगतिपथावर आहे. परंतु सध्या केवळ दोन रस्ते खुले आहेत. दोन्ही रस्ते पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून जातात. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात येणाºया रस्त्यांवर अतिरिक्त ताण येत आहे.सांगवी, पिंपळे-निलख, वाकड, थेरगाव परिसरातही वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत आहे. यातही नियोजनबद्ध वाहतूक असल्यास काही प्रमाणात वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागतो. वाहतूक विभागाने सुरू केलेली बस लेनमुळे बस वेळेत पोहोचतात. अलीकडे या बस लेनहून दुचाकीस्वार जाताना दिसतात. यामुळे परिस्थिती अधिक कठीण होते. आयटी कंपन्यांच्या एचआयए संस्थेतील कंपन्यांनी कामाच्या वेळेत बदल केल्याने काही प्रमाणात वाहतूक सुरळीत होताना दिसत आहे.