शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

पोलीस पाटील उरले फक्त नावापुरते

By admin | Updated: May 10, 2017 04:02 IST

पोलीस व नागरिकांमधील दुवा असलेल्या पोलीस पाटील व तंटामुक्ती समिती अध्यक्षांकडून अपेक्षित जबाबदारी पार पाडली जात नाही

लोकमत न्यूज नेटवर्कउर्से : पोलीस व नागरिकांमधील दुवा असलेल्या पोलीस पाटील व तंटामुक्ती समिती अध्यक्षांकडून अपेक्षित जबाबदारी पार पाडली जात नाही. ही पदे निर्माण करण्याचा शासनाचा हेतूच सफल होत नाही. त्याचबरोबर नागरिकांच्या विश्वासालाही तडा जात आहे. या दोन्ही पदांकडून अपेक्षाभंग होत असल्यामुळे नागरिकांकडून न्यायासाठी प्रथम न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचे प्रमाण वाढले आहे.अलीकडे पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्षांची ग्रामस्थांपेक्षा स्थानिक पोलिसांशी जवळीक वाढत असल्याचे दिसत आहे. पूर्वी गावकीच्या राजकारणामध्ये पोलीस पाटलाचा मान मोठा असायचा. आता तशी स्थिती नसली, तरी पाटीलकीसाठी मोठी रस्सीखेच होते. पोलीस पाटील हे खूप वर्षांपासून चालत आलेले पद. पूर्वी पाटलाचा गावात दरारा असायचा. पोलिसांसारखी त्यांच्याबाबत ग्रामस्थांच्या मनात भीती असायची. ते न्यायबुद्धीने गावातील तंट्यांचा निवाडा करीत असल्याने अनेक तंटे गावातच मिटत. कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी ते घेत असल्याने त्यांच्या न्यायनिवाड्यावर कोणी आक्षेप घेत नसत. त्यांचा शब्द गावात अंतिम मानला जात असल्याने गावातील भांडणे त्यांच्या मदतीने सहज मिटली जायची. पोलीस पाटील हे पद पूर्वी घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचा प्रकार होता. आजही त्यात फारसा फरक पडला आहे असे म्हणता येणार नाही. वास्तविक बदलत्या काळात पोलिस पाटलांवर अधिक जबाबदाऱ्या आल्या आहेत. गावात बंदोबस्त ठेवणे, वरिष्ठांच्या कामात साहाय्य करणे, गावातील माहिती ठेवणे आदीसोबतच त्याच्या कामाच्या कक्षा वाढून शांतता व सुव्यवस्था यासोबत सामाजिक सुरक्षितता प्रस्थापित करताना दुर्बल घटकाप्रति न्यायाचा प्रवाह वळविण्याची जबाबदारी पोलीस पाटलावर असते. कालांतराने माणसे बदलत गेली. गावातील वातावरण बदलले. शिक्षणाचा फायदा लोकांना होत गेल्याने लोकांना कायदा व त्याचे महत्त्व समजू लागले.काळाबरोबरच पोलीस पाटीलही बदलत गेला.गावातील काही तंट्यामध्ये पोलीस पाटलाची भूमिका समतोल नसल्याने ग्रामस्थ पोलिसांकडे, कोर्टात जाऊ लागले. सध्या तालुक्यातील पोलीस पाटील व तंटामुक्त अध्यक्ष यांच्यात दुरावा वाढला आहे. अलीकडे पोलीस पाटील व तंटामुक्त अध्यक्ष यांची पोलिसांशी जवळीक आणि ग्रामस्थांशी दुरावा वाढल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. अर्थात चांगले काम करणारे पोलीस पाटील व तंटामुक्त अध्यक्षही आहेत. मात्र, कारण नसताना हस्तक्षेप करणे, लक्ष देणे, एकाच्या बाजूने बोलणे, काही बाबतीत माहिती न देण्याचे प्रकार घडत आहेत.