शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

"हवा बदलल्यामुळे पवारांची पक्ष विलीनीकरणाची भाषा..." महायुतीच्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीसांची टीका

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: May 11, 2024 10:13 IST

महायुतीतील राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारार्थ भोसरीत शुक्रवारी सभा झाली...

पिंपरी : बारामतीचे मतदान झाले आणि शरद पवार यांचे पक्ष विलीनीकरणाचे वक्तव्य आले. त्यामुळे मौसम बदलला आहे. ज्यांंचं दुकान चालत नाही, तेच आपल्या दुकानातील माल दुसऱ्यास विकतात. हवा बदलली आहे, हे शरद पवारांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे ते पक्ष विलिनीकरणाची भाषा करत आहेत. त्याचे ऐकून उद्धव ठाकरे हेही आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील. मात्र, काँग्रेस बुडती नाव आहे, त्यामुळे पक्ष विलीन करायचे असतील तर खऱ्या पक्षांमध्ये करा, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

महायुतीतील राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारार्थ भोसरीत शुक्रवारी सभा झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, माजी महापौर राहुल जाधव आदी उपस्थित होते.

पिंपळे सौदागर ते चाकण मेट्रो जोडणार

फडणवीस म्हणाले, पिंपरी-चिंचवड रेडझोनचा विषय आम्ही घेतला आहे. तो सोडवण्यास महायुती कटिबध्द आहे. इंद्रायणी सुधारचे कामही सुरू केले. मेट्रो कनेक्टीव्हीटी शहरात आणली, निगडीपर्यंतच्या मार्गाची निविदा काढली आहे. पिंपळे सौदागर, वाकड ते चाकण पर्यंत आपण मेट्रो आणणार आहोत. पुणे-पिंपरी-चिंचवड बरोबरच प्राधिकरणाच्या हद्दीतील भागही मेट्रोतून जोडणार आहोत. पिंपरी-चिंचवड, पुणे औद्योगिक शहर असूनही वाहतूक समस्या आहे. ती समस्या सोडविण्यासाठी दोन-तीन मजली रस्ते तयार करण्याचे प्रस्ताव तयार केले आहेत. पीएमपीमध्ये इलेक्ट्रिक बस आणल्या, त्यामुळे पर्यावरणपुरक काम करता आल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

कोल्हे चांगले कलाकार...

समोरचे उमेदवार हे चांगले कलाकार आहेत. ते कलाकार होवू शकतात, खासदार नाही. चोखंदळ रसिक पहिल्यांदा तिकिट काढून सिनेमा पाहतो, मात्र सिनेमा किंवा नाटक फ्लॉप असेल तर ते परत पाहत नाहीत. त्यामुळे यावेळी तो रसिक परत तोच चित्रपट पाहत नाहीत. कोल्हे प्रचारात नाटकांतून निवृत्तीची भाषा करत आहेत. मात्र, निवडणूका झाल्या की ते परत नाटकचं करणार आहेत. खासदार नसतांना आढळराव पाटलांनी निधी आणला. त्यामुळे खासदार म्हणून आढळराव यांना निवडायचे आहेत. त्यामुळे मतदारांनी परत सिनेमा किंवा नाटक पहायचं नाही ठरवलं आहे, असाही विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

विरोधकांकडे नेता, निती आणि नियतही नाही...

फडणवीस म्हणाले, महायुतीच्या विरोधात चोवीस पक्ष एकत्र आले आहेत. तरीही त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरला नाही. महायुतीचे पंतप्रधान मात्र मोदीच आहेत. त्यांच्याकडे नेता, निती आणि नियतही नाही. पाच वर्षात पाच पंतप्रधान करू, असे विरोधकांपैकी एकाने विधान केले. पाच वर्षांत पाच पंतप्रधान संगीत खुर्चीतून बनवणार आहेत का? असा सवालही फडणवीस यांनी केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारshirur-pcशिरूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४