शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मंडई आली रस्त्यावर, अनेक वर्षांपासून प्रश्न प्रलंबित; विक्रेत्यांची होतेय गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 03:16 IST

रुपीनगर परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून मंडईचा प्रश्न प्रलंबित आहे. मंडई नसल्यामुळे येथील भाजीविक्रेत्यांना दुकाने रस्त्याच्या कडेला थाटावी लागतात. वाहनचालक, प्रवासी, दुकानदार आणि नागरिक यांची कटकट व ऊन, वारा, पाऊस या सर्व संकटांचा सामना करीत, अतिक्रमणविरोधी कारवाई सहन करीत व्यवसाय करावा लागतो.

तळवडे - रुपीनगर परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून मंडईचा प्रश्न प्रलंबित आहे. मंडई नसल्यामुळे येथील भाजीविक्रेत्यांना दुकाने रस्त्याच्या कडेला थाटावी लागतात. वाहनचालक, प्रवासी, दुकानदार आणि नागरिक यांची कटकट व ऊन, वारा, पाऊस या सर्व संकटांचा सामना करीत, अतिक्रमणविरोधी कारवाई सहन करीत व्यवसाय करावा लागतो. त्यामुळे श्री घारजाई माता फळभाजी मंडई संघटनेच्या वतीने मंडईचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशा मागणीचे निवेदन महापालिका आयुक्तांना दिले आहे.रुपीनगर, सहयोगनगर, त्रिवेणीनगर परिसरात औद्योगिक वसाहतीतील कामगारांचा सुमारे ४० ते ४५ हजार लोकवस्तीचा भाग आहे. या भागात महापालिकेची अधिकृत मंडई नसल्याने संपूर्ण परिसरातील फळ व भाजीविक्रेते मुख्य रस्त्यावरच दुकाने थाटून भाजीविक्री करीत आहेत. तिन्ही ऋतूंमध्ये उभे राहून वारा, पावसाचा सामना करीत कसाबसा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे छोटे-मोटे व्यावसायिक आहेत. नैसर्गिक संकटे तर आहेतच, शिवाय ज्या दुकानासमोर व्यवसाय करतात, त्या दुकानदाराच्या दारात दुकान थाटल्यामुळे भाडेही द्यावे लागते. पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई आणि रहदारीला अडचण होत असल्याची तक्रार करणारे प्रवासी अशा संकटांमुळे येथील फळ व भाजीविक्रेते त्रस्त आहेत. या परिसरात सुमारे १०० पेक्षा जास्त फळ व भाजी विक्रेत्यांनी स्वतंत्र मंडईची मागणी केली आहे. याबाबत संघटनेच्या वतीने अनेक वेळा पालिकेकडे मागणी करूनही त्यावर आजपर्यंत पालिकेकडून कोणतीच उपाययोजना होत नसल्याने गरीब व्यावसायिक सध्या आर्थिक अडचणीत आहेत. येथील मंडईचा प्रश्न सुटणे गरजेचे असल्याची मागणी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब काळोखे यांनी केली आहे.परिसर रेडझोनच्या हद्दीत येत असल्याने नागरी सुविधा देताना प्रथमरेडझोनच्या समस्येचा अडथळा येत आहे. तरीही सध्या मंडईची पायाभूत सुविधा द्यावी यासाठी नाल्यावर स्लॅब टाकून किंवा खासगी जागेतमंडईची उभारणीची उपाययोजना करून हा प्रश्न सोडविण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे दिला आहे. येथील नागरिक व व्यावसायिकांचा लवकरच मंडईचा प्रश्न सुटेल. - पौर्णिमा सोनवणे, नगरसेविकातात्पुरते पत्राशेड किंवा नाल्यावर स्लॅब टाकून येथील मंडईचा प्रश्न सोडविण्याची गरज आहे. कारण या व्यवसायावर कित्येक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. त्याचा महापालिका प्रशासनाने विचार करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा. - भाऊसाहेब काळोखे, अध्यक्ष,श्री घारजाई माता फळभाजी मंडई संघटना, रुपीनगरमंडईची सोय नसल्यामुळे रस्त्यावर बसून व्यवसाय करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. त्यामुळे रहदारीला अडचण होते. तसेच माल घेताना गिºहाइकाची गैरसोय आणि महापालिकेची कारवाई यामुळे व्यवसाय करणे जिकिरीचे झाले आहे. मंडई झाल्यास स्वतंत्र जागा मिळेल. नियमित व चांगला व्यवसाय करता येईल व रहदारीचाही प्रश्नही सुटेल.- मंदा अहिरे, भाजीविक्रेता, रुपीनगरसुसज्ज भाजी मंडई उपलब्ध व्हावी यासाठी अनेक दिवसांपासून मागणी केली जातात. मात्र, अद्यापही भाजी मंडईला मुहूर्त लाभलेला नाही. यामुळे विक्रेत्यांसह ग्राहकांचीही गैरसोय होत आहे. तसेच विक्रेत्यांना रस्त्यावरच मिळेल त्या जागेत माल विक्रीसाठी ठेवावा लागत आहे. तरी लवकरात लवकर भाजीमंडई उपलब्ध करून द्यावी.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMarketबाजार