शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

पिंपरी-चिंचवड शहर प्रदूषणाच्या विळख्यात, महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 03:29 IST

मोशी : महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष झाल्यामुळे मोशी, कुदळवाडी, चिखली, तळवडे, मोशी परिसरात अनधिकृत भंगार व्यवसाय फोफावला आहे. तिथे जाळल्या जाणा-या कच-यामुळे पिंपरी-चिंचवड शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडण्याच्या मार्गावर आहे. त्याचा नाहक परिणाम सध्या सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, पवित्र इंद्रायणी नदीचे प्रदूषण वाढण्यास देखील कारणीभूत ठरत आहे. याची ...

मोशी : महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष झाल्यामुळे मोशी, कुदळवाडी, चिखली, तळवडे, मोशी परिसरात अनधिकृत भंगार व्यवसाय फोफावला आहे. तिथे जाळल्या जाणा-या कच-यामुळे पिंपरी-चिंचवड शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडण्याच्या मार्गावर आहे. त्याचा नाहक परिणाम सध्या सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, पवित्र इंद्रायणी नदीचे प्रदूषण वाढण्यास देखील कारणीभूत ठरत आहे. याची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.चिखली, कुदळवाडी भागात कचरा आणल्यानंतर लगेचच पेटवला जातो. सर्व परिसर धुराने माखतो. उपयोगात न येणारा कचरा आणि प्लॅस्टिकचे ढिगारे मिळेल तिथे टाकून पेटविले जातात. रात्री केबल जाळून तांबे मिळविले जाते. केबल पेटविल्याने मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होते. लोखंड व वेगवेगळे धातू वितळवल्याने सूक्ष्म कण, धूर व धुळीचे ढग दाटतात. तेलाने माखलेले पिंप रसायनांनी धुतले जातात. त्यामुळे धुराचे लोट पसरत असून त्याचा मोशी, बोºहाडेवाडी ,देहूरस्ता परिसरापर्यंत त्याची तीव्रता जाणवते.रसायनमिश्रित कचºयामुळे कार्बन मोनाक्साईड, सल्फर आॅक्साईड, कार्बन डायआॅक्साईड, नायट्रोजन आॅक्साईड, हायड्रोजन डायआॅक्साईड, सायनाईड असे अतिविषारी वायू हवेत मिसळतात. त्यामुळे घसा व फुफ्फुसाचे आजार होतात. तसेच वर्षभरात कुदळवाडी, चिखली परिसरात किमान १५ ते १७ वेळा मोठी आग लागल्याची नोंद अग्निशामक दलाकडे आहे. अनेकदा दोन-दोन दिवस आग विझवावी लागते. मात्र, अशी आग लागण्याचे नेमके कारण अद्याप अग्निशामक दलाला सापडलेले नाही.मोशी, चिखली परिसरात इंद्रायणी नदीत आजपर्यंत अनेक वेळा मासे मृतावस्थेत आढळले आहेत. त्यामुळे नदी प्रदूषणाकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. याच इंद्रायणी नदीचे पाणी पुढे आळंदीमध्ये भाविक भक्तांकडून पवित्र जल म्हणून प्राशन केले जात आहे. असे असतानाही त्याबाबत कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नसल्याचे चित्र दिसून येत आहे.नगरसेविका सारिका बोºहाडे म्हणाल्या, ‘‘या विषयावर आयुक्त, आमदार यांच्याशी चर्चा केली असून, रसायनमिश्रित पाणी नदीत सोडणाºया कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. पालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी जबाबदारी पार पाडावी.’’महापालिकेकडून नोटीसमहापालिकेने दोन वर्षांपूर्वी कुदळवाडी-मोशी परिसरात सर्वेक्षण केले. पंधराशे पेक्षा अधिक भंगार मालाची गोदामे आढळली. त्यातील ९५ टक्के अनधिकृत आहेत. पालिकेने केवळ नोटीस दिली. दुकानचालक, मालकांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अखत्यारितील विषय असल्याने त्यांनीच नियंत्रण ठेवावे, अशी महापालिकेच्या अधिकाºयांची भूमिका आहे.कारवाई करणे आवश्यकप्रदूषण करणारे उद्योग व कंपन्यांवर कारवाई केली जाते. नोटीस दिली जाते. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत भंगार मालाची गोदामे व इतर दुकानांवर कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेला आहेत. त्यांना वीज, पाणी यासाठी ना हरकत प्रमाणपत्र महापालिकेने देऊ नयेत. भंगार मालासारखे अनधिकृत व्यवसाय थाटण्याचा प्रयत्न झाल्यास लगेच त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. चिखली-मोशी परिसरात सध्या नदीलगत मोठ-मोठ्या कंपन्यांचे जाळे निर्माण झाले आहे. परंतु अशा औद्योगिक कंपन्यांमधून बाहेर निघणारे रसायनमिश्रित पाणी बहुसंख्य कंपन्या थेट इंद्रायणी नदीत सोडतात.

टॅग्स :pollutionप्रदूषणpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड