शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

गावोगावचे सांडपाणी थेट नदीत

By admin | Updated: May 10, 2017 04:03 IST

पवन मावळाची वरदायिनी समजली जाणारी पवना नदी शहरी भागाकडे जात असताना प्रदूषणाच्या विळख्यात सापडू लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिवणे : पवन मावळाची वरदायिनी समजली जाणारी पवना नदी शहरी भागाकडे जात असताना प्रदूषणाच्या विळख्यात सापडू लागली आहे. ठिकठिकाणी सांडपाणी नदीत मिसळत आहे.पवना धरणातून बारा महिने पाणी मिळत असल्याने पवनेकाठची गावे सुजलाम् सुफलाम् झाली आहेत. या भागातील शेतकरी समृद्ध झाला आहे. परंतु अलीकडे पवनेचे स्वच्छ व सुंदर पाणी दूषित होत असल्याची चर्चा गावोगावी ऐकायला मिळत आहे. थुगाव येथील नदीत मोठ्या प्रमाणात खडक असल्याने कपडे व गोधड्या धुण्यासाठी परिसरातील महिलांची सकाळीच गर्दी असते. नदीतच गोधड्या व कपडे धूत असल्याने काही प्रमाणात पाणी दूषित होते.शिवणे व परिसरातील पिंपळखुटे, मळवंडी ढोरे, थुगाव, आर्डव, कडधे, बऊर, करुंज, सडवली व आडे आदी गावांत दुग्ध व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्याकडे गाय, बैल, म्हैस या जनावरांचे प्रमाणही जास्त आहे. या जनावरांना पाणी पाजण्यासाठी थेट नदीत सोडले जाते. नदीतच त्यांना आंघोळ घातली जाते. त्यामुळेही पाणी दूषित होते. पावसाळ्यात तर डोंगरावरील दगड, माती वाहून ओढ्या-नाल्यातील घाण पाण्यावाटे थेट नदीपात्रात येते. नदीकाठच्या गावातील गटाराचे पाणी थेट नदीत सोडले जाते. प्रदूषित होत असलेले पाणी नदीतून नळाद्वारे थेट पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. कारण कोणत्याही गावात फिल्टर बसवलेले नसल्याने येथील नागरिकांना हेच पाणी प्यावे लागते. त्यामुळे वारंवार आजारी पडण्याचे प्रमाण पावसाळ्यात अधिक प्रमाणात आढळते. नदी किनारी कपडे धुण्यासाठी आणि जनावरांसाठी वेगळी व्यवस्था करण्याची गरज असून, गावोगावी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांची आवश्यकता आहे. सध्यातरी या विभागात पवनेचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होईल असे कारखाने किंवा प्रकल्प नाहीत. परंतु या विभागात बौर एमआयडीसी प्रकल्प मंजूर झाला आहे. त्यामुळे प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे.