शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पिंपरी चिंचवड महापालिका ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर अंजली भागवतने जाणून घेतल्या सोसायट्यांच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 12:52 IST

प्रत्येक घटकाने एक पाऊल पुढे टाकत सार्वजनिक स्वच्छतेमध्ये भाग घेऊन आपले सामाजिक योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महापालिकेची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर अर्जुन पुरस्कार विजेत्या अंजली भागवत यांनी केले.

ठळक मुद्देवाकड येथील कल्पतरू चौक, वाकड-हिंजवडी रस्ता व परिसरांतील सोसायट्यांना दिली भेटपरिसर स्वच्छ राखण्याकरिता जनजागृती करणे आवश्यक : मिलिंद पाटील

पिंपरी-चिंचवड (वाकड) : स्वच्छतेसाठी केवळ महापालिका प्रशासनावर अवलंबून न राहता समाजातील प्रत्येक घटकाने एक पाऊल पुढे टाकत सार्वजनिक स्वच्छतेमध्ये भाग घेऊन आपले सामाजिक योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महापालिकेची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर अर्जुन पुरस्कार विजेत्या अंजली भागवत यांनी केले.वाकड येथील कल्पतरू चौक, वाकड-हिंजवडी रस्ता व परिसरांतील सोसायट्यांना नगरसेवक तुषार कामठे यांच्यासह भेट देत स्वच्छतेची पाहणी त्यांनी केली, त्या वेळी त्या बोलत होत्या. पद्मावती धारा येथील पदाधिकाऱ्यांशीही स्वच्छतेविषयी सखोल चर्चा केली. पद्मावती धाराचे अध्यक्ष मिलिंद पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक लालगुणकर, मंदार भागवत, सचिन कणसे, उपाध्यक्ष योगेश कुलकर्णी, खजिनदार राहुल गोरे, मनोहर पाटील, सचिव उत्कर्ष कवाडिकर, कुलदीप सिंग इत्यादी सभासदांनी सहभाग घेतला.यावेळी परिसरातील विविध समस्यांचा आढावा घेण्यात आला. या चर्चेमध्ये परिसरात नियमित पाणीपुरवठा, कचऱ्याचे विभाजन व वर्गीकरण, वाहतूककोंडी, अनधिकृत फलक व इतर विषय हताळण्यात आले. नगरसेवक तुषार कामठे यांनी पाणीगळती थांबविण्याचे काम महापालिकेने हाती घेण्यात आल्याचे सांगितले. तसेच प्रभागातील नविन उपक्रम व योजना यांची माहिती नागरिकांना दिली. अध्यक्ष मिलिंद पाटील म्हणाले, की परिसर स्वच्छ राखण्याकरिता जनजागृती करणे आवश्यक आहे. स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. तसेच चांगल्या आणि निरोगी आयुष्याकरीता केवळ घराची स्वच्छता पाळून चालणार नाही, तर आपण जेथे वास्तव्य करतो तो संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवणे ही काळाची गरज आहे, असे नमूद केले. वाकड येथील कल्पतरू चौक, वाकड-हिंजवडी रस्त्याचा काही भाग व पद्मावती धारा येथे उत्स्फूर्तपणे लोकसहभागातून स्वच्छता अभियान नियमित राबविण्यात येतो. हा उपक्रम दर महिन्याच्या पहिल्या रविवारी राबविण्याचा संकल्प सर्व सभासदांनी केला आहे, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक लालगुणकर यांनी जाहीर केले. पालिकेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी स्पर्धांमध्ये पद्मावती धारा येथील सभासदांचा भाग घेण्याचा मानस आहे. त्याकरीता अशोक लालगुणकर यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटीमध्ये एक समिती घटित करून व अंजली भागवत यांच्या मार्गदर्शनाने व नगरसेवक तुषार कामठे यांच्या मदतीने पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे अध्यक्ष मिलिंद पाटील व खजिनदार राहुल गोरे यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड