शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार, ‘पॉस’ मशिनद्वारे शिधापत्रिकाधारकांना दिली जात नाही पावती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 02:06 IST

सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील रास्त भाव धान्य दुकानांमध्ये ‘पॉस’ मशिनद्वारे धान्यवाटप होत आहे. मात्र, दुकानदार शिधापत्रिकाधारकांना पॉस मशिनद्वारे मिळणारी पावतीच नाही.

- मंगेश पांडे पिंपरी : सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील रास्त भाव धान्य दुकानांमध्ये ‘पॉस’ मशिनद्वारे धान्यवाटप होत आहे. मात्र, दुकानदार शिधापत्रिकाधारकांना पॉस मशिनद्वारे मिळणारी पावतीच नाही. यामुळे कुटुंबातील सदस्य संख्येप्रमाणे किती धान्य मिळायला हवे होते अन् दुकानदाराकडून प्रत्यक्षात किती देण्यात आले याबाबत अनेकांना माहिती होत नाही. दरम्यान, अनेकांना कुटुंबातील सदस्य संख्येप्रमाणे धान्य न देता कमी प्रमाणात दिले जात असून, या माध्यमातून रेशनिंग दुकानदारांकडून धान्याचा काळाबाजार सुरू असल्याचे ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये समोर आले.निगडीतील परिमंडळ कार्यालयात ‘अ’ आणि ‘ज’ हे दोन विभाग असून, त्या अंतर्गत अनुक्रमे १०४ व ९४ रास्त भाव धान्य दुकानदार आहेत. या दुकानांमधून यापूर्वी शिधापत्रिकेवरच धान्य दिले जायचे. आता ‘पॉस’ मशिनद्वारे वाटप होत आहे. प्रत्येक दुकानदाराकडून शिधापत्रिकाधारकांच्या आधार क्रमांक जोडणीसह संदर्भ रजिस्टर कार्यालयात जमा झाले आहे. त्यानुसार कार्यालयाकडून दुकानदारांना धान्य पुरविले जात आहे. शिधापत्रिकाधारकांची सर्व माहिती पॉस मशिनमध्ये संकलित आहे. शिधापत्रिकाधारकाने बायोमेट्रिक पद्धतीने थम्ब केल्यानंतर पॉस मशिनवर कुटुंबातील सदस्य संख्या येते. त्यानुसार अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत प्रतिव्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ दिला जातो. दुकानदाराने धान्य दिल्यानंतर लगेचच त्याची पावतीदेखील देणे आवश्यक आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. अनेक दुकानदार लाभार्थ्यांना पावतीच देत नाहीशिधापत्रिकाधारकाची संपूर्ण माहिती, युनिट संख्या, आधार क्रमांक, धान्य वितरणाचे प्रमाण आदी माहिती पॉस मशिनमध्ये आहे. यापूर्वी आधार नसलेले धान्य घेऊन जात होते. जितके धान्य दिले, तेवढ्या रकमेची स्लिप बाहेर येत असून, ती लाभार्थ्याला देणे आवश्यक आहे.>अशी होते नागरिकांची फसवणूकग्राहकाला धान्य दिल्यानंतर पॉस मशिनमधून बाहेर येणारी स्लिप ग्राहकाला देणे बंधनकारक आहे. या स्लिपवर किती धान्य दिले हे नमूद असते. त्यामुळे ग्राहकालाही याबाबतची माहिती मिळते. मात्र, शहरातील अनेक दुकानदारांकडून ती दिली जात नाही. कुटुंबातील सदस्याप्रमाणे धान्य न देता कमी प्रमाणात धान्य दिले जाते. संबंधित कुटुंबातील चार व्यक्तींना १२ किलो गहू देणे अपेक्षित असताना आठ ते दहा किलो धान्य दिले जाते. अशिक्षित लाभार्थ्याला ही बाब लक्षात येत नाही. यासह अनेक लाभार्थ्यांना तर मुदत संपल्याचे कारण सांगत धान्यच दिले जात नाही. अशाप्रकारे काळाबाजार करून अनेक दुकानदार हे धान्य खासगी दुकानदारांना नेहमीच्या भावात विकतात.>माहितीचे संगणकीकरणपॉस मशिनमुळे कामात सुसूत्रता आली आहे. मात्र, अनेक मशिनमध्ये अद्यापही त्रुटी आहेत. शिधापत्रिकेतील माहिती अपलोड करताना काही कुटुंबांची अपुरी माहिती संकलित झाली आहे. कुटुंबातील सदस्यांच्या नावांमध्ये तफावत आहे. या यंत्रणेत सुधारणा करायला हव्यात. सर्व माहितीचे संगणकीकरण झाल्याने नवीन नाव टाकणे, कमी करणे, बदल करणे अशा प्रकारचे कामकाज तातडीने होण्यास मदत होत आहे. पूर्वी या कामासाठी वेळ लागायचा; आता मात्र एका क्लिकवर संबंधित शिधापत्रिकाधारकाची माहिती उपलब्ध होत आहे.>मिलिंदनगर पिंपरी : सायंकाळी ६.४५पिंपरीतील मिलिंदनगर येथील एक महिला रेशनिंगचे गहू व तांदूळ आणण्यासाठी दुकानामध्ये गेली. त्यांच्या शिधापत्रिकेवर कुटुंबातील तीन सदस्यांची नावे असल्याने त्यांना नऊ किलो गहू व सहा किलो तांदूळ मिळणे अपेक्षित होते. मात्र, गहू ८ किलो ७०० ग्रॅम दिले, तर पावसाच्या पाण्यामुळे तांदूळ ओले असल्याचे कारण सांगत तांदूळ दिलेच नाहीत. गहू घेतल्यानंतर पावतीची मागणी केली असता, पावती मिळत नसल्याचे दुकानदार महिलेने शिधापत्रिकाधारक महिलेला सांगितले.