शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

सत्ताधा-यांमुळेच शास्तीचे भूत, राज्य शासनाची सुविधा बंद  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 06:19 IST

शास्तीकर सवलत आदेश राज्य शासनाने दिल्याने मूळ कर भरण्याची पिंपरी-चिंचवड महापालिकेने उपलब्ध करून दिलेली सुविधा बंद केली आहे. पूर्वलक्ष्यी प्रभावाने शास्ती माफ करणे हाच पर्याय असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. सत्ताधारी भाजपामुळेच शास्तीचे भूत नागरिकांच्या डोक्यावर बसले आहे.

पिंपरी - शास्तीकर सवलत आदेश राज्य शासनाने दिल्याने मूळ कर भरण्याची पिंपरी-चिंचवड महापालिकेने उपलब्ध करून दिलेली सुविधा बंद केली आहे. पूर्वलक्ष्यी प्रभावाने शास्ती माफ करणे हाच पर्याय असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. सत्ताधारी भाजपामुळेच शास्तीचे भूत नागरिकांच्या डोक्यावर बसले आहे. संगणकीय प्रणालीत बदल केल्याने शास्तीकराची थकबाकी वाढली आहे.अनधिकृत बांधकामांचा प्रश्न राज्यभर गाजला होता. महापालिका, लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकाही याच मुद्द्यांवर जिंकल्या होत्या. अनधिकृत बांधकामांचे प्रकरण गाजत असतानाच २००८ नंतरच्या बांधकामांना शास्ती लावण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार महापालिकेनेही दुप्पट शास्ती आकारण्यास सुरुवात केली होती. शास्ती आकारून येणारी रक्कम ही खूप अधिक असल्याने नागरिकांनी शास्ती न भरण्याची भूमिका घेतली होती. अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत शास्ती वगळून मूळ कर भरून घ्यावा, असा निर्णय राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेसच्या सत्ताधाºयांनी घेतला होता. त्यानुसार संगणकीय प्रणालीत बदल करून शास्ती वगळून कर भरण्यास सुरुवात केली होती. परिणामी करभरणाही वाढला होता.शास्तीकराबाबतच्या सूचना शासनाकडून आल्यानंतर महापालिका प्रशासनाने संगणकीय प्रणालीत बदल केला आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामधारक कर भरायला गेल्यानंतर प्रथम शास्तीची रक्कम घेतली जाते. मूळ कर भरून घेतला जात नाही. त्यामुळे मिळकतकराचा भरणा कमी झाला आहे. याबाबत स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनीही प्रशासनास पत्र दिले होते. मात्र, त्यावर प्रशासनाने निर्णय घेतला नाही. कर न जमा होण्यास महापालिका प्रशासनच जबाबदार आहे. अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचे धोरण शासनाने मंजूर केले आहे. शास्तीकराबाबतचे टप्पे हे नियमितीकरण निर्णयापूर्वीचे आहेत. बांधकामे नियमितीकरण धोरण मंजुरीनंतर पूर्वलक्ष्यी प्रभावाने शास्ती रद्द करावी किंवा याबाबत काय निर्णय घ्यावा, याबाबत राज्य शासनास पत्र पाठविले आहे.यामुळेच नाही भरला जात करसमाविष्ट गावे महापालिकेत घेतल्यानंतर त्या भागातील नागरिकांनाही मिळकतकर लावण्यात आला होता. वीज, पाणी, आरोग्य या मूलभूत सेवांच्या तुलनेत कर अधिक होता. थकबाकी वाढल्याने कर रद्द करावा, अशी मागणी झाली होती. या कालखंडात काही नागरिकांनी करही भरला होता. त्यानंतर दहा वर्षांनी कर माफ करण्याचा निर्णय झाला. ज्यांनी कर भरला नाही, त्यांचा माफ झाला. ज्या नागरिकांनी कर भरला त्यांना रक्कम परत मिळाली नाही. त्यामुळे नागरिक कर भरायला धजावत नाहीत. शास्ती वगळून कर भरून घ्यावा, अशी मागणी होत आहे.अधिवेशनातील निर्णयाकडे लक्षशास्तीकर माफ करावा, यासाठी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे, पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडली आहे. त्यावर काय निर्णय होतोय याकडे लक्ष लागले आहे. गेल्या दोन अधिवेशनात यावर निर्णय झालेला नाही.हाच आदेश ठरला अडचणीचाराज्यात सत्ता येताच शास्तीकर शंभर टक्के माफ करू असे आश्वासन भाजपाने दिले होते. राज्यात सत्ता आल्यानंतरही तीनवर्षे हा प्रश्न सुटला नव्हता. महापालिकेच्या निवडणुकीत हा विषय गाजणार आणि मतांवर परिणाम होणार या भीतीने भाजपाच्या नेत्यांनी शास्तीचा एक आदेश नागरिकांना दिला होता. अनधिकृत बांधकामे नियमित होतील तेव्हा होतील. तोपर्यंत शास्तीकर सवलतीचे धोरण आखण्यात आले होते.असा होता आदेश४महापालिका निवडणुकीपूर्वी मतांच्या राजकारणासाठी आदेश काढण्यात आला. त्यात पाचशे स्वेअरफुटापर्यंत शास्ती माफ, त्यानंतर हजार स्क्वेअरफुटापर्यंत पन्नास टक्के शास्ती, त्यापुढील बांधकामांसाठी दुप्पट शास्तीचे धोरण शासनाने मंजूर केले होते. त्यास महासभेने उपसूचना दिली. शास्तीतही टप्पे पाडण्यात आले. सत्ताधारी भाजपाने पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत शास्ती माफ, हजार फुटापर्यंत पन्नास टक्के शास्ती आणि त्यानंतर दुप्पट शास्ती आकारावी, अशी उपसूचना दिली आहे.५०४ कोटी वसूल झाले नाहीतसहाशे चौरस फुटांवरील बांधकामे एकूण ३१३७२ असून त्यांच्याकडे सात कोटी, सहाशे एक ते हजार स्क्वेअर फुटापर्यंत १८ हजार ४६९ बांधकामे असून त्यांच्याकडे ८६.०२ कोटी, एक हजाराच्या पुढील १७ हजार २४३ मिळकत धारकांकडे २२७ कोटी अशा एकूण ६७ हजार ०८४ निवासी मिळकती असून ३७४.०१ कोटींची थकबाकी आहे. तसेच बिगरनिवासी मिळकती ८०२५ असून त्यांच्याकडे ५२.४९ कोटींची थकबाकी आहे. अशा एकूण ५२६.४० कोटींपैकी ५०४ कोटींची थकबाकी वसूल झालेली नाही.

टॅग्स :Taxकरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड