शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

पिंपरी : रुग्णवाहिकेला मिळेना रस्ता; अपूर्ण बीआरटी, मेट्रोच्या कामांची घाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 04:45 IST

शहरातून जुन्या पुणे-मुंबईचा प्रशस्त रस्ता जातो, उड्डाणपूल, ग्रेड सेपे्रटर अशी दळणवळणाची अत्याधुनिक सुविधा अशी शहराची ओळख आहे. मात्र, बीआरटी प्रकल्प वेळेत पूर्ण नाही, त्यातच मेट्रोच्या कामाची घाई केल्याने महामार्गावर निगडी ते दापोडीपर्यंतच्या मार्गावर अडथळ्यांची शर्यत पार करीत वाहनचालकांना मार्ग शोधावा लागतो. त्यात रुग्णांना तातडीने उपचार देण्यासाठी घेऊन जाणा-या रुग्णवाहिकांनाही कोंडीचा फटका बसत आहे.

पिंपरी : शहरातून जुन्या पुणे-मुंबईचा प्रशस्त रस्ता जातो, उड्डाणपूल, ग्रेड सेपे्रटर अशी दळणवळणाची अत्याधुनिक सुविधा अशी शहराची ओळख आहे. मात्र, बीआरटी प्रकल्प वेळेत पूर्ण नाही, त्यातच मेट्रोच्या कामाची घाई केल्याने महामार्गावर निगडी ते दापोडीपर्यंतच्या मार्गावर अडथळ्यांची शर्यत पार करीत वाहनचालकांना मार्ग शोधावा लागतो. त्यात रुग्णांना तातडीने उपचार देण्यासाठी घेऊन जाणा-या रुग्णवाहिकांनाही कोंडीचा फटका बसत आहे.गेल्या दोन वर्षांपासून बीआरटी मार्ग लवकरच खुला होईल, असे आश्वासन पालिका प्रशासनाकडून दिले जात आहे. सांगवी, किवळे, रावेत हे मार्ग अपवाद वगळता बीआरटी मार्ग खुला होऊ शकला नाही. या उलट या बीआरटी मार्गावर नेहमीच नवनवे प्रयोग केले. पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी ते दापोडी हा अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. मात्र याच मार्गावर ठिकठिकाणी अडथळे निर्माण झाले आहेत. बीआरटी मार्ग चिंचवड तसेच आकुर्डी या ठिकाणी खुला केला असल्याचे जाहीर केले आहे. मात्र या मार्गाने काही अंतर पुढे गेल्यास वाहनचालकाला पुन्हा नेहमीच्या रस्त्यावर यावे लागते. पुढे काही अंतरावर अडथळ्याला सामोरे जावे लागणार असा अंदाज बांधून अनेक वाहनचालक खुला करण्यात आलेल्या बीआरटी मार्गाचा वापर करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे बीआरटी मार्ग खुला केला असला तरी तो निरुपयोगी ठरू लागला आहे.मेट्रोचे काम सुरू होण्यास आणखी काही दिवसांचा अवधी आहे़ मात्र आताच जागा अडवून ठेवण्यात आली आहे. बºयाच ठिकाणी मेट्रोच्या कामासाठी बॅरिकेडस उभे केले आहेत. ते बॅरिकेडस नियमितच्या रस्त्यास अडथळा ठरू लागले आहेत. आहे तो रस्ता अरुंद झाल्याने वाहनांना या मार्गावरून जाताना कसरत करावी लागत आहे. वेळ आणि पैसा खर्च होईल असा हा मार्ग बनला असून, वारंवार अपघातही घडू लागले आहेत.महापालिका प्रशासन व महामेट्रोचे अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे.उड्डाणपुलाचे काम अडथळ्याविना-कासारवाडी नाशिक फाटा येथे उद्योजक ज़े आऱ डी़ टाटा उड्डाणपुलाचे काम तीन वर्षांहून अधिक काळ सुरू होते. मात्र हे काम सुरू असताना वाहतुकीस कधीच अडथळा झाला नाही. त्याचबरोबर उड्डाणपुलाच्या कामामुळे कधी अपघातही घडून आला नाही. अपघात आणि वाहतुकीस अडथळा विरहित उड्डाणपुलाचे काम केले. बीआरटी आणि मेट्रोच्या कामामुळे मात्र नागरिक हैराण झाले आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड