शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

शिवसेना-भाजपात वाक्युद्ध, लोकसभा निवडणुकीपूर्वीच रंगू लागला आखाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:58 IST

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांमध्ये वाक्युद्ध सुरू झाले आहे.

पिंपरी : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांमध्ये वाक्युद्ध सुरू झाले आहे. शिवसेनेच्या तिकिटावर लोकसभा निवडणुकीत निवडून येऊन दाखवा, असे आव्हान भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी मंगळवारी दिले होते. त्यास खासदार श्रीरंग बारणे यांनी बुधवारी उत्तर दिले आहे. जगतापांचे आव्हान शुभशकुन असून, शिवसेनेवर टीका करणे हे बालिशपणाचे लक्षण असल्याचे उत्तर बारणे यांनी दिले आहे.मुंबईतील शिवसेनेच्या बैठकीत भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्यावरून पुणे जिल्ह्यातील दोन नेत्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. त्यानंतर आमदार जगताप यांनी खासदार बारणे यांच्यावर पत्रक काढून टीका केली होती. गेल्या तीन दिवसांपासून शिवसेना आणि भाजपातील वाक्युद्ध रंगू लागले आहे. त्यास बारणे यांनी उत्तर दिले आहे.खासदार बारणे म्हणाले, ‘‘अनेक दिवस जगताप कार्यकर्त्यांमार्फत टीकात्मक पत्रके काढून डिवचण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, काल त्यांनीच थेट टीका केली. जनसंपर्क, सर्वसामान्यांच्या सुख-दु:खामध्ये धावून जाणारी असलेली माझी प्रतिमा त्याचबरोबर अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रवृत्ती, तसेच माझ्यातील लढाऊपणा व लोकसभेतील कामाचा चढता आलेख पाहून जनता माझ्याशी जोडली असून, कोणतेही कारण नसताना माझी धास्ती घेतल्यामुळेच लोकसभेच्या निवडणुकीला सव्वा वर्षापेक्षा जास्त कालावधी असताना उसने अवसान आणून आव्हान देत आहेत. बारणे उमेदवार असेल, तरच मी लोकसभा लढणार, असे आव्हान त्यांनी २०१४ च्या निवडणुकीपूर्वी दिले होते. मात्र, मी विजयी झालो. आता पुन्हा आव्हान दिले. हा शुभशकुनच आहे. टीका करताना त्यांनी स्वत:चा इतिहास तपासावा. भाजपामुळे मूठभर मांस अंगावर चढल्याने कदाचित कोणतेही कारण नसताना टीका करीत आहेत. तीन वर्षांपेक्षा कमी काळ भाजपामध्ये दाखल झालेले संपूर्ण राज्यातील, केंद्रातील व स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्ता मीच आणल्याचा आव आणून ऊर बडवत आहेत.युतीतील खासदार आहे, हे मी विसरलो नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचा कालावधी ते विसरले आहेत. लोकसभा लढण्यापूर्वी आमदारकीचा राजीनामा देण्याचे नाटक करून त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून शेकापच्या गठ्ठा मतांवर डोळा ठेवून त्या पक्षात प्रवेश केला. शेकाप, मनसे आघाडी, राष्ट्रवादीची सर्व फौज बरोबर घेतली, तरीही पराभव पत्करावा लागला.>श्रीरंग बारणे : टीका बालीशपणाचे लक्षणमरेपर्यंत शेतकरी कामगार पक्ष सोडणार नाही, अशी शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या तंबूत पुन्हा दाखल झाले. आत्मपरीक्षण करून टीका करावी. तीन वर्षांच्या लोकसभेतील कामकाजाचा लेखाजोखा केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तो त्यांनी पाहून घ्यावा. गेली १३ वर्षे विधानसभेमध्ये किती वेळा तोंड उघडले, हे देखील जनतेला सांगावे. शिवसेनेच्या अंतर्गत संवादाबाबत बोलण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? मातोश्रीच्या पायºया झिजवणाºयांना शिवसेना नेत्यांनी थारा दिला नाही, याचेच भान ठेवावे. समाजवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, शेकाप, मनसेचा पाठिंबा, पुन्हा राष्ट्रवादी कॉँग्रेस, मोदी लाटेत भाजपा प्रवास करणाºयांनी निष्ठा शिकवू नये. टीका करणे त्यांचा बालिशपणा, सत्तेची व पैशाची मस्ती आहे, असे बारणे म्हणाले.