शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

गावोगावचे सांडपाणी थेट नदीत

By admin | Updated: May 10, 2017 04:03 IST

पवन मावळाची वरदायिनी समजली जाणारी पवना नदी शहरी भागाकडे जात असताना प्रदूषणाच्या विळख्यात सापडू लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिवणे : पवन मावळाची वरदायिनी समजली जाणारी पवना नदी शहरी भागाकडे जात असताना प्रदूषणाच्या विळख्यात सापडू लागली आहे. ठिकठिकाणी सांडपाणी नदीत मिसळत आहे.पवना धरणातून बारा महिने पाणी मिळत असल्याने पवनेकाठची गावे सुजलाम् सुफलाम् झाली आहेत. या भागातील शेतकरी समृद्ध झाला आहे. परंतु अलीकडे पवनेचे स्वच्छ व सुंदर पाणी दूषित होत असल्याची चर्चा गावोगावी ऐकायला मिळत आहे. थुगाव येथील नदीत मोठ्या प्रमाणात खडक असल्याने कपडे व गोधड्या धुण्यासाठी परिसरातील महिलांची सकाळीच गर्दी असते. नदीतच गोधड्या व कपडे धूत असल्याने काही प्रमाणात पाणी दूषित होते.शिवणे व परिसरातील पिंपळखुटे, मळवंडी ढोरे, थुगाव, आर्डव, कडधे, बऊर, करुंज, सडवली व आडे आदी गावांत दुग्ध व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्याकडे गाय, बैल, म्हैस या जनावरांचे प्रमाणही जास्त आहे. या जनावरांना पाणी पाजण्यासाठी थेट नदीत सोडले जाते. नदीतच त्यांना आंघोळ घातली जाते. त्यामुळेही पाणी दूषित होते. पावसाळ्यात तर डोंगरावरील दगड, माती वाहून ओढ्या-नाल्यातील घाण पाण्यावाटे थेट नदीपात्रात येते. नदीकाठच्या गावातील गटाराचे पाणी थेट नदीत सोडले जाते. प्रदूषित होत असलेले पाणी नदीतून नळाद्वारे थेट पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. कारण कोणत्याही गावात फिल्टर बसवलेले नसल्याने येथील नागरिकांना हेच पाणी प्यावे लागते. त्यामुळे वारंवार आजारी पडण्याचे प्रमाण पावसाळ्यात अधिक प्रमाणात आढळते. नदी किनारी कपडे धुण्यासाठी आणि जनावरांसाठी वेगळी व्यवस्था करण्याची गरज असून, गावोगावी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांची आवश्यकता आहे. सध्यातरी या विभागात पवनेचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होईल असे कारखाने किंवा प्रकल्प नाहीत. परंतु या विभागात बौर एमआयडीसी प्रकल्प मंजूर झाला आहे. त्यामुळे प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे.