शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

सामाजिक देखाव्यांतून मांडले प्रश्न, सार्वजनिक गणेश मंडळांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:25 IST

जुनी सांगवीतील सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक-सांस्कृतिक देखाव्यांसह अनेक ज्वलंत प्रश्नही देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

सांगवी : जुनी सांगवीतील सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक-सांस्कृतिक देखाव्यांसह अनेक ज्वलंत प्रश्नही देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.सांगवीतील जुनी सांगवी आणि नवी सांगवी परिसरात जवळपास लहान-मोठी २०० मंडळे गणपती उत्सव साजरा करतात. सात दिवस सांगवीतील गणेशोत्सव असून, या कालावधीत अनेक उपक्रम आणि देखावे सादर केले जातात. हे गणपती पाहण्यासाठी दूर अंतरावरुन भाविक येत असतात.जुनी सांगवीतील आनंदनगर येथील आनंदनगर मित्र मंडळमंडळाने मोबाइलचा अतिवापर टाळा या महत्त्वाच्या विषयावर जिवंत देखावा केला आहे. समाजात मोबाइलचा अतिवापर कसा घातक आणि त्रासदायक ठरू पाहत आहे हे आपण कसे टाळायला हवे याविषयी मंडळाचे अध्यक्ष लिओ जुल्स आणि सहकारी कार्यकर्त्यांनी मंडळाच्या माध्यमातून लोकांना जागृती निर्माण होण्यासाठी पाऊल उचलले आहे.तसेच विद्यानगर मित्र मंडळ संस्कृती ग्रुप मंडळाने याही वर्षी फुलापासून कासव तयार केले असून, गेल्या वर्षी फुलांची बैलगाडी हा देखावा निर्माण केला होता. हिंदू धर्मात कासवास महत्त्व असून कासवाची पूजा केली जाते या संकल्पनेतून फुलांचे कासवनिर्माण केल्याचे मंडळाचे अध्यक्ष प्रशांत देवकाते यांनी सांगितले. मंडळाचे १९वे वर्ष असून देखावा आकर्षक आहे.प्रेमराज हाइट्स मित्र मंडळाकडून यंदा रक्तदान शिबिर घेण्यात आले. परिसरातील जवळपास ८० लोकांनी आणि मंडळातील कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. हे रक्त इंडियन सिरॉलॉजिकल इन्स्टिट्यूट यांना दिले गेले. गरजूंना त्वरित रक्त मिळावे हा हेतू असल्याचे मंडळाचे अध्यक्ष ओंकार कुंभार यांनी सांगितले.पौराणिक देखाव्यांवर भरचिखली, जाधववाडी परिसरात गणरायाचे दणक्यात आगमन झाल्यानंतर सार्वजनिक मंडळांचे देखावेदेखील सुरूझाले आहेत. यंदा चिखली, जाधववाडी या परिसरात सामाजिक, पौराणिक देखाव्यांवर भर देण्यात आला आहे.हिंदवी स्वराज युवा मंचाच्या बाप्पाचे आगमन मोठ्या जल्लोषात झाले. यंदा हार-फुले याऐवजी एक पेन व एक वही गणेश भक्तांकडून स्वीकारली जाणार आहे. तसेच दान स्वरूपात आलेल्या वह्या अनाथाश्रमात वाटल्या जाणार आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सतीश चव्हाण व सचिव चंद्रकांत पांढरे यांनी दिली. यंदाचा देखावा राज्यातील वाढती समस्या शेतकरी आत्महत्या या सरकारला रोखता आल्या नाही. याच ठिकाणी शिवाजीमहाराज असते तर काय झाले असते, यावर भाष्य करणारा आहे.आहेरवाडी येथील जय बजरंग मंडळ मंडळाने पौराणिक देखावा सादर केला आहे. महागाई, महिलांवरील वाढते अत्याचार, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या अशा अनेक समस्यांच्या राक्षसाचा वध करण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष विक्रांत आहेर व उपाध्यक्ष प्रवीण आहेर आहेत.श्री संत सावता माळी तरुण मंडळाने माता-पित्याची सेवा हीच ईश्वर सेवा या विषयावर देखावा सादर केला आहे. एक छोटा मुलगा आई-वडिलांना घराबाहेर काढणाºया स्वत:च्या वडिलांना मोलाचा सल्ला देतानाचे म्हणजेच जर तुम्ही त्यांना आज घराबाहेर काढलेत, तर मीही मोठा झाल्यावर तुम्हाला असेच घराबाहेर काढेन, असा संदेश दिला आहे. आहेरवाडी येथील श्री शिव छत्रपती मित्र मंडळाने चिनी वस्तूंना फाटा देत भारतीय संस्कृतीनुसार पर्णकुटी हा देखावा सादर केला.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव