शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

राज्यात उभारणार रेशीम प्रशिक्षण केंद्र - सुभाष देशमुख  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 02:54 IST

राज्यामध्ये ‘रेशीम प्रशिक्षण केंद्र’ उभारण्यासाठी रेशीम संचालनालयामार्फत राज्य शासनाकडे पाठविल्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याला मंजुरी देण्यात येईल असे आश्वासन सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.

पुणे : राज्यामध्ये ‘रेशीम प्रशिक्षण केंद्र’ उभारण्यासाठी रेशीम संचालनालयामार्फत राज्य शासनाकडे पाठविल्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याला मंजुरी देण्यात येईल असे आश्वासन सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले. रेशीम उत्पादकांना कर्नाटकात जाऊन प्रशिक्षण घ्यावे लागत असून भाषेच्या अडचणीमुळे त्याला लाभ मिळत नसल्याचेही ते म्हणाले.रेशीम संचालनालयाच्या वतीने महारेशीम अभियान व राज्यस्तरीय हातमाग कापड स्पर्धा, पुरस्कार वितरण समारंभाचे शुक्रवारी आयोजन करण्यात आलेले होते. या वेळी वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास आणि मत्सव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर, वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव उज्ज्वल उके, रेशीम संचालनालयाचे संचालक संजय मीणा, बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे आदी उपस्थित होते.जगाच्या तुलनेत रेशीम उत्पादन आपल्या देशात चिंताजनक आहे. चीनमध्ये रेशीमचे उत्पादन १३ टक्के असून आपल्याकडील हे प्रमाण अत्यंत तुरळक आहे. यामधून तळागाळात उद्योग निर्माण होऊ शकतील. या व्यवसायात अडचणी आहेत, विक्री करताना कर्नाटकात फसवणुकीचे प्रकार घडतात. समतादूतांनी यावर काम करावे. समूह केल्याशिवाय मनरेगाची योजना राबविता येणार आहे. त्यासाठी शेतकºयांचे गट करून मनरेगाची योजना राबवण्यासोबतच मनरेगाला निधीची कमतरता भासून न देता समतादूताच्या माध्यमातून मनरेगाची योजना प्रभावीपणे राबवणार असल्याचे ते म्हणाले. पैठणीचे ब्रँडिंग करून माल विकण्यासोबतच ग्रामीण भागातील हातमाग उत्पादकांनी मोठ्या शहरांमध्ये प्रदर्शने भरवावीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकºयांना उत्पादन खर्चात पन्नास टक्के नफा देण्याचा केलेला संकल्प रेशीम उत्पादनातून शक्य आहे. त्यामुळे राज्यातील रेशीम उत्पादनाचा टक्का वाढविण्यासाठी संशोधन व प्रशिक्षण केंद्रासह परदेश दौरे काढण्यास परवानगी दिली जाणार असल्याचे देशमुख म्हणाले.खोतकर म्हणाले, की राज्यात हातमाग व रेशीम उद्योगाची स्थिती बदलून त्याला गती देण्याची आवश्यकता आहे.कृती आराखड्याचे नियोजन आवश्यकपरदेशातील नवनवीनसंकल्पनांचा आपल्या शेतकºयांना लाभ होऊन उत्पादन वाढण्यास मदत मिळेल. समतादूताच्या सहकार्याने मनरेगाच्या माध्यमातून केवळ पंचवीस दिवसात पाच हजार एकरांवर तुतीचे क्षेत्र वाढविण्यात आले असून आगामी दोनशे दिवसांच्या कृती आराखड्याचे नियोजन करावे, असेही देशमुख म्हणाले.पुणे आणि औरंगाबादमध्ये रेशीम प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. एक संशोधन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले. शेतकरी अभ्यासू असून त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. उत्पादकांना प्रशिक्षण अथवा माहिती घेण्यासाठी परदेशात जायचे असल्यास त्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात येईल.- सुभाष देशमुख, सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारGovernmentसरकारSubhash Deshmukhसुभाष देशमुख