शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

पुणे-नाशिक महामार्ग : बाह्यवळणांची कामे मार्गी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 01:43 IST

भोसरी ते राजगुरुनगर दरम्यान सहापदरीकरणासाठी आढावा

मोशी : पुणे-नाशिक महामार्गाचे भोसरीतील नाशिक फाटा ते राजगुरुनगर दरम्यान सहापदरीकरण होणार आहे. त्यासाठी भूसंपादन करण्याबाबतचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. खेड ते सिन्नर रस्त्याच्या कामातून आयएल अँड एफएस कंपनीने अंग काढून घेतल्यानंतर राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, कळंब, आळेफाटा या पाच बाह्यवळण रस्त्यांची कामे मूळ प्रकल्पातून वगळून त्यांची ४५० कोटी रुपयांची स्वतंत्र निविदा प्रक्रिया करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या कामाशी संबंधित सर्व यंत्रणांच्या बैठकीनंतर बाह्यवळण रस्त्यांची कामे सुरू होण्याचामार्ग मोकळा झाल्याची माहिती दिली. या बैठकीस जिल्हाधिकारी नवल किशोर राम, आमदार सुरेश गोरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक प्रदीप खोडस्कर, सुहास चिटणीस, पोलीस उपअधीक्षक गजानन टोम्पे, कार्यकारी अभियंता गणेश चौरे, जुन्नरचे शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, भूसंपादन विभागाचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बायपास रस्त्यांची कामे वगळून स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्यास मंजुरी दिली असून येत्या आठ-दहा दिवसांत या पाचही बायपास रस्त्यांची निविदा प्रसिद्ध करण्याचे खोडस्कर यांनी या बैठकीत मान्य केले. नाशिक फाटा ते राजगुरूनगर (चांडोली) या टप्प्याच्या सहापदरीकरणाच्या कामाचा आढावा घेताना चौपदरीकरण करताना शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या क्षेत्राची नुकसान भरपाई न दिल्याने शेतकºयांनी सहापदरीकरणाच्या भूसंपादनास विरोध केल्याचे खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी या बैठकीत निदर्शनास आणले. त्यामुळे आधीच्या भूसंपादनाची नुकसान भरपाई दिल्याखेरीज नवीन भूसंपादन करण्यास शेतकºयांचा विरोध असल्याचे शेतकºयांनी सांगितले.चौपदरीकरण करताना शेतकºयांना नुकसान भरपाई दिली नसल्याचे भूसंपादन अधिकारी यांनीही मान्य केले. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने भूसंपादनाचा प्रस्ताव करताना त्याचा विचार करावा, अशी सूचना भूसंपादन अधिकाºयांनी केली. मात्र याबाबत राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अधिकृतपणे भूसंपादनाचा मोबदला दिला नसल्याचे कळविणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावर तोडगा काढण्यासाठी बैठक घेणार असल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले.कंपनी-उपकंत्राटदारातील वादामुळे रखडले होते काम४राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० (जुना रा. म. ५०) वरील राजगुरूनगर (चांडोली फाटा) ते आळेफाटा दरम्यानचे काम करणाºया आयएल अँड एफएस कंपनी आणि उपकंत्राटदारामध्ये निर्माण झालेल्या वादावरून गेले वर्षभरापेक्षा जास्त काळ रस्त्याचे काम बंद पडलेआहे. विशेषत: राजगुरूनगर, खेड घाट, मंचर, नारायणगाव, कळंब व आळेफाटा येथील बायपास रस्त्याचे काम बंद पडल्याने वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.कंपनीने या कामातून अंग काढून घेतल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला कळविले होते. त्यामुळे बायपास रस्त्यांची कामे रखडणार असल्याचे लक्षात आल्यावर खासदार आढळराव पाटील यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यावर तोडगा काढण्याची विनंती केली होती.आढळराव पाटील यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत नितीन गडकरी यांनी या पाचही बायपासची कामे वेगळी काढून त्यांची स्वतंत्र निविदा प्रक्रिया करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत. त्यामुळे बायपास रस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी तसेच नाशिक फाटा ते राजगुरूनगर (चांडोली) रस्त्याच्या सहापदरीकरणासाठी कराव्या लागणाºया भूसंपादनाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत सर्व संबंधित यंत्रणांची बैठक गुरुवारी (दि.२७) बोलावली होती.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड