शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

...अखेर आचारसंहिता संपली, आठशे कोटींच्या विकासकामांचा मार्ग मोकळा

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: November 30, 2024 10:26 IST

राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा १५ ऑक्टोबरला केली होती

पिंपरी : विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या सव्वा महिन्यापासून लागू असलेली आचारसंहिता संपली आहे. त्यामुळे महापालिकेची रखडलेली कामे आता मार्गी लागणार आहेत. महापालिका निवडणुका तोंडावर असल्याने विकासकामांना गती येणार आहे. तब्बल आठशे कोटींची कामे मार्गी लागणार आहेत.राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा १५ ऑक्टोबरला केली होती. त्या दिवसापासून आचारसंहिता लागू केली होती. निवडणुकीची आचारसंहिता २५ नोव्हेंबरला संपुष्टात आली आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाकडून महापालिका प्रशासनास पत्र पाठविण्यात आले आहे.महापालिकेचे आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च आहे. मात्र, यावर्षी मार्च महिन्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली. ती सुमारे अडीच महिने होती. त्यामुळे महापालिकेच्या अंदाजपत्रकातील अनेक विकासकामे होऊ शकली नाहीत. महापालिकेच्या स्थायी समितीने निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पाचशे कोटींहून अधिकच्या कामांना मान्यता दिली होती. त्यापैकी अनेक कामांचे कार्यादेश देण्यास उशीर झाला. आचारसंहिता सुरू झाल्यामुळे ही विकासकामे रखडली होती. आता ती मार्गी लागणार आहेत.चार महिन्यांत निधी खर्ची पडणारलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत सुमारे चार महिने गेले आहेत. या दोन्ही निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात महापालिकेचे कर्मचारी असल्याने अनेक प्रकल्प आणि कामे मागे पडली आहेत. महापालिकेचे नवीन अंदाजपत्रक १ एप्रिलपासून लागू करण्यात येते. या चार महिन्यांत अंदाजपत्रकातील निधी खर्ची पडणार का, अनेक कामासाठी टाकलेला निधी वाया जाणार का, असा सवाल केला जात आहे. त्यामुळे या चार महिन्यांत विकासकामे करण्यासाठी प्रशासनाकडून लगबग सुरू झाली आहे. महापालिका आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना वित्तीय मान्यतेनुसार प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.जनसंवाद सभाही होणार सुरळीतआचारसंहिता काळात शहरातील विकास प्रकल्पांना खीळ बसली. प्रस्तावित विकासकामांच्या निविदा आहे, त्या स्थितीत थांबवून फाइल बंद करून ठेवाव्या लागल्या. अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामकाजात व्यस्त झाल्याने नागरिकांची कामे खोळंबली. नागरिकांचे प्रश्न क्षेत्रीय कार्यालय स्तरावर सोडविण्यासाठी सुरू केलेली जनसंवाद सभादेखील रद्द करण्यात आली. त्या आता सुरळीत सुरू करण्यात येणार आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGovernmentसरकारMuncipal Corporationनगर पालिका