शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पोलीस पाटील उरले फक्त नावापुरते

By admin | Updated: May 10, 2017 04:02 IST

पोलीस व नागरिकांमधील दुवा असलेल्या पोलीस पाटील व तंटामुक्ती समिती अध्यक्षांकडून अपेक्षित जबाबदारी पार पाडली जात नाही

लोकमत न्यूज नेटवर्कउर्से : पोलीस व नागरिकांमधील दुवा असलेल्या पोलीस पाटील व तंटामुक्ती समिती अध्यक्षांकडून अपेक्षित जबाबदारी पार पाडली जात नाही. ही पदे निर्माण करण्याचा शासनाचा हेतूच सफल होत नाही. त्याचबरोबर नागरिकांच्या विश्वासालाही तडा जात आहे. या दोन्ही पदांकडून अपेक्षाभंग होत असल्यामुळे नागरिकांकडून न्यायासाठी प्रथम न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचे प्रमाण वाढले आहे.अलीकडे पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्षांची ग्रामस्थांपेक्षा स्थानिक पोलिसांशी जवळीक वाढत असल्याचे दिसत आहे. पूर्वी गावकीच्या राजकारणामध्ये पोलीस पाटलाचा मान मोठा असायचा. आता तशी स्थिती नसली, तरी पाटीलकीसाठी मोठी रस्सीखेच होते. पोलीस पाटील हे खूप वर्षांपासून चालत आलेले पद. पूर्वी पाटलाचा गावात दरारा असायचा. पोलिसांसारखी त्यांच्याबाबत ग्रामस्थांच्या मनात भीती असायची. ते न्यायबुद्धीने गावातील तंट्यांचा निवाडा करीत असल्याने अनेक तंटे गावातच मिटत. कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी ते घेत असल्याने त्यांच्या न्यायनिवाड्यावर कोणी आक्षेप घेत नसत. त्यांचा शब्द गावात अंतिम मानला जात असल्याने गावातील भांडणे त्यांच्या मदतीने सहज मिटली जायची. पोलीस पाटील हे पद पूर्वी घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचा प्रकार होता. आजही त्यात फारसा फरक पडला आहे असे म्हणता येणार नाही. वास्तविक बदलत्या काळात पोलिस पाटलांवर अधिक जबाबदाऱ्या आल्या आहेत. गावात बंदोबस्त ठेवणे, वरिष्ठांच्या कामात साहाय्य करणे, गावातील माहिती ठेवणे आदीसोबतच त्याच्या कामाच्या कक्षा वाढून शांतता व सुव्यवस्था यासोबत सामाजिक सुरक्षितता प्रस्थापित करताना दुर्बल घटकाप्रति न्यायाचा प्रवाह वळविण्याची जबाबदारी पोलीस पाटलावर असते. कालांतराने माणसे बदलत गेली. गावातील वातावरण बदलले. शिक्षणाचा फायदा लोकांना होत गेल्याने लोकांना कायदा व त्याचे महत्त्व समजू लागले.काळाबरोबरच पोलीस पाटीलही बदलत गेला.गावातील काही तंट्यामध्ये पोलीस पाटलाची भूमिका समतोल नसल्याने ग्रामस्थ पोलिसांकडे, कोर्टात जाऊ लागले. सध्या तालुक्यातील पोलीस पाटील व तंटामुक्त अध्यक्ष यांच्यात दुरावा वाढला आहे. अलीकडे पोलीस पाटील व तंटामुक्त अध्यक्ष यांची पोलिसांशी जवळीक आणि ग्रामस्थांशी दुरावा वाढल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. अर्थात चांगले काम करणारे पोलीस पाटील व तंटामुक्त अध्यक्षही आहेत. मात्र, कारण नसताना हस्तक्षेप करणे, लक्ष देणे, एकाच्या बाजूने बोलणे, काही बाबतीत माहिती न देण्याचे प्रकार घडत आहेत.