शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

उद्योगनगरीतील हॉटेलवर कारवाईची टांगती तलवार?

By admin | Updated: April 1, 2017 02:12 IST

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर ५०० मीटरच्या परिसरात दारूविक्रीवर बंदी घालण्याच्या आपल्या आदेशात सर्वोच्च

पिंपरी : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर ५०० मीटरच्या परिसरात दारूविक्रीवर बंदी घालण्याच्या आपल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी बदल करून २० हजार किंवा त्यापेक्षा कमी लोकसंख्येच्या भागात २२० मीटरपर्यंतच दारूविक्रीवर बंदी घातली आहे. तर, २० हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या परिसरात ५०० मीटरमध्ये दारू विकता येणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या २१ लाखांच्या पुढे असल्याने शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या तिन्ही महामार्गांलगतच्या ५०० मीटर अंतरावरील हॉटेलवरील टांगती तलवार कायम आहे.अपघाताचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी महामार्गालगत ५०० मीटरच्या आतील दारू दुकाने, परमिटरूम, बिअरबार बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. दरम्यान, शुक्रवारी पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात बदल करीत २० हजार किंवा त्यापेक्षा कमी लोकसंख्येच्या भागात २२० मीटरपर्यंतच्या अंतरावरच दारूविक्रीवर बंदी असेल, असे सुधारित आदेशात म्हटले आहे. मात्र, २० हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या परिसरात ५०० मीटरमध्ये दारू विकता येणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे २१ लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या पिंपरी-चिंचवड हद्दीतून जाणाऱ्या तीन महामार्गांलगतच्या हॉटेलवरही टांगती तलवार कायम आहे. जुना मुंबई-पुणे महामार्ग पिंपरी-चिंचवड हद्दीतून जातो. तसेच नाशिक-पुणे महामार्ग आणि पुणे- बंगळुरू हे महामार्गही या हद्दीतून जातात. निगडी ते दापोडी या जुना मुंबई-पुणे महामार्गावर सुमारे ३०० हॉटेल आहेत. कासारवाडी येथून जाणाऱ्या नाशिक महामार्गाला लागून असलेल्या कासारवाडी, भोसरी परिसरात शंभराहून अधिक हॉटेल आहेत. त्याचबरोबर पुणे-बंगळुरू हा मार्ग शहराच्या बाहेरील बाजूने जातो. या मार्गावर वाकड, ताथवडे, रावेत, किवळे येथील हॉटेल येतात. त्याचबरोबर ५०० मीटरच्या हद्दीत थेरगाव, काळेवाडीतील काही हॉटेल येतात. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ही हॉटेल बंद करावी लागणार आहेत. या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड हद्दीतील परमिट रूम, मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याची वेळ येणार आहे. ५०० मीटर अंतरावर येणारी सुमारे ९०० हॉटेल असून या हॉटेल व्यावसायिकांची धावपळ सुरू झाली आहे. काही व्यावसायिकांनी स्थलांतर करण्याचा विचार सुरू केला आहे. तर इतरांनी हॉटेलमधील दारूविक्री बंद करण्याविषयी विचार केला आहे. (प्रतिनिधी)द्रुतगतीवरील काही व्यावसायिकांना दिलासा१  - लोणावळा : राष्ट्रीय व राज्य महामार्गावर ५०० मीटरच्या परिसरात दारूविक्रीवर बंदी घालण्याच्या आपल्या आदेशात आज सर्वोच्च न्यायालयाने बदल केल्याने ग्रामीण भागात व्यावसाय करणाऱ्या शेकडो हाँटेल व ढाबे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.२ - हायवे वरील दारूबंदीच्या आदेशात बदल करताना सरन्यायाधीश जे.एस.खेहर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने २० हजार किंवा त्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या भागात हे अंतर २२० मीटर केले आहे. मावळ तालुक्यात लोणावळा ते देहूरोडदरम्यानच्या अनेक व्यावसायिकांना या सुधारित आदेशाने दिलासा मिळाला आहे. लोणावळा, वडगाव, तळेगाव व देहूरोड या चार शहरांची लोकसंख्या २० हजारांपेक्षा अधिक आहे. ३ - उर्वरित ग्रामीण भागात गावांची लोकसंख्या २० हजारांपेक्षा कमी असल्याने शहरी भाग वगळता उर्वरित परिसरात हायवे पासून केवळ २२० मीटर अंतरावर दारूविक्री करता येणार आहे. लोणावळा खंडाळा हे देहूरोडदरम्यान रस्त्यांच्या दुर्तफा मोठ्या प्रमाणात हाँटेल व ढाबे आहेत. त्यांपैकी काही जणांकडे अधिकृत परमिटचे लायसन्स आहेत, तर अनेक जण स्थानिकप्रशासनाच्या कृपाशीर्वादाने दारूविक्री करतात. या सर्वांनाच सुधारित आदेशाने दिलासा मिळाला आहे. ४ - शहरी भागातील दुकाने व हाँटेल व्यावसायिकांना मात्र आपला व्यावसाय राष्ट्रीय व राज्य महामागार्पासून ५०० मीटर दूर अथवा ग्रामीण भागात हलवावा लागणार आहे. शहरी भागात शहराची लोकसंख्या २० हजारांपेक्षा जास्त असली तरीदेखील एका ठराविक भागाची लोकसंख्या २० हजार एवढी नसल्याने या आदेशातून पळवाटा काढत शहरी भागातदेखील २२० मीटर अंतरावर दारूविक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही.