शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

"हवा बदलल्यामुळे पवारांची पक्ष विलीनीकरणाची भाषा..." महायुतीच्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीसांची टीका

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: May 11, 2024 10:13 IST

महायुतीतील राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारार्थ भोसरीत शुक्रवारी सभा झाली...

पिंपरी : बारामतीचे मतदान झाले आणि शरद पवार यांचे पक्ष विलीनीकरणाचे वक्तव्य आले. त्यामुळे मौसम बदलला आहे. ज्यांंचं दुकान चालत नाही, तेच आपल्या दुकानातील माल दुसऱ्यास विकतात. हवा बदलली आहे, हे शरद पवारांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे ते पक्ष विलिनीकरणाची भाषा करत आहेत. त्याचे ऐकून उद्धव ठाकरे हेही आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील. मात्र, काँग्रेस बुडती नाव आहे, त्यामुळे पक्ष विलीन करायचे असतील तर खऱ्या पक्षांमध्ये करा, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

महायुतीतील राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारार्थ भोसरीत शुक्रवारी सभा झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, माजी महापौर राहुल जाधव आदी उपस्थित होते.

पिंपळे सौदागर ते चाकण मेट्रो जोडणार

फडणवीस म्हणाले, पिंपरी-चिंचवड रेडझोनचा विषय आम्ही घेतला आहे. तो सोडवण्यास महायुती कटिबध्द आहे. इंद्रायणी सुधारचे कामही सुरू केले. मेट्रो कनेक्टीव्हीटी शहरात आणली, निगडीपर्यंतच्या मार्गाची निविदा काढली आहे. पिंपळे सौदागर, वाकड ते चाकण पर्यंत आपण मेट्रो आणणार आहोत. पुणे-पिंपरी-चिंचवड बरोबरच प्राधिकरणाच्या हद्दीतील भागही मेट्रोतून जोडणार आहोत. पिंपरी-चिंचवड, पुणे औद्योगिक शहर असूनही वाहतूक समस्या आहे. ती समस्या सोडविण्यासाठी दोन-तीन मजली रस्ते तयार करण्याचे प्रस्ताव तयार केले आहेत. पीएमपीमध्ये इलेक्ट्रिक बस आणल्या, त्यामुळे पर्यावरणपुरक काम करता आल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

कोल्हे चांगले कलाकार...

समोरचे उमेदवार हे चांगले कलाकार आहेत. ते कलाकार होवू शकतात, खासदार नाही. चोखंदळ रसिक पहिल्यांदा तिकिट काढून सिनेमा पाहतो, मात्र सिनेमा किंवा नाटक फ्लॉप असेल तर ते परत पाहत नाहीत. त्यामुळे यावेळी तो रसिक परत तोच चित्रपट पाहत नाहीत. कोल्हे प्रचारात नाटकांतून निवृत्तीची भाषा करत आहेत. मात्र, निवडणूका झाल्या की ते परत नाटकचं करणार आहेत. खासदार नसतांना आढळराव पाटलांनी निधी आणला. त्यामुळे खासदार म्हणून आढळराव यांना निवडायचे आहेत. त्यामुळे मतदारांनी परत सिनेमा किंवा नाटक पहायचं नाही ठरवलं आहे, असाही विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

विरोधकांकडे नेता, निती आणि नियतही नाही...

फडणवीस म्हणाले, महायुतीच्या विरोधात चोवीस पक्ष एकत्र आले आहेत. तरीही त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरला नाही. महायुतीचे पंतप्रधान मात्र मोदीच आहेत. त्यांच्याकडे नेता, निती आणि नियतही नाही. पाच वर्षात पाच पंतप्रधान करू, असे विरोधकांपैकी एकाने विधान केले. पाच वर्षांत पाच पंतप्रधान संगीत खुर्चीतून बनवणार आहेत का? असा सवालही फडणवीस यांनी केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारshirur-pcशिरूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४