शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

मंडई आली रस्त्यावर, अनेक वर्षांपासून प्रश्न प्रलंबित; विक्रेत्यांची होतेय गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 03:16 IST

रुपीनगर परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून मंडईचा प्रश्न प्रलंबित आहे. मंडई नसल्यामुळे येथील भाजीविक्रेत्यांना दुकाने रस्त्याच्या कडेला थाटावी लागतात. वाहनचालक, प्रवासी, दुकानदार आणि नागरिक यांची कटकट व ऊन, वारा, पाऊस या सर्व संकटांचा सामना करीत, अतिक्रमणविरोधी कारवाई सहन करीत व्यवसाय करावा लागतो.

तळवडे - रुपीनगर परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून मंडईचा प्रश्न प्रलंबित आहे. मंडई नसल्यामुळे येथील भाजीविक्रेत्यांना दुकाने रस्त्याच्या कडेला थाटावी लागतात. वाहनचालक, प्रवासी, दुकानदार आणि नागरिक यांची कटकट व ऊन, वारा, पाऊस या सर्व संकटांचा सामना करीत, अतिक्रमणविरोधी कारवाई सहन करीत व्यवसाय करावा लागतो. त्यामुळे श्री घारजाई माता फळभाजी मंडई संघटनेच्या वतीने मंडईचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशा मागणीचे निवेदन महापालिका आयुक्तांना दिले आहे.रुपीनगर, सहयोगनगर, त्रिवेणीनगर परिसरात औद्योगिक वसाहतीतील कामगारांचा सुमारे ४० ते ४५ हजार लोकवस्तीचा भाग आहे. या भागात महापालिकेची अधिकृत मंडई नसल्याने संपूर्ण परिसरातील फळ व भाजीविक्रेते मुख्य रस्त्यावरच दुकाने थाटून भाजीविक्री करीत आहेत. तिन्ही ऋतूंमध्ये उभे राहून वारा, पावसाचा सामना करीत कसाबसा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे छोटे-मोटे व्यावसायिक आहेत. नैसर्गिक संकटे तर आहेतच, शिवाय ज्या दुकानासमोर व्यवसाय करतात, त्या दुकानदाराच्या दारात दुकान थाटल्यामुळे भाडेही द्यावे लागते. पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई आणि रहदारीला अडचण होत असल्याची तक्रार करणारे प्रवासी अशा संकटांमुळे येथील फळ व भाजीविक्रेते त्रस्त आहेत. या परिसरात सुमारे १०० पेक्षा जास्त फळ व भाजी विक्रेत्यांनी स्वतंत्र मंडईची मागणी केली आहे. याबाबत संघटनेच्या वतीने अनेक वेळा पालिकेकडे मागणी करूनही त्यावर आजपर्यंत पालिकेकडून कोणतीच उपाययोजना होत नसल्याने गरीब व्यावसायिक सध्या आर्थिक अडचणीत आहेत. येथील मंडईचा प्रश्न सुटणे गरजेचे असल्याची मागणी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब काळोखे यांनी केली आहे.परिसर रेडझोनच्या हद्दीत येत असल्याने नागरी सुविधा देताना प्रथमरेडझोनच्या समस्येचा अडथळा येत आहे. तरीही सध्या मंडईची पायाभूत सुविधा द्यावी यासाठी नाल्यावर स्लॅब टाकून किंवा खासगी जागेतमंडईची उभारणीची उपाययोजना करून हा प्रश्न सोडविण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे दिला आहे. येथील नागरिक व व्यावसायिकांचा लवकरच मंडईचा प्रश्न सुटेल. - पौर्णिमा सोनवणे, नगरसेविकातात्पुरते पत्राशेड किंवा नाल्यावर स्लॅब टाकून येथील मंडईचा प्रश्न सोडविण्याची गरज आहे. कारण या व्यवसायावर कित्येक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. त्याचा महापालिका प्रशासनाने विचार करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा. - भाऊसाहेब काळोखे, अध्यक्ष,श्री घारजाई माता फळभाजी मंडई संघटना, रुपीनगरमंडईची सोय नसल्यामुळे रस्त्यावर बसून व्यवसाय करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. त्यामुळे रहदारीला अडचण होते. तसेच माल घेताना गिºहाइकाची गैरसोय आणि महापालिकेची कारवाई यामुळे व्यवसाय करणे जिकिरीचे झाले आहे. मंडई झाल्यास स्वतंत्र जागा मिळेल. नियमित व चांगला व्यवसाय करता येईल व रहदारीचाही प्रश्नही सुटेल.- मंदा अहिरे, भाजीविक्रेता, रुपीनगरसुसज्ज भाजी मंडई उपलब्ध व्हावी यासाठी अनेक दिवसांपासून मागणी केली जातात. मात्र, अद्यापही भाजी मंडईला मुहूर्त लाभलेला नाही. यामुळे विक्रेत्यांसह ग्राहकांचीही गैरसोय होत आहे. तसेच विक्रेत्यांना रस्त्यावरच मिळेल त्या जागेत माल विक्रीसाठी ठेवावा लागत आहे. तरी लवकरात लवकर भाजीमंडई उपलब्ध करून द्यावी.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMarketबाजार