शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

रिंगरोडचा प्रश्न: आंदोलनाची शंभरी; पण प्रश्न अनुत्तरीतच, नागरिकांवर कारवाईची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 04:37 IST

प्रस्तावित रिंगरोड होऊ नये, याकरिता वाल्हेकरवाडी ते पिंपळे गुरवपर्यंतच्या बाधित नागरिकांमध्ये जनजागृती होण्याकरिता घर बचाव संघर्ष समितीने प्राधिकरण प्रशासन, शासन आणि महापालिका यांच्या विरोधात सनदशीर मार्गाने सुरू केलेल्या आंदोलनास आज शंभरी पूर्ण होत आहे.

रावेत : प्रस्तावित रिंगरोड होऊ नये, याकरिता वाल्हेकरवाडी ते पिंपळे गुरवपर्यंतच्या बाधित नागरिकांमध्ये जनजागृती होण्याकरिता घर बचाव संघर्ष समितीने प्राधिकरण प्रशासन, शासन आणि महापालिका यांच्या विरोधात सनदशीर मार्गाने सुरू केलेल्या आंदोलनास आज शंभरी पूर्ण होत आहे. परंतु रिंगरोड बाधितांचा प्रश्न अधांतरीच आहे या शंभर दिवसांत प्राधिकरण प्रशासनाची अनधिकृत बांधकामासंदर्भात दुटप्पी भूमिका,कारवाईसंदभार्तील संभ्रम यामुळे रिंगरोड बाधितांनी प्रश्न सुटेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.मागील शंभर दिवसांपासून वाल्हेकरवाडी, रहाटणी, थेरगाव, पिंपळे गुरव आदी परिसरातील रिंगरोड बाधित नागरिक हक्काची घरे वाचविण्यासाठी घर बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून रिंगरोडला विविध मार्गाने विरोध करीत आहेत. वाल्हेकरवाडी, चिंचवडगाव, थेरगाव, पिंपळे गुरव या दाट लोकवस्ती परिसरातून जाणाºया प्रस्तावित रिंगरोडमुळे हजारो कुटुंबे बेघर होणार आहेत. आंदोलनामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय आहे.गेल्या ३० वर्षांपासून नवनगर प्राधिकरण हद्दीतील हजारो बाधित कुटुंबे अनधिकृत घरांमध्ये राहत आहेत. परंतु छुप्या आणि जाचक अटींमुळे हजारो नागरिकांनी घरे नियमितीकरणासाठीच्या सूचना समितीकडे एकत्रित करून ६ हजार सूचना फॉर्म व त्यातील प्रमुख सूचना घर बचाव संघर्ष समितीने दिल्या. त्या अधिसूचनेसाठी ६१८५ सूचना बाधित नागरिकांनी घर बचाव संघर्ष समितीतर्फे मुख्य प्रधान सचिव -नगरविकास मंत्रालय-मुंबई-महाराष्ट्र राज्य येथे प्रत्यक्षात पोहोच केल्या आहेत. मुख्यमंत्री शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन करण्याकरिता भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात आले असताना आंदोलनकर्त्या शिष्ट मंडळाला वेळ न दिल्यामुळे आंदोलकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. घर बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांची भेट घेतली होती.प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील कार्यालयावर दिंडी यात्रा भर पावसात काढून या प्रश्नाबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांना या प्रश्नाबाबत लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी पोस्ट कार्ड पाठवा आंदोलन केले़ यामध्ये बालचमूसह अबालवृद्धांसह महिलांनी हजारो पोस्ट कार्ड मुख्यमंत्र्यांना पाठिवले़ नागरिकांनी सदरचे आंदोलन अहिंसा आणि लोकशाहीच्या मार्गाने सुरूच ठेवले आहे. एकंदरीत आंदोलनाला शंभर दिवस पूर्ण होत असताना रिंगरोड बाधितांचा प्रश्न मात्र अधांतरीच आहे.पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांशी होणार चर्चाया व्यतिरिक्त शिष्टमंडळाने ज्येष्ठ नेते शरद पवार आणि समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन या प्रश्नात लक्ष घालावे, असे साकडे घातले होते. रिंगरोडच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी सर्वपक्षिय समितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील आठवड्यात वेळ दिला आहे. समिती आणि बाधित भागातील नगरसेवक मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन रिंगरोड, प्राधिकरण आरक्षण याबाबत चर्चा करण्यात येणार आहे़ महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या सर्वपक्षिय समितीमध्ये सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, मनसेचे सचिन चिखले, अपक्षांचे कैलास बारणे यांचा समावेश आहे.