शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

‘शॉर्टकट’ ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 05:42 IST

आठवडाभराच्या कालावधीत पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ सहा जणांचा रुळ ओलांडताना अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनांतून धोकादायक पद्धतीने रुळ ओलांडणे जिवावर बेतू लागल्याचे निदर्शनास आले आहे. 

ठळक मुद्देपिंपरी रेल्वे स्थानक प्रवासी घालताहेत जीव धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : कोयना एक्सप्रेसच्या धडकेत एका महिलेसह दोन मुले ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ घडली. लोकलमधून उतरून रुळ ओलांडत असताना, ही दुर्घटना घडली. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी प्रशस्त असा पादचारी पूल उभारला आहे. या पुलाचा वापर करण्याचे प्रवासी टाळतात. जोखीम पत्करून शॉर्टकट म्हणून अनेकजण रुळ ओलांडतात. ही परिस्थिती पिंपरीसह अन्य रेल्वे स्थानकांजवळ नेहमी पहावयास मिळते. आठवडाभराच्या कालावधीत पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ सहा जणांचा रुळ ओलांडताना अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनांतून धोकादायक पद्धतीने रुळ ओलांडणे जिवावर बेतू लागल्याचे निदर्शनास आले आहे. पुणे ते लोणावळा दरम्यान धावणार्‍या लोकल रेल्वेगाड्यांबरोबर या मार्गे धावणार्‍या एक्सप्रेस गाड्यांची संख्याही मोठी आहे. लोकल गाड्यांच्या लोणावळा ते पुणे आणि पुणे ते लोणावळा या मार्गावर दर तासाला फेर्‍या सुरू असतात. वेळापत्रकानुसार या मार्गावरून विविध एक्सप्रेस गाड्या धावतात. मुंबईतील परेल एलफिस्टन रस्ता येथील रेल्वे स्थानकावर पूल पडला, अशी अफवा पसरल्याने एकच गर्दी उसळून चेंगराचेंगरी झाली. ४ ऑक्टोबरला घडलेल्या या दुर्घटनेत २९ जणांचा बळी गेला. मुंबईतील रेल्वे पादचारी पुलांचा सर्रास वापर होतो. अनेकदा क्षमतेपेक्षा अधिक लोक या पुलावरून ये-जा करतात. याउलट परिस्थिती पुणे ते लोणावळा दरम्यानच्या रेल्वे स्थानकांवर पहावयास मिळते. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी उपलब्ध करून दिलेल्या पादचारी पुलाचा वापर करण्याचे प्रवासी टाळतात. पुलावरून जाण्यापेक्षा शॉर्टकट म्हणून ते राजरोसपणे रुळ ओलांडतात. 

पादचारी पुलावर भिकार्‍यांचा ठिय्या पादचारी पुलाचा वापर प्रवाशांकडून होत नाही, त्यामुळे नेहमी वर्दळ असलेल्या रेल्वे स्थानकांमधील पादचारी पुलांवरही प्रवासी दिसून येत नाहीत. या पुलाच्या पायर्‍यांवर काही ठिकाणी भिकारी झोपलेले दिसतात, तर काही पायर्‍यांवर गदरुल्यांनी आश्रय घेतल्याचे दिसून येते.रेल्वे स्थानकावरील ध्वनिक्षेपकावरून प्रवाशांना वेळोवेळी सुरक्षिततेसंबंधी सूचना दिल्या जातात. प्रवाशांनी धोकादायक पद्धतीने रुळ ओलांडण्याची घाई करू नये. त्यांनी पादचारी पुलाचाच वापर करावा, असे निवेदन ध्वनिक्षेपकावरून वेळोवेळी केले जाते. परंतु त्या निवेदनाची अनेक प्रवासी गंभीर दखल घेत नाहीत.  रुळ ओलांडण्याचे प्रकार आकुर्डी, चिंचवड, कासारवाडी, दापोडी, खडकी रेल्वेस्थानकावरही पहावयास मिळतात. 

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासी