शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

औद्योगिक वापराच्या बर्फामुळे धोका; अन्न व औैषध प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 02:55 IST

रसवंतीगृह तसेच कुल्फीवाल्यांकडून सर्रास वापर

रावेत : उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा, यासाठी उसाचा रस, आइस्क्रीम, बर्फाचे गोळे, फळांचा रस त्यात होणारा बर्फाचा वापर तसेच बर्फापासून तयार होणारे खाद्यपदार्थ याची मागणी वाढली आहे. त्यामुळे साहजिकच बर्फाची मागणीही वाढली आहे. परंतु सर्रासपणे औद्योगिक वापराचा बर्फ खाद्यपदार्थांमध्ये वापरला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.मार्च महिना सुरू झाल्याने उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. रसवंती तसेच विविध खाद्य पदार्थांसाठी वापरण्यात येणाऱ्या बर्फ कारखान्यातून बर्फवाटप करताना सर्रासपणे बर्फ रसवंती तसेच थंड पेयांच्या दुकानांपुढे जमिनीवर टाकला जातो तेथून नागरिक, वाहने जातात तरीदेखील नागरिक थंड पेय पिताना दिसून येतात. परंतु व्यावसायिकांकडून बर्फ खरेदी करून आणल्यानंतर योग्य पद्धतीने हाताळणी होत नसल्याचे दिसून येत आहे. बर्फाची वाहतूक करीत असताना कुठे सायकलने तर कुठे घाणेरड्या वाहनांचा वापर करण्यात येत आहे. त्यासोबत बर्फ कोणत्या पाण्याने तयार होतो, ते पाणी शुद्ध आहे की नाही. याबाबत काहीही माहिती नसते. रसवंती गृह, तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे आढळून येणारा बर्फ हा खाण्याचा बर्फ नसतोच. औद्योगिक वापरासाठीचा हा बर्फ खाणे आरोग्यास अपायकारक ठरू शकते. अन्न व औषध प्रशासनाने याप्रकरणी गंभीर दखल घेऊन अशा प्रकारे खाद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे.अनेक ठिकाणी व्यावसायिकांकडून बर्फ उघड्यावरच ठेवण्यात येत असतो. त्यामुळे रस्त्यावरील धूळ तसेच विषाणूंचा त्यावर प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. व ते पेय पिल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन आजारांना आमंत्रण मिळत आहे. सध्या रसवंती, लिंबू सरबत, जूस सेंटर, आइस्क्रीम, फळविक्रेते, कुल्फीवाले आदींची दुकाने रस्त्याच्या कडेला थाटलेली दिसून येतात. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांची पावले आपोआप थंड पेयाच्या दुकानांकडे वळलेली पहावयास मिळत आहेत. रस असो वा लिंबूसरबत या सर्वांमध्ये बर्फाचा वापर वाढत आहे. त्यामुळे हा बर्फ खाणे आरोग्यास अपायकारक ठरू शकते.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग