शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सेवा रस्त्यावर अपघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 01:34 IST

उड्डाणपुलाच्या कामाची मुदत संपूनही प्रगती नाही. या कामात अनेक कामे प्रलंबित राहिल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. महामार्गावरील वाहतूक उड्डाणपुलाच्या कामासाठी

कामशेत : मुंबई-पुणे महामार्गावरील पवनानगर फाटा येथे मागील दीड वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्याने वळविली आहे. सेवा रस्त्याच्या कडेला पावसाचे व सांडपाणी यासाठी सिमेंट पाईप गटार व्यवस्था केली असून, या ठिकाणी चेंबर लावले नसल्याने येथे अपघाताचा धोका संभवत आहे.

उड्डाणपुलाच्या कामाची मुदत संपूनही प्रगती नाही. या कामात अनेक कामे प्रलंबित राहिल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. महामार्गावरील वाहतूक उड्डाणपुलाच्या कामासाठी आठ महिन्यांपूर्वी सेवा रस्त्याने वळविली आहे. या सेवा रस्त्याच्या कडेला सांडपाणी तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्था केली आहे. कामशेत खिंड ते नायगाव ओढा भागापर्यंत सिमेंट पाईप टाकण्यात आले आहेत. मात्र अनेक ठिकाणी चेंबर पाईपच्या साईजचे नाही अथवा इतर कारणाने लावण्यात आले नसल्याने सेवा रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी गटारी उघड्या आहेत. काही भागात उड्डाणपुलाच्या कामाचे आरई पॅनल या उघड्या गटारींवर तात्पुरते टाकून झाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र एखादे वाहन या भागात शिरून प्रवाशांच्या जिवास धोका होऊ शकतो. खडीवरून घसरून अनेक दुचाकीस्वार यात पडत आहेत, तर चारचाकी वाहने या भागात वाहनावरील नियंत्रण सुटून अडकत आहेत. मागील आठवड्यात एक चारचाकी वाहन या खड्ड्यात पडता पडता वाचले.कामशेत भागातील खराब झालेला सेवारस्ता पुन्हा एकदा बनवण्यात आला असून, या रस्त्यावर खडी मोठ्या प्रमाणात टाकल्याने मोठी अवजड वाहने जाऊन खडी रस्त्याच्या कडेला साचली आहे. यातून प्रवास करताना दुचाकीस्वार घसरून अपघातांचे प्रमाण वाढले आहे.लोणावळा, खंडाळा आदी ठिकाणी पर्यटनासाठी जाणाऱ्या दुचाकीस्वारांचे रस्त्याचा अंदाज न आल्याने व खडीवरून दुचाकी घसरून अपघात होत आहेत. या किरकोळ अपघातांची तक्रार ते पोलीस ठाण्यात न करता निघून जात नसल्याने या भागातील रस्त्याचे गांभीर्य एमएसआरडी राज्य रस्ते विकास महामंडळ व संबंधित ठेकेदार कंपनी यांना कळत नसल्याचे काही जागरूक नागरिक सांगत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे