शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

समाजकारणासाठी राजकारण करावे - सुरेश माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 01:10 IST

केवळ राजकारण नाही, तर राजकारणाचा समाजकारणासाठी हत्यार म्हणून वापर कसा करता येईल, या उद्देशाने बहुजन सोशलिस्ट रिपब्लिकन पक्ष काम करीत आहे.

पिंपरी  - केवळ राजकारण नाही, तर राजकारणाचा समाजकारणासाठी हत्यार म्हणून वापर कसा करता येईल, या उद्देशाने बहुजन सोशलिस्ट रिपब्लिकन पक्ष काम करीत आहे. सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षण व्हावे, या भूमिकेतून काम करत असताना, राज्यघटनेच्या विरोधात काम करणाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे, असे मत सोशलिस्ट रिपब्लिकन पक्षाचे (बीआरएसपी) नेते डॉ. सुरेश माने यांनी व्यक्त केले.पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील मैदानावर बहुजन सोशलिस्ट रिपब्लिकन पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर शाखेच्या वतीने जाहीर सभा घेण्यात आली.या कार्यक्रमप्रसंगी बीआरएसपीचे प्रदेश महासचिव सर्वजीत बनसोडे, मावळ लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष संजीवन कांबळे, मिलिंद अहिरे, सदस्या अनिता साळवे यांनीही मनोगत व्यक्त केले. संयोजनासाठी ईश्वर कांबळे, विजय ओव्हाळ, महेंद्र सरोदे, कचरू ओव्हाळ, अरविंद सावंत, तसेच अनिता सोनकांबळे, नम्रता तोरणे, राजश्री भालेराव, कुट्टी यांनी विशेष परिश्रम घेतले.केंद्रीय अर्थसंकल्प नुकताच जाहीर झाला. या अर्थसंकल्पाचे भाषण करताना, अर्थमंत्री अर्थसंकल्पातील तरतुदींवर बोलण्यापेक्षा आरक्षणावरच अधिक बोलत होते. भाजपा सरकार हे जनतेची दिशाभूल करणारे सरकार आहे. भाजपा सरकार आरक्षणाच्या घोषणा करीत आहे. प्रत्येकाला घर मिळणार, गोरगरीब जनतेतील प्रत्येकाच्या बँक खात्यावर १५ लाख रुपये अनुदान जमा करणार, दर वर्षी सुमारे दोन कोटी तरुणांना रोजगार देणार अशा घोषणा केल्या होत्या. नागरिकांना अनेक आश्वासने दिली. परंतु त्यांची पूर्तता केली नाही. नागरिकांची दिशाभूल केली. अशा सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. हे बीआरएसपीच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.- डॉ. सुरेश माने, बीआरएसपी नेते 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड