शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रहाटणीत रस्त्यांची झाली दैना, खड्डेच खड्डे : पावसामुळे पिंपळे सौदागर, काळेवाडी परिसरातील जनजीवन विस्कळीत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 03:37 IST

शनिवारी मध्यरात्रीपासून सुरूअसलेल्या दमदार पावसामुळे रहाटणी, पिंपळे सौदागर, काळेवाडी, थेरगाव, वाकड, पिंपळे निलख व हिंजवडी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. सुटीचा दिवस असूनही पावसामुळे रस्त्यावर रहदारी नव्हती,तर हातगाडीवाले, फेरीवाले,पथारीवाले व छोटे व्यावसायिक व्यवसायावर मोठा परिणाम झाला.

रहाटणी : शनिवारी मध्यरात्रीपासून सुरूअसलेल्या दमदार पावसामुळे रहाटणी, पिंपळे सौदागर, काळेवाडी, थेरगाव, वाकड, पिंपळे निलख व हिंजवडी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. सुटीचा दिवस असूनही पावसामुळे रस्त्यावर रहदारी नव्हती,तर हातगाडीवाले, फेरीवाले,पथारीवाले व छोटे व्यावसायिक व्यवसायावर मोठा परिणाम झाला. अनेक दिवसांनी सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते, तर अनेक रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती.अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर शहर व परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. शनिवारी सायंकाळी सुरू झालेल्या पावसाचा मध्यरात्री चांगलाच जोर वाढला तो रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत कायम होता त्यामुळे सुटी असूनही चाकरमान्यांना घराबाहेर पडता आले नाही . रहाटणी व पिंपळे सौदागर परिसरात दर रविवारी सुरु असणारा आठवडे बाजार पावसामुळे लागला नसल्याने नागरिकाना आठवड्याचा भाजीपाला खरेदी करता आला नाही. तसेच रविवारी चांगला व्यवसाय होईल म्हणून खरेदी केलेला छोट्याव्यावसायिकांचा माल ग्राहकाविना पडून राहिला. अगदी सकाळपासून पावसाची संततधार सुरू असल्याने नागरिक घराबाहेर पडणे प्रामुख्याने पाळल्याचेआढळून आले. सततच्या पावसामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणातगारवा होता. त्यामुळे आरोग्यालाबाधा होऊ नये म्हणून नागरिक घराबाहेर पडणे शक्यतो टाळल्याचे दिसून आले. काही रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकाना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत होते. रहाटणी येथील गोडांबे चौक ते तापकीर मळा रस्त्यावर खड्डा पडल्याने अनेक वाहने या खड्ड्यांत अडकत होती. या ठिकाणी पाण्याचे व चिखलाचे साम्राज्य पसरल्याने खड्डा चुकविण्यासाठी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती.मागील काही दिवसांपूर्वी एका कामासाठी हा रस्ता खोदण्यात आला. मात्र हा खोदलेला रस्ता योग्य प्रकारे बुजविला नसल्याने पावसात त्यात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य तयार झाले. काम संपताच हा खड्डा योग्य पद्धतीने बुजविला असता, तर पावसात वाहनचालकांना ही कसरत करावी लागली नसती. हा जीवघेणा खड्डा लवकरात लवकर बुजविण्याची मागणी स्थानिक नागरिक व वाहन चालक करीत आहेत.