शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

...अखेर आचारसंहिता संपली, आठशे कोटींच्या विकासकामांचा मार्ग मोकळा

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: November 30, 2024 10:26 IST

राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा १५ ऑक्टोबरला केली होती

पिंपरी : विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या सव्वा महिन्यापासून लागू असलेली आचारसंहिता संपली आहे. त्यामुळे महापालिकेची रखडलेली कामे आता मार्गी लागणार आहेत. महापालिका निवडणुका तोंडावर असल्याने विकासकामांना गती येणार आहे. तब्बल आठशे कोटींची कामे मार्गी लागणार आहेत.राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा १५ ऑक्टोबरला केली होती. त्या दिवसापासून आचारसंहिता लागू केली होती. निवडणुकीची आचारसंहिता २५ नोव्हेंबरला संपुष्टात आली आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाकडून महापालिका प्रशासनास पत्र पाठविण्यात आले आहे.महापालिकेचे आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च आहे. मात्र, यावर्षी मार्च महिन्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली. ती सुमारे अडीच महिने होती. त्यामुळे महापालिकेच्या अंदाजपत्रकातील अनेक विकासकामे होऊ शकली नाहीत. महापालिकेच्या स्थायी समितीने निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पाचशे कोटींहून अधिकच्या कामांना मान्यता दिली होती. त्यापैकी अनेक कामांचे कार्यादेश देण्यास उशीर झाला. आचारसंहिता सुरू झाल्यामुळे ही विकासकामे रखडली होती. आता ती मार्गी लागणार आहेत.चार महिन्यांत निधी खर्ची पडणारलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत सुमारे चार महिने गेले आहेत. या दोन्ही निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात महापालिकेचे कर्मचारी असल्याने अनेक प्रकल्प आणि कामे मागे पडली आहेत. महापालिकेचे नवीन अंदाजपत्रक १ एप्रिलपासून लागू करण्यात येते. या चार महिन्यांत अंदाजपत्रकातील निधी खर्ची पडणार का, अनेक कामासाठी टाकलेला निधी वाया जाणार का, असा सवाल केला जात आहे. त्यामुळे या चार महिन्यांत विकासकामे करण्यासाठी प्रशासनाकडून लगबग सुरू झाली आहे. महापालिका आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना वित्तीय मान्यतेनुसार प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.जनसंवाद सभाही होणार सुरळीतआचारसंहिता काळात शहरातील विकास प्रकल्पांना खीळ बसली. प्रस्तावित विकासकामांच्या निविदा आहे, त्या स्थितीत थांबवून फाइल बंद करून ठेवाव्या लागल्या. अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामकाजात व्यस्त झाल्याने नागरिकांची कामे खोळंबली. नागरिकांचे प्रश्न क्षेत्रीय कार्यालय स्तरावर सोडविण्यासाठी सुरू केलेली जनसंवाद सभादेखील रद्द करण्यात आली. त्या आता सुरळीत सुरू करण्यात येणार आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGovernmentसरकारMuncipal Corporationनगर पालिका