शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

विरार पूर्वेतील टपाल कार्यालय बंद

By सचिन धर्मापुरीकर | Updated: March 9, 2018 06:41 IST

- शशी करपवसई : विरार पूर्वेतील टपाल कार्यालय बंद करून पश्चिमेच्या कार्यालयातून कामकाज उरकले जात असल्याने अडीच लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या विरारकरांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे.या शहरात पूर्व आणि पश्चिमेला दोन टपाल कार्यालये होती. मात्र, इमारत मोडकळीस आल्याने पूर्वेकडील कार्यालय २०१३ साली पश्चिमेच्या कार्यालयात तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरीत करण्यात आले ...

- शशी करपवसई : विरार पूर्वेतील टपाल कार्यालय बंद करून पश्चिमेच्या कार्यालयातून कामकाज उरकले जात असल्याने अडीच लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या विरारकरांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे.या शहरात पूर्व आणि पश्चिमेला दोन टपाल कार्यालये होती. मात्र, इमारत मोडकळीस आल्याने पूर्वेकडील कार्यालय २०१३ साली पश्चिमेच्या कार्यालयात तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरीत करण्यात आले होते. त्या कार्यालयाचा कार्यभार अद्यापही पश्चिमेकडील कार्यालयातून केला जात आहे. पश्चिमेचे कार्यालय आधीच अपुºया जागेत होते. त्यातील पोस्टमास्तरांच्या लहानशा खोलीतूनच पूर्वेकडील कार्यालयाचे कामकाज रेटले जाते आहे. अवघ्या दोनशे फूटाच्या खोलीत कर्मचारी कसाबसा कार्यभार पार पाडीत आहेत. पूर्वेच्या कार्यालयासाठी एका पोस्टमास्तरसह एक कायमस्वरुपी पोस्टमन, ८ कंत्राटी पोस्टमन, एक मदतनीस काम करीत आहेत.वाढत्या लोकसंख्येमुळे पूर्वेकडील पोस्ट कार्यालयावरचा भारही वाढला आहे. टपाल, स्पीड पोस्ट, पोस्ट बचत खाते, तिकीटे खरेदी, आरटीओची कागदपत्रे, आधार कार्ड अशा कामांचा प्रचंड ताण आहे. त्यासाठी कर्मचारीही अपुरे आहेत. त्याहीपेक्षा याठिकाणची जागा अपुरी असल्याने कार्यालयात कायम गर्दी असते. त्यात कोणत्याही सुविधा नसल्याने कर्मचारी आणि ग्राहकांची गैरसोय होते आहे. पूर्वेकडील कार्यालय बंद करण्यात आल्याने लोकांना पाच-पाच किलोमीटर वरून पश्चिमेकडे यावे लागत आहे. त्यातच अपुरे कर्मचारी आणि जागा यामुळे ताण वाढून कामकाज विस्कळीत झाले आहे. पूर्वेकडील कार्यालय सुरु व्हावे यासाठी मुंबई हायकोर्टात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार