शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पुणे-नाशिक महामार्ग : बाह्यवळणांची कामे मार्गी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 01:43 IST

भोसरी ते राजगुरुनगर दरम्यान सहापदरीकरणासाठी आढावा

मोशी : पुणे-नाशिक महामार्गाचे भोसरीतील नाशिक फाटा ते राजगुरुनगर दरम्यान सहापदरीकरण होणार आहे. त्यासाठी भूसंपादन करण्याबाबतचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. खेड ते सिन्नर रस्त्याच्या कामातून आयएल अँड एफएस कंपनीने अंग काढून घेतल्यानंतर राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, कळंब, आळेफाटा या पाच बाह्यवळण रस्त्यांची कामे मूळ प्रकल्पातून वगळून त्यांची ४५० कोटी रुपयांची स्वतंत्र निविदा प्रक्रिया करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या कामाशी संबंधित सर्व यंत्रणांच्या बैठकीनंतर बाह्यवळण रस्त्यांची कामे सुरू होण्याचामार्ग मोकळा झाल्याची माहिती दिली. या बैठकीस जिल्हाधिकारी नवल किशोर राम, आमदार सुरेश गोरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक प्रदीप खोडस्कर, सुहास चिटणीस, पोलीस उपअधीक्षक गजानन टोम्पे, कार्यकारी अभियंता गणेश चौरे, जुन्नरचे शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, भूसंपादन विभागाचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बायपास रस्त्यांची कामे वगळून स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्यास मंजुरी दिली असून येत्या आठ-दहा दिवसांत या पाचही बायपास रस्त्यांची निविदा प्रसिद्ध करण्याचे खोडस्कर यांनी या बैठकीत मान्य केले. नाशिक फाटा ते राजगुरूनगर (चांडोली) या टप्प्याच्या सहापदरीकरणाच्या कामाचा आढावा घेताना चौपदरीकरण करताना शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या क्षेत्राची नुकसान भरपाई न दिल्याने शेतकºयांनी सहापदरीकरणाच्या भूसंपादनास विरोध केल्याचे खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी या बैठकीत निदर्शनास आणले. त्यामुळे आधीच्या भूसंपादनाची नुकसान भरपाई दिल्याखेरीज नवीन भूसंपादन करण्यास शेतकºयांचा विरोध असल्याचे शेतकºयांनी सांगितले.चौपदरीकरण करताना शेतकºयांना नुकसान भरपाई दिली नसल्याचे भूसंपादन अधिकारी यांनीही मान्य केले. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने भूसंपादनाचा प्रस्ताव करताना त्याचा विचार करावा, अशी सूचना भूसंपादन अधिकाºयांनी केली. मात्र याबाबत राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अधिकृतपणे भूसंपादनाचा मोबदला दिला नसल्याचे कळविणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावर तोडगा काढण्यासाठी बैठक घेणार असल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले.कंपनी-उपकंत्राटदारातील वादामुळे रखडले होते काम४राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० (जुना रा. म. ५०) वरील राजगुरूनगर (चांडोली फाटा) ते आळेफाटा दरम्यानचे काम करणाºया आयएल अँड एफएस कंपनी आणि उपकंत्राटदारामध्ये निर्माण झालेल्या वादावरून गेले वर्षभरापेक्षा जास्त काळ रस्त्याचे काम बंद पडलेआहे. विशेषत: राजगुरूनगर, खेड घाट, मंचर, नारायणगाव, कळंब व आळेफाटा येथील बायपास रस्त्याचे काम बंद पडल्याने वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.कंपनीने या कामातून अंग काढून घेतल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला कळविले होते. त्यामुळे बायपास रस्त्यांची कामे रखडणार असल्याचे लक्षात आल्यावर खासदार आढळराव पाटील यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यावर तोडगा काढण्याची विनंती केली होती.आढळराव पाटील यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत नितीन गडकरी यांनी या पाचही बायपासची कामे वेगळी काढून त्यांची स्वतंत्र निविदा प्रक्रिया करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत. त्यामुळे बायपास रस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी तसेच नाशिक फाटा ते राजगुरूनगर (चांडोली) रस्त्याच्या सहापदरीकरणासाठी कराव्या लागणाºया भूसंपादनाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत सर्व संबंधित यंत्रणांची बैठक गुरुवारी (दि.२७) बोलावली होती.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड