शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पिंपरी चिंचवड महापालिका ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर अंजली भागवतने जाणून घेतल्या सोसायट्यांच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 12:52 IST

प्रत्येक घटकाने एक पाऊल पुढे टाकत सार्वजनिक स्वच्छतेमध्ये भाग घेऊन आपले सामाजिक योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महापालिकेची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर अर्जुन पुरस्कार विजेत्या अंजली भागवत यांनी केले.

ठळक मुद्देवाकड येथील कल्पतरू चौक, वाकड-हिंजवडी रस्ता व परिसरांतील सोसायट्यांना दिली भेटपरिसर स्वच्छ राखण्याकरिता जनजागृती करणे आवश्यक : मिलिंद पाटील

पिंपरी-चिंचवड (वाकड) : स्वच्छतेसाठी केवळ महापालिका प्रशासनावर अवलंबून न राहता समाजातील प्रत्येक घटकाने एक पाऊल पुढे टाकत सार्वजनिक स्वच्छतेमध्ये भाग घेऊन आपले सामाजिक योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महापालिकेची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर अर्जुन पुरस्कार विजेत्या अंजली भागवत यांनी केले.वाकड येथील कल्पतरू चौक, वाकड-हिंजवडी रस्ता व परिसरांतील सोसायट्यांना नगरसेवक तुषार कामठे यांच्यासह भेट देत स्वच्छतेची पाहणी त्यांनी केली, त्या वेळी त्या बोलत होत्या. पद्मावती धारा येथील पदाधिकाऱ्यांशीही स्वच्छतेविषयी सखोल चर्चा केली. पद्मावती धाराचे अध्यक्ष मिलिंद पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक लालगुणकर, मंदार भागवत, सचिन कणसे, उपाध्यक्ष योगेश कुलकर्णी, खजिनदार राहुल गोरे, मनोहर पाटील, सचिव उत्कर्ष कवाडिकर, कुलदीप सिंग इत्यादी सभासदांनी सहभाग घेतला.यावेळी परिसरातील विविध समस्यांचा आढावा घेण्यात आला. या चर्चेमध्ये परिसरात नियमित पाणीपुरवठा, कचऱ्याचे विभाजन व वर्गीकरण, वाहतूककोंडी, अनधिकृत फलक व इतर विषय हताळण्यात आले. नगरसेवक तुषार कामठे यांनी पाणीगळती थांबविण्याचे काम महापालिकेने हाती घेण्यात आल्याचे सांगितले. तसेच प्रभागातील नविन उपक्रम व योजना यांची माहिती नागरिकांना दिली. अध्यक्ष मिलिंद पाटील म्हणाले, की परिसर स्वच्छ राखण्याकरिता जनजागृती करणे आवश्यक आहे. स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. तसेच चांगल्या आणि निरोगी आयुष्याकरीता केवळ घराची स्वच्छता पाळून चालणार नाही, तर आपण जेथे वास्तव्य करतो तो संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवणे ही काळाची गरज आहे, असे नमूद केले. वाकड येथील कल्पतरू चौक, वाकड-हिंजवडी रस्त्याचा काही भाग व पद्मावती धारा येथे उत्स्फूर्तपणे लोकसहभागातून स्वच्छता अभियान नियमित राबविण्यात येतो. हा उपक्रम दर महिन्याच्या पहिल्या रविवारी राबविण्याचा संकल्प सर्व सभासदांनी केला आहे, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक लालगुणकर यांनी जाहीर केले. पालिकेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी स्पर्धांमध्ये पद्मावती धारा येथील सभासदांचा भाग घेण्याचा मानस आहे. त्याकरीता अशोक लालगुणकर यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटीमध्ये एक समिती घटित करून व अंजली भागवत यांच्या मार्गदर्शनाने व नगरसेवक तुषार कामठे यांच्या मदतीने पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे अध्यक्ष मिलिंद पाटील व खजिनदार राहुल गोरे यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड