शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

मावळातील धरणांची सुरक्षा रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 02:07 IST

पवनानगर : मावळात पवना, वडिवळे, आंद्रा, भुशी, वलवण या धरणांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे पाहणीत दिसून आले. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने धरणपरिसर दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे.पिंपरी-चिंचवड व मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणारे पवना धरण हे तालुक्यातील सर्वांत मोठे धरण असून धरण परिसरात राज्य व परराज्यातून अनेक पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. परंतु, ...

पवनानगर : मावळात पवना, वडिवळे, आंद्रा, भुशी, वलवण या धरणांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे पाहणीत दिसून आले. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने धरणपरिसर दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे.पिंपरी-चिंचवड व मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणारे पवना धरण हे तालुक्यातील सर्वांत मोठे धरण असून धरण परिसरात राज्य व परराज्यातून अनेक पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. परंतु, याठिकाणी कोणतीही सुरक्षिततेची यंत्रणा नसल्याने येथील सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे. याकडे पवना धरणाचे अधिकारी व कर्मचारी काणाडोळा करताना दिसत आहेत. तर गेल्या काही दिवसांपूर्वी धरणाच्या पवना विद्युत वीज केंद्रात एका व्यक्तीने पाणी सोडण्याच्या गेटचे बटन दाबल्याने गेट खाली पडले.धरण क्षेत्रात परिसरातील अनेक तरुण वर्ग सायंकाळच्या वेळी मद्यपान करण्यासाठी धरणाच्या कडेला व धरणाच्या दरवाजाजवळच बसले असतात. तर काही जण पवनानगर येथील विश्रामगृहाच्या कट्यावर बसून मद्यपान करत असतात. धरणाच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. त्याठिकाणी मद्यपान करून काचा फोडणे त्यामुळे परिसरातील शेतकºयांना शेतावर जाताना मोठी दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ आजही अशा घटना घडत आहेत. पवना वीज केंद्राच्या गेटवर सुरक्षारक्षक नसल्याने स्थानिक लोक व पर्यटक मोठ्या प्रमाणावर सायंकाळीच्या वेळी आतमध्ये प्रवेश करून मद्यपान करताना दिसतात. वीज केंद्राच्या आत जाण्यासाठी हे मुख्य गेट आहे तरी त्या ठिकाणी कोणताही सुरक्षारक्षक नसतो. धरण परिसरात पाणी सोडण्याच्या दरवाजाजवळ मोठ्या प्रमाणावर गवताचे साम्राज्य पसरल्याचे दिसत आहे. धरण परिसरात मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण अशा मोठमोठ्या शहरांतील बिल्डर, राजकीय नेते, अभिनेते, अशा उद्योजकांचे बंगले व फार्म हाऊस असून, या ठिकाणी दर शनिवारी व रविवारी बेकायदारीत्या पार्टीचे नियोजन केले जाते. काही वर्षांपूर्वी याच भागात मोठी रेव्ह पार्टी करताना काही लोकांना पकडले होते. तर अशा प्रकारांना जबाबदार कोण, असा स्थानिक पातळीवर संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.धरणाच्या अनेक वर्दळीच्या ठिकाणी सुरक्षा भिंत नाही. धरणातील बेकायदा पाणीउपसा होत आहे, तरीदेखील अधिकारी गप्प का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला असल्याचे दिसून येत आहे.पवना धरण परिसराच्या सुरक्षेसाठी आम्ही जागोजागी सुरक्षिततेचे फलक लावले आहे. धरणाच्या दरवाजाजवळ दोन बंदूकधारी कर्मचारी नेमण्यासाठी नियोजन केले आहे. पवना धरण परिसरात बोट सुरू असलेल्या सर्व परवानाधारक बोटधारकांना परवाना देताना नियम व अटी घालून दिल्या आहेत.- मनोहर खाडे, शाखा अभियंता, पवना धरण