शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

औद्योगिक वापराच्या बर्फामुळे धोका; अन्न व औैषध प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 02:55 IST

रसवंतीगृह तसेच कुल्फीवाल्यांकडून सर्रास वापर

रावेत : उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा, यासाठी उसाचा रस, आइस्क्रीम, बर्फाचे गोळे, फळांचा रस त्यात होणारा बर्फाचा वापर तसेच बर्फापासून तयार होणारे खाद्यपदार्थ याची मागणी वाढली आहे. त्यामुळे साहजिकच बर्फाची मागणीही वाढली आहे. परंतु सर्रासपणे औद्योगिक वापराचा बर्फ खाद्यपदार्थांमध्ये वापरला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.मार्च महिना सुरू झाल्याने उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. रसवंती तसेच विविध खाद्य पदार्थांसाठी वापरण्यात येणाऱ्या बर्फ कारखान्यातून बर्फवाटप करताना सर्रासपणे बर्फ रसवंती तसेच थंड पेयांच्या दुकानांपुढे जमिनीवर टाकला जातो तेथून नागरिक, वाहने जातात तरीदेखील नागरिक थंड पेय पिताना दिसून येतात. परंतु व्यावसायिकांकडून बर्फ खरेदी करून आणल्यानंतर योग्य पद्धतीने हाताळणी होत नसल्याचे दिसून येत आहे. बर्फाची वाहतूक करीत असताना कुठे सायकलने तर कुठे घाणेरड्या वाहनांचा वापर करण्यात येत आहे. त्यासोबत बर्फ कोणत्या पाण्याने तयार होतो, ते पाणी शुद्ध आहे की नाही. याबाबत काहीही माहिती नसते. रसवंती गृह, तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे आढळून येणारा बर्फ हा खाण्याचा बर्फ नसतोच. औद्योगिक वापरासाठीचा हा बर्फ खाणे आरोग्यास अपायकारक ठरू शकते. अन्न व औषध प्रशासनाने याप्रकरणी गंभीर दखल घेऊन अशा प्रकारे खाद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे.अनेक ठिकाणी व्यावसायिकांकडून बर्फ उघड्यावरच ठेवण्यात येत असतो. त्यामुळे रस्त्यावरील धूळ तसेच विषाणूंचा त्यावर प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. व ते पेय पिल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन आजारांना आमंत्रण मिळत आहे. सध्या रसवंती, लिंबू सरबत, जूस सेंटर, आइस्क्रीम, फळविक्रेते, कुल्फीवाले आदींची दुकाने रस्त्याच्या कडेला थाटलेली दिसून येतात. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांची पावले आपोआप थंड पेयाच्या दुकानांकडे वळलेली पहावयास मिळत आहेत. रस असो वा लिंबूसरबत या सर्वांमध्ये बर्फाचा वापर वाढत आहे. त्यामुळे हा बर्फ खाणे आरोग्यास अपायकारक ठरू शकते.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग