शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! तुफान गर्दी, प्रचंड उत्साह, वरळी डोममध्ये काय घडतंय?
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
4
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
5
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
6
"मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
7
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
8
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
9
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला भक्तिरंगात न्हाऊन निघा; प्रियजनांना पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!
10
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
11
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
12
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
13
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
14
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
15
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
16
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
17
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
18
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
19
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
20
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!

पिंपरी महापालिका प्रशासन करतेय सल्लागार पोसण्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 13:48 IST

मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने सल्लागार नियुक्त करावे लागत आहेत, असे उत्तर प्रशासनाने दिले आहे.

ठळक मुद्दे सल्लागारांवर होणारी उधळपट्टी थांबवायला हवी़सल्लागार नियुक्तीच्या नावाखाली लूट कामांना गती मिळावी, यासाठी सल्लागार घेणे आवश्यक

पिंपरी : महापालिकेतील विविध प्रकल्पांसाठी सल्लागार नियुक्त करण्याचे प्रमाण वाढत आहे, याचे पडसाद महापालिकेच्या स्थायी समितीत उमटले. प्रशासन सल्लागार पोसण्याचे काम करीत आहे, अशी टीका विरोधीपक्षांनी केली असून, मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने सल्लागार नियुक्त करावे लागत आहेत, असे उत्तर प्रशासनाने दिले आहे.स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. सल्लागार नियुक्तीच्या विषयावरून जोरदार चर्चा झाली. शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे म्हणाले, सल्लागारांवर महापालिका मोठ्या प्रमाणावर खर्च करीत आहे. एकाच प्रकारची कामे असतील तर वेगवेगळे सल्लागार कशासाठी? यासाठी स्वतंत्र विभाग करणे गरजेचे आहे. राष्ट्रवादीचे चे मयूर कलाटे म्हणाले, सल्लागार नियुक्तीच्या नावाखाली लूट होत आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाच संधी देऊन काम करवून घ्यायला हवे. सल्लागार नियुक्तीचे नवीन खूळ बंद करायला हवे.

प्रवीण भालेकर म्हणाले, सत्ताधारी विविध प्रकल्पांसाठी सल्लागार नियुक्त करतात. ही चुकीची बाब आहे. याविषयी धोरण ठरविण्याची गरज आहे. सल्लागार नियुक्तीवरील खर्च टाळण्याची गरज आहे.

गीता मंचरकर म्हणाल्या, महापालिकेच्या वतीने कोणत्याही कामांसाठी सल्लागार नेमले जातात़. सल्लागार नीट काम करतात की नाही याची तपासणी होणे गरजेचे आहे़. सल्लागारांवर होणारी उधळपट्टी थांबवायला हवी़.

अध्यक्ष विलास मडिगेरी म्हणाले, एकाच प्रकारची कामे असतील तर सल्लागारासाठी होणारा खर्च कमी करता येईल. शाळा बांधणीचे काम असेल तर त्यासाठी विविध कामात सल्लागारांसाठी वेगवेगळा खर्च होतो. सल्लागार नियुक्तीपेक्षा एखादा विभाग तयार करून त्यातून काम करता येते का ते पहावे. याविषयी प्रशासनाने भूमिका मांडावी. 

त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, शहराची पाच लाख लोकसंख्या होती. तेव्हापासून असणारे मनुष्यबळ आता आहे. तसेच आपला आकृतिबंधही शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. अभियंत्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे कामांना गती मिळावी, यासाठी सल्लागार घेणे आवश्यक आहे. आकृतिबंध मंजूर झाल्यानंतर मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर सल्लागार नियुक्त करण्याची गरज भासणार नाही.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड