शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

सांगवीफाटा जणू मृत्यूचा सापळा

By admin | Updated: October 19, 2015 01:44 IST

पिंपरी-चिंचवड शहराची वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून अनेक रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. मात्र, याचा फायदा वाहनचालकांना होत नसून, रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना होत आहे.

शिवप्रसाद डांगे, रहाटणीपिंपरी-चिंचवड शहराची वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून अनेक रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. मात्र, याचा फायदा वाहनचालकांना होत नसून, रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना होत आहे. सांगवी फाटा येथे बीआरटीएस रस्त्यावर अनधिकृत हातगाडीवाले, फेरीवाल्या फळविके्रत्यांमुळे या ठिकाणी बाजाराचे स्वरूप येत आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता वाढली आहे. सांगवी फाटा म्हणजे मृत्यूचा सापळा झाला असल्याचे दिसत असल्याने महापालिका प्रशासनाकडून योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.सांगवी फाटा या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे वाहन चालविताना कसरत करावी लागते. या मार्गाने मावळ, मुंबई, पिंपरी-चिंचवड या परिसरात नागरिक जातात. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वाहनांची मोठी वर्दळ असते. याचाच फायदा घेत फळविक्रेत्यांनी चौकाच्या पुढे बीआरटीएस रस्त्यावर ठिय्या मांडला आहे. खरेदी करण्यासाठी ग्राहक वाहतूक नियमांचे पालन न करता अचानक वाहन थांबवितात. अचानक वाहने वळविली जातात. तेथे काही वेळा भांडणाचे प्रकारही घडत आहेत. धोकादायक परिस्थिती असूनही ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाचा अतिक्रमण विभाग कारवाईबाबत उदासीन आहे. भर रस्त्यावर राजरोस अनधिकृत व्यवसाय सुरू असतानाही महापालिकेचे अधिकारी डोळेझाक करीत आहे. त्यामुळे वाहनचालक संताप व्यक्त करीत आहेत.रस्ता रुंदीकरणाचा उद्देश कामचुकार व निष्क्रिय अधिकारी, कर्मचाऱ्यामुळे साध्य होत नाही.अनेक वेळा अनधिकृत हातगाडीवाले, फेरीवाले, पथारीवाले यांच्यावर कारवाई केली जाते. परंतु, ज्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे, अशा ठिकाणी कारवाई होत नाही. एखाद्या चौकात अनेक व्यावसायिक असल्यास त्यावर कारवाई होत नाही. मात्र, एखादा हातगाडीवाला रस्त्याच्या कडेला व्यवस्थित व्यवसाय करीत असेल, तर त्याच्यावर हमखास कारवाई होते. सांगवी फाटा, रहाटणी फाटा, शिवार चौक, तापकीर चौक, पाचपीर चौक अशा ठिकाणी कारवाई होणे अपेक्षित असूनही होत नाही. केवळ कारवाईचा आव आणला जातो. मात्र, गल्लीबोळात व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. अशा चौकांतील हातगाड्यांवर कारवाई करण्यासाठी अतिक्रमणविरोधी पथक निघताच हातगाडीवाले बेपत्ता होतात. हे काय गौडबंगाल आहे, असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे.आधुनिक उपनगर म्हणून पिंपळे सौदागरची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. परिसरात कोकणे चौक, गोविंद यशदा चौक व शिवार चौक असे तीन मोठे चौक आहेत. शिवार चौकाची अवस्था फार बिकट आहे. या चौकाला सकाळी -संध्याकाळी यात्रेचे स्वरूप येते. या दोन्ही वेळा शहरातील इतर ठिकाणांहून व्यावसायिक व्यवसाय करण्यासाठी या ठिकाणी येतात. शेकडो गाड्या रस्त्यावर लागलेल्या असतात. त्यामुळे सायंकाळी -सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. या स्वच्छ सुंदर चौकाला बकाल स्वरूप आले आहे.