शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सत्ताधारी म्हणतात, कालचा गोंधळ बरा होता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 01:50 IST

शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावर सर्वसाधारण सभेत साडेसहा तास चर्चा झाली.

पिंपरी : शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावर सर्वसाधारण सभेत साडेसहा तास चर्चा झाली. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केवळ प्रशासनावर जोरदार टीका केली. सत्ताधाऱ्यांपैकी काही नगरसेवकांनी ‘...कालचा गोंधळ बरा होता’ अशी उपरोधिक टीका केली. निष्क्रिय प्रशासनावर कारवाई होण्यापेक्षा निष्कर्षविना चर्चा पाण्यात गेली. सत्ताधाºयांनी प्रशासनास अभय दिल्याची टीका होत आहे.महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. चर्चेची सुरुवात शिवसेनेच्या अश्विनी चिंचवडे यांनी केली. त्यांनी अशुद्ध पाण्याची बाटली भेट देत प्रशासनाचा निषेध केला. ‘‘लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे,’’ अशी टीका सुजाता पालांडे यांनीही केली. ‘धरणात मुबलक पाणीसाठा असताना पाणी मुरते कुठे,’ अशी विचारणा राष्ट्रवादीच्या राजू बनसोडे यांनी केली. नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही तोपर्यंत पाणीपट्टी, कर भरू नये, असे आवाहन शिवसेनेचे सचिन भोसले यांनी केले. ‘नागरिकांचा संयम सुटला, तर ते हातात दंडुका घेऊन मागे लागतील, अशी टीका राष्ट्रवादीच्या विनया तापकीर यांनी केली. ‘आमदार, पालकमंत्र्यांचे पाणीपुरवठ्यावर लक्ष नाही. प्रशासन देखील या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही. फक्त मोठ्या निविदांमध्ये रिंग करणे, त्यांचे बैठका घेणे यामध्येच प्रशासन व्यस्त आहे, अशी टीका माजी महापौर योगेश बहल यांनी केली. ‘लोकांना पाणी देऊ शकत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. नगरसेवक म्हणून निवडून आल्याची खंत वाटते. पाणीप्रश्न न सुटल्यास आयुक्त दालनात आंदोलन करू, असा घरचा आहेर तुषार कामठे यांनी दिला. माजी महापौर नितीन काळजे यांनी, शहरात पन्नास टक्के अनधिकृत नळजोड असून, प्रशासनाला याचे गंभीर्य नाही. मुबलक पाणीपुरवठ्यासाठी दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची सूचना केली. राष्ट्रवादीचे भाऊसाहेब भोईर म्हणाले, ‘‘आयुक्तांना कोणतेही व्हीजन नाही. त्यांनी एकही चांगले काम केले नाही. विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ महासभा तहकूब करावी.’’ माजी महापौर मंगला कदम यांनी, रावेतसारखे आणखी एक पंपिंग स्टेशन उभारण्याची मागणी केली. ‘‘दिघी परिसरात पाणीबाणी सुरू असून पाणीपुरवठा सुरळीत करू न शकणाºया अधिकाºयांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी नगरसेवक विकास डोळस यांनी केली.या चर्चेत नगरसेविका सुलक्षणा धर, अनुराधा गोफणे, स्वाती काटे, वैशाली काळभोर, प्रज्ञा खानोलकर, पौर्णिमा सोनवणे, आरती चोंधे, नीता पाडाळे, उषा ढोरे, झामाबाई बारणे, मीनल यादव, संगीता ताम्हाणे, आशा शेंडगे, सुनीता तापकीर, स्वाती काटे, शैलजा मोरे, प्रियंका बारसे, नगरसेवक मयूर कलाटे, पंकज भालेकर, नामदेव ढाके, राजेंद्र लांडगे, चंद्रकांत नखाते, सचिन चिखले, संदीप कस्पटे, संदीप वाघेरे, अंबरनाथ कांबळे, प्रमोद कुटे, हर्षल ढोरे, बाळासाहेब ओव्हाळ यांनी सहभाग घेतला.‘अधिकारी उंटाहून शेळ्या हाकत असल्याची टीका नामदेव ढाके यांनी केली. राजा व्यापारी आणि प्रजा भिकारी झाली आहे. आजची परिस्थिती पाहिल्यास कालचा गोंधळ बरा होता, अशी टीका संदीप वाघेरे यांनी केली. ‘कृत्रिम पाणीटंचाईने नागरिक हैराण आहेत, अशी टीका मयूर कलाटे यांनी केली. भाजपाच्या सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘मार्च, एप्रिल महिन्यात विस्कळीत होणारा पाणीपुरवठा आत्ताच कसा विस्कळीत झाला. ही परिस्थिती निर्माण केली आहे का, याचा शोध घ्यावा.’’शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे म्हणाले, की शहरातील पाणी पुरवठ्याचा आयुक्तांनी अभ्यास केला नाही. मनाला आले की पाणी पुरवठ्याचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली जाते. नदीच्या अलीकडून आणि पलीकडून फोन आला, की आयुक्त निर्णय बदलतात.’’सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘आठ दिवसांच्या आत पाण्याचा प्रश्न न सुटल्यास संबंधित अधिकाºयाचे निलंबन करण्यात यावे. अधिकाºयांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी.’’ तहकुबीची सूचना मांडल्यानंतर नामदेव ढाके यांनी अनुमोदन दिले.>शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. प्रशासनाने तो मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावा. आठ दिवसांत पाण्याचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. आजची महासभा ३१ आॅक्टोबर दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात येत आहे.- राहुल जाधव, महापौरपाणी पुरवठ्याचे नियोजन शून्य आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पवना बंदिस्त जलवाहिनी, आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याचेदेखील आम्ही नियोजन केले होते. परंतु, सत्तांतर झाल्यानंतर त्या योजना रखडल्या आहेत. जोपर्यंत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. तोपर्यंत सभा चालू दिली जाणार नाही.- दत्ता साने, विरोधी पक्षनेते

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड