शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सामाजिक देखाव्यांतून मांडले प्रश्न, सार्वजनिक गणेश मंडळांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:25 IST

जुनी सांगवीतील सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक-सांस्कृतिक देखाव्यांसह अनेक ज्वलंत प्रश्नही देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

सांगवी : जुनी सांगवीतील सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक-सांस्कृतिक देखाव्यांसह अनेक ज्वलंत प्रश्नही देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.सांगवीतील जुनी सांगवी आणि नवी सांगवी परिसरात जवळपास लहान-मोठी २०० मंडळे गणपती उत्सव साजरा करतात. सात दिवस सांगवीतील गणेशोत्सव असून, या कालावधीत अनेक उपक्रम आणि देखावे सादर केले जातात. हे गणपती पाहण्यासाठी दूर अंतरावरुन भाविक येत असतात.जुनी सांगवीतील आनंदनगर येथील आनंदनगर मित्र मंडळमंडळाने मोबाइलचा अतिवापर टाळा या महत्त्वाच्या विषयावर जिवंत देखावा केला आहे. समाजात मोबाइलचा अतिवापर कसा घातक आणि त्रासदायक ठरू पाहत आहे हे आपण कसे टाळायला हवे याविषयी मंडळाचे अध्यक्ष लिओ जुल्स आणि सहकारी कार्यकर्त्यांनी मंडळाच्या माध्यमातून लोकांना जागृती निर्माण होण्यासाठी पाऊल उचलले आहे.तसेच विद्यानगर मित्र मंडळ संस्कृती ग्रुप मंडळाने याही वर्षी फुलापासून कासव तयार केले असून, गेल्या वर्षी फुलांची बैलगाडी हा देखावा निर्माण केला होता. हिंदू धर्मात कासवास महत्त्व असून कासवाची पूजा केली जाते या संकल्पनेतून फुलांचे कासवनिर्माण केल्याचे मंडळाचे अध्यक्ष प्रशांत देवकाते यांनी सांगितले. मंडळाचे १९वे वर्ष असून देखावा आकर्षक आहे.प्रेमराज हाइट्स मित्र मंडळाकडून यंदा रक्तदान शिबिर घेण्यात आले. परिसरातील जवळपास ८० लोकांनी आणि मंडळातील कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. हे रक्त इंडियन सिरॉलॉजिकल इन्स्टिट्यूट यांना दिले गेले. गरजूंना त्वरित रक्त मिळावे हा हेतू असल्याचे मंडळाचे अध्यक्ष ओंकार कुंभार यांनी सांगितले.पौराणिक देखाव्यांवर भरचिखली, जाधववाडी परिसरात गणरायाचे दणक्यात आगमन झाल्यानंतर सार्वजनिक मंडळांचे देखावेदेखील सुरूझाले आहेत. यंदा चिखली, जाधववाडी या परिसरात सामाजिक, पौराणिक देखाव्यांवर भर देण्यात आला आहे.हिंदवी स्वराज युवा मंचाच्या बाप्पाचे आगमन मोठ्या जल्लोषात झाले. यंदा हार-फुले याऐवजी एक पेन व एक वही गणेश भक्तांकडून स्वीकारली जाणार आहे. तसेच दान स्वरूपात आलेल्या वह्या अनाथाश्रमात वाटल्या जाणार आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सतीश चव्हाण व सचिव चंद्रकांत पांढरे यांनी दिली. यंदाचा देखावा राज्यातील वाढती समस्या शेतकरी आत्महत्या या सरकारला रोखता आल्या नाही. याच ठिकाणी शिवाजीमहाराज असते तर काय झाले असते, यावर भाष्य करणारा आहे.आहेरवाडी येथील जय बजरंग मंडळ मंडळाने पौराणिक देखावा सादर केला आहे. महागाई, महिलांवरील वाढते अत्याचार, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या अशा अनेक समस्यांच्या राक्षसाचा वध करण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष विक्रांत आहेर व उपाध्यक्ष प्रवीण आहेर आहेत.श्री संत सावता माळी तरुण मंडळाने माता-पित्याची सेवा हीच ईश्वर सेवा या विषयावर देखावा सादर केला आहे. एक छोटा मुलगा आई-वडिलांना घराबाहेर काढणाºया स्वत:च्या वडिलांना मोलाचा सल्ला देतानाचे म्हणजेच जर तुम्ही त्यांना आज घराबाहेर काढलेत, तर मीही मोठा झाल्यावर तुम्हाला असेच घराबाहेर काढेन, असा संदेश दिला आहे. आहेरवाडी येथील श्री शिव छत्रपती मित्र मंडळाने चिनी वस्तूंना फाटा देत भारतीय संस्कृतीनुसार पर्णकुटी हा देखावा सादर केला.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव