शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
3
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
4
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
5
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
6
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
7
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
8
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
9
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
10
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
11
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
12
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
14
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
15
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
16
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
17
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
18
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
19
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
20
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला

पिंपरी : रुग्णवाहिकेला मिळेना रस्ता; अपूर्ण बीआरटी, मेट्रोच्या कामांची घाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 04:45 IST

शहरातून जुन्या पुणे-मुंबईचा प्रशस्त रस्ता जातो, उड्डाणपूल, ग्रेड सेपे्रटर अशी दळणवळणाची अत्याधुनिक सुविधा अशी शहराची ओळख आहे. मात्र, बीआरटी प्रकल्प वेळेत पूर्ण नाही, त्यातच मेट्रोच्या कामाची घाई केल्याने महामार्गावर निगडी ते दापोडीपर्यंतच्या मार्गावर अडथळ्यांची शर्यत पार करीत वाहनचालकांना मार्ग शोधावा लागतो. त्यात रुग्णांना तातडीने उपचार देण्यासाठी घेऊन जाणा-या रुग्णवाहिकांनाही कोंडीचा फटका बसत आहे.

पिंपरी : शहरातून जुन्या पुणे-मुंबईचा प्रशस्त रस्ता जातो, उड्डाणपूल, ग्रेड सेपे्रटर अशी दळणवळणाची अत्याधुनिक सुविधा अशी शहराची ओळख आहे. मात्र, बीआरटी प्रकल्प वेळेत पूर्ण नाही, त्यातच मेट्रोच्या कामाची घाई केल्याने महामार्गावर निगडी ते दापोडीपर्यंतच्या मार्गावर अडथळ्यांची शर्यत पार करीत वाहनचालकांना मार्ग शोधावा लागतो. त्यात रुग्णांना तातडीने उपचार देण्यासाठी घेऊन जाणा-या रुग्णवाहिकांनाही कोंडीचा फटका बसत आहे.गेल्या दोन वर्षांपासून बीआरटी मार्ग लवकरच खुला होईल, असे आश्वासन पालिका प्रशासनाकडून दिले जात आहे. सांगवी, किवळे, रावेत हे मार्ग अपवाद वगळता बीआरटी मार्ग खुला होऊ शकला नाही. या उलट या बीआरटी मार्गावर नेहमीच नवनवे प्रयोग केले. पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी ते दापोडी हा अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. मात्र याच मार्गावर ठिकठिकाणी अडथळे निर्माण झाले आहेत. बीआरटी मार्ग चिंचवड तसेच आकुर्डी या ठिकाणी खुला केला असल्याचे जाहीर केले आहे. मात्र या मार्गाने काही अंतर पुढे गेल्यास वाहनचालकाला पुन्हा नेहमीच्या रस्त्यावर यावे लागते. पुढे काही अंतरावर अडथळ्याला सामोरे जावे लागणार असा अंदाज बांधून अनेक वाहनचालक खुला करण्यात आलेल्या बीआरटी मार्गाचा वापर करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे बीआरटी मार्ग खुला केला असला तरी तो निरुपयोगी ठरू लागला आहे.मेट्रोचे काम सुरू होण्यास आणखी काही दिवसांचा अवधी आहे़ मात्र आताच जागा अडवून ठेवण्यात आली आहे. बºयाच ठिकाणी मेट्रोच्या कामासाठी बॅरिकेडस उभे केले आहेत. ते बॅरिकेडस नियमितच्या रस्त्यास अडथळा ठरू लागले आहेत. आहे तो रस्ता अरुंद झाल्याने वाहनांना या मार्गावरून जाताना कसरत करावी लागत आहे. वेळ आणि पैसा खर्च होईल असा हा मार्ग बनला असून, वारंवार अपघातही घडू लागले आहेत.महापालिका प्रशासन व महामेट्रोचे अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे.उड्डाणपुलाचे काम अडथळ्याविना-कासारवाडी नाशिक फाटा येथे उद्योजक ज़े आऱ डी़ टाटा उड्डाणपुलाचे काम तीन वर्षांहून अधिक काळ सुरू होते. मात्र हे काम सुरू असताना वाहतुकीस कधीच अडथळा झाला नाही. त्याचबरोबर उड्डाणपुलाच्या कामामुळे कधी अपघातही घडून आला नाही. अपघात आणि वाहतुकीस अडथळा विरहित उड्डाणपुलाचे काम केले. बीआरटी आणि मेट्रोच्या कामामुळे मात्र नागरिक हैराण झाले आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड