शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मिळकतधारकांनी नोंदणी न केल्याने बुडतोय ग्रामपंचायतींचा कोटींचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:58 IST

आयटीनगरीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नेरे परिसरातील हजारो सदनिकांचा समावेश असलेल्या सोसायट्या ग्रामपंचायतमध्ये नोंदणी करण्यास टाळाटाळ होत आहे.

- रोहिदास धुमाळ हिंजवडी : आयटीनगरीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नेरे परिसरातील हजारो सदनिकांचा समावेश असलेल्या सोसायट्या ग्रामपंचायतमध्ये नोंदणी करण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून, शासनाच्या वसाहत धोरणाचे उल्लंघन होत आहे. नोंदच नसल्याने तेथे वास्त्यव्यास असणाऱ्या नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा पुरवताना ग्रामपंचयतींना अडचण होत आहे.आयटीनगरी परिसरातील अशा सोसायट्यांमधील रहिवासी अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आयटी पार्कमुळे हिंजवडी, माण, मारुंजी, जांबे, नेरेसह परिसरातील गावांचा झपाट्याने विकास झाला. मोठमोठे गृहप्रकल्प आयटीनगरी परिसरात उभे राहिले आहेत. गगनचुंबी इमारतीमध्ये हजारोंच्या संख्येने सदनिकांचा समावेश असलेल्या सोसायट्या परिसरातील गावांमधे उभ्या राहिल्या आहेत.शासन नियमानुसार अशा सदनिकांची व हाउसिंग सोसायट्यांची स्थानिक प्रशाकीय कार्यालयात आणि स्थानिक स्वराज्य संस्थेकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. मात्र अशी नोंदणी करण्यास सोसायट्यांकडून टाळाटाळ होते. सोसायट्यांमधील सदनिकांची ग्रामपंचायतींमध्ये नोंद नसल्याने ग्रामपंचायतींचा मोठा महसूल बुडत आहे.>मिळत नाही रहिवासी दाखलासोसायट्यांची नोंदच नसल्याने त्या ठिकाणी वास्त्यव्यास असणाऱ्या नागरिकांना अवश्यक असलेला साधा निवासी पुरावा ग्रामपंचायत देऊ शकत नाही. त्यामुळे पासपोर्टपासून ते नोकरी, व्यवसाय, शाळा, महाविद्यालय, सरकारी कामे, शासकीय योजना, अशा अनेक बाबतींत संबंधित नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नेरे ग्रामपंचायतीकडून अशा सोसायट्यांना आणि संबंधित सदनिकाधारकांना नोंदणी करण्यासंदर्भात अनेकवेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. नोटीससुद्धा बजावण्यात आल्या आहेत. मात्र त्यास सकारात्मक प्रतिसाद लाभलेला नाही. मिळकतकराची आकारणी टाळण्यासाठी नोंदणी करण्याबाबत उदासीनता दिसून येते.>समांतर गावेउभी राहण्याची शक्यतावसाहत धोरण (टाऊनशिप अ‍ॅक्ट) नुसार अनेक वर्षांपासून इमारतींचे बांधकाम पूर्ण होऊन त्यांचा भोगवटा चालू झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे मिळकतकर आकारणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक असूनही सोसायट्यांकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ होत आहे. गावच्या लोकसंख्येपेक्षा अशा सोसायट्यांमधील रहिवाशांची लोकसंख्या जास्त असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायतीमध्ये नोंदणी करण्यास टाळाटाळ होत असल्याने नेरे परिसरात समांतर गावे उभी रहाण्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तवण्यात येत आहे.>ग्रामपंचायतीच्या हद्दीत नागरी समस्यांमध्ये वाढहजारो सदनिकांचा समावेश असलेल्या सोसायटीमधील नागरिकांना मूलभूत गरजा पुरवताना स्थानिक प्रशासनाला अडचण होत आहे. पाणी, वीज, पक्का रस्ता, आरोग्य, सांडपाणी, कचरा व्यवस्थापन अशा सुविधांपासून तेथील नागरिक वंचित आहेत. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीच्या हद्दीत नागरी समस्यांमध्ये वाढ होत आहे.कायदेशीर पाठपुराव्यानंतर होते नोंदणीहिंजवडीतही काही सोसायट्यांकडून नोंदणीस टाळाटाळ होत होती. मात्र कायदेशीर पाठपुरावा करत ग्रामपंचायत प्रशासनाने त्यांना नोंदणी करण्यास भाग पाडले. जांबे परिसरातही अशा सोसायट्यांकडून नोंदणी करण्यास सुरवातीला विरोध झाला होता. माण, मारुंजीतही काही सोसायट्यांकडून नोंदणीस टाळाटाळ होत आहे. नेरे परिसरातही काही सोसायट्यांना अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतमार्फत नोंदणी करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करूनही मिळकत आकारणीसाठी नोंदणी करण्यात आलेली नाही.ग्रामीण भागापेक्षा वेगळी जीवनशैलीमुळशी तालुक्यातील वाढते औद्योगिकीकरण तसेच आयटीपार्कमुळे तालुक्यातील ग्रामीण भागाचा कायापालट झाला आहे. गृहप्रकल्पाच्या गगनचुंबी इमारतीत गावच्या लोकसंख्येपेक्षा कित्येक पट अधिक लोकसंख्या आहे. ग्रामीण भागापेक्षा सोसायट्यांतील सदनिकाधारकांची वेगळी जीवनशैली आहे. सोसायटीच्या संरक्षक भिंतीच्या आत आपले विश्व सामावले असल्याची सदनिकाधारकांची मानसिकता दिसून येते. त्यामुळे ग्रामपंचायतीकडे नोंद करण्याबाबत उदासीनता असल्याचे सांगण्यात येत आहे.