शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पाटील उरले फक्त नावापुरते

By admin | Updated: May 10, 2017 04:02 IST

पोलीस व नागरिकांमधील दुवा असलेल्या पोलीस पाटील व तंटामुक्ती समिती अध्यक्षांकडून अपेक्षित जबाबदारी पार पाडली जात नाही

लोकमत न्यूज नेटवर्कउर्से : पोलीस व नागरिकांमधील दुवा असलेल्या पोलीस पाटील व तंटामुक्ती समिती अध्यक्षांकडून अपेक्षित जबाबदारी पार पाडली जात नाही. ही पदे निर्माण करण्याचा शासनाचा हेतूच सफल होत नाही. त्याचबरोबर नागरिकांच्या विश्वासालाही तडा जात आहे. या दोन्ही पदांकडून अपेक्षाभंग होत असल्यामुळे नागरिकांकडून न्यायासाठी प्रथम न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचे प्रमाण वाढले आहे.अलीकडे पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्षांची ग्रामस्थांपेक्षा स्थानिक पोलिसांशी जवळीक वाढत असल्याचे दिसत आहे. पूर्वी गावकीच्या राजकारणामध्ये पोलीस पाटलाचा मान मोठा असायचा. आता तशी स्थिती नसली, तरी पाटीलकीसाठी मोठी रस्सीखेच होते. पोलीस पाटील हे खूप वर्षांपासून चालत आलेले पद. पूर्वी पाटलाचा गावात दरारा असायचा. पोलिसांसारखी त्यांच्याबाबत ग्रामस्थांच्या मनात भीती असायची. ते न्यायबुद्धीने गावातील तंट्यांचा निवाडा करीत असल्याने अनेक तंटे गावातच मिटत. कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी ते घेत असल्याने त्यांच्या न्यायनिवाड्यावर कोणी आक्षेप घेत नसत. त्यांचा शब्द गावात अंतिम मानला जात असल्याने गावातील भांडणे त्यांच्या मदतीने सहज मिटली जायची. पोलीस पाटील हे पद पूर्वी घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचा प्रकार होता. आजही त्यात फारसा फरक पडला आहे असे म्हणता येणार नाही. वास्तविक बदलत्या काळात पोलिस पाटलांवर अधिक जबाबदाऱ्या आल्या आहेत. गावात बंदोबस्त ठेवणे, वरिष्ठांच्या कामात साहाय्य करणे, गावातील माहिती ठेवणे आदीसोबतच त्याच्या कामाच्या कक्षा वाढून शांतता व सुव्यवस्था यासोबत सामाजिक सुरक्षितता प्रस्थापित करताना दुर्बल घटकाप्रति न्यायाचा प्रवाह वळविण्याची जबाबदारी पोलीस पाटलावर असते. कालांतराने माणसे बदलत गेली. गावातील वातावरण बदलले. शिक्षणाचा फायदा लोकांना होत गेल्याने लोकांना कायदा व त्याचे महत्त्व समजू लागले.काळाबरोबरच पोलीस पाटीलही बदलत गेला.गावातील काही तंट्यामध्ये पोलीस पाटलाची भूमिका समतोल नसल्याने ग्रामस्थ पोलिसांकडे, कोर्टात जाऊ लागले. सध्या तालुक्यातील पोलीस पाटील व तंटामुक्त अध्यक्ष यांच्यात दुरावा वाढला आहे. अलीकडे पोलीस पाटील व तंटामुक्त अध्यक्ष यांची पोलिसांशी जवळीक आणि ग्रामस्थांशी दुरावा वाढल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. अर्थात चांगले काम करणारे पोलीस पाटील व तंटामुक्त अध्यक्षही आहेत. मात्र, कारण नसताना हस्तक्षेप करणे, लक्ष देणे, एकाच्या बाजूने बोलणे, काही बाबतीत माहिती न देण्याचे प्रकार घडत आहेत.