शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वापराच्या बर्फामुळे धोका; अन्न व औैषध प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 02:55 IST

रसवंतीगृह तसेच कुल्फीवाल्यांकडून सर्रास वापर

रावेत : उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा, यासाठी उसाचा रस, आइस्क्रीम, बर्फाचे गोळे, फळांचा रस त्यात होणारा बर्फाचा वापर तसेच बर्फापासून तयार होणारे खाद्यपदार्थ याची मागणी वाढली आहे. त्यामुळे साहजिकच बर्फाची मागणीही वाढली आहे. परंतु सर्रासपणे औद्योगिक वापराचा बर्फ खाद्यपदार्थांमध्ये वापरला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.मार्च महिना सुरू झाल्याने उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. रसवंती तसेच विविध खाद्य पदार्थांसाठी वापरण्यात येणाऱ्या बर्फ कारखान्यातून बर्फवाटप करताना सर्रासपणे बर्फ रसवंती तसेच थंड पेयांच्या दुकानांपुढे जमिनीवर टाकला जातो तेथून नागरिक, वाहने जातात तरीदेखील नागरिक थंड पेय पिताना दिसून येतात. परंतु व्यावसायिकांकडून बर्फ खरेदी करून आणल्यानंतर योग्य पद्धतीने हाताळणी होत नसल्याचे दिसून येत आहे. बर्फाची वाहतूक करीत असताना कुठे सायकलने तर कुठे घाणेरड्या वाहनांचा वापर करण्यात येत आहे. त्यासोबत बर्फ कोणत्या पाण्याने तयार होतो, ते पाणी शुद्ध आहे की नाही. याबाबत काहीही माहिती नसते. रसवंती गृह, तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे आढळून येणारा बर्फ हा खाण्याचा बर्फ नसतोच. औद्योगिक वापरासाठीचा हा बर्फ खाणे आरोग्यास अपायकारक ठरू शकते. अन्न व औषध प्रशासनाने याप्रकरणी गंभीर दखल घेऊन अशा प्रकारे खाद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे.अनेक ठिकाणी व्यावसायिकांकडून बर्फ उघड्यावरच ठेवण्यात येत असतो. त्यामुळे रस्त्यावरील धूळ तसेच विषाणूंचा त्यावर प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. व ते पेय पिल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन आजारांना आमंत्रण मिळत आहे. सध्या रसवंती, लिंबू सरबत, जूस सेंटर, आइस्क्रीम, फळविक्रेते, कुल्फीवाले आदींची दुकाने रस्त्याच्या कडेला थाटलेली दिसून येतात. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांची पावले आपोआप थंड पेयाच्या दुकानांकडे वळलेली पहावयास मिळत आहेत. रस असो वा लिंबूसरबत या सर्वांमध्ये बर्फाचा वापर वाढत आहे. त्यामुळे हा बर्फ खाणे आरोग्यास अपायकारक ठरू शकते.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग