शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

उद्योगनगरीत ९९ इमारती, वाडे धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 06:44 IST

स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असणाºया पिंपरी-चिंचवड शहरात आजही पुरातन वाडे अस्तित्वात आहेत. मात्र, हे वाडे आता जीर्ण झाले असल्याने महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून असे वाडे आणि धोकादायक इमारतींना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

पिंपरी : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असणाºया पिंपरी-चिंचवड शहरात आजही पुरातन वाडे अस्तित्वात आहेत. मात्र, हे वाडे आता जीर्ण झाले असल्याने महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून असे वाडे आणि धोकादायक इमारतींना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.पावसाळ्यात शहरातील जीर्ण झालेल्या धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असतो. त्यामुळे माहापलिका प्रशासनाच्या स्थापत्य विभागाच्या वतीने अशा इमारतींना नोटिसा बजावण्यात येतात. दरवर्षीप्रमाणे यंदा ९० घर मालकांना नोटिसा बजाविल्या आहेत. तसेच, जी घरे जीर्ण झालेली आहेत, ती लवरात लवकर संबंधित मालकांनी दुरुस्त करून घेण्याचे बजावण्यात आले आहे. गेल्या वर्षी अशा धोकादायक इमारतींची संख्या १२१ इतकी होती. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत अशा इमारतीच्या संख्येत घट झाली आहे.पावसाळा सुरू झाल्यावर पिंपरी-चिंचवड महापालिका स्थापत्य विभागाने पाहणी करून त्या त्या क्षेत्रीय कार्यालयांकडून शहरातील धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा बजाविल्या आहेत. पावसाळ्यात जुन्या इमारतींचा धोका निर्माण होऊन वित्तीय व जीवित हानी होऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना घर मालकांना करण्यात आलेल्या आहेत.तसेच, धोकादायक इमारतींमध्ये राहणाºया नागरिकांना, आसपासच्या परिसरातील रहिवाशांना व या भागातून ये-जा करणाºयांना नागरिकांना कोणतीही इजा पोहोचू नये, यांची दक्षता घ्यावी लागणार आहे. पावसाळा सुरू होण्याअगोदर स्थापत्य विभाग धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करीत असते.यंदाच्या वर्षी केलेल्या सर्व्हेक्षणात शहरातील ९९ इमारती धोकादायक असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. त्या सर्व धोकादायक इमारतींच्या घर मालकांना स्थापत्य विभागाने नोटीस दिल्या आहेत. धोकादायक इमारतींची त्वरित दुरुस्त करून घेण्याची जबाबदारी संबंधित घर मालकांची आहे.तसेच, जर घर मालक इमारत दुरुस्त करणार नसतील, तर भाडेकरूही महापालिकेची परवानगी घेऊन ते धोकादायक इमारतींची दुरुस्ती करून घेता येईल. याबाबत धोकादायक इमारतींच्या दुरुस्तीस तातडीने परवानगी देण्यात येणार आहे. तसेच महापालिका हद्दीतील नागरिकांना धोकादायक इमारत आढळल्यास त्यांनी महापालिका स्थापत्य विभागास लेखी स्वरूपात कळवावे. कोणत्याही इमारतींचा अर्धवट भाग कोसळल्यास नागरिकांनी त्वरित आपत्कालीन विभागास तातडीने कळवावे, असे आवाहन स्थापत्य विभागाने केले आहे.असे असते नोटिसीचे स्वरूपइमारत धोकादायक स्थितीतअसल्याचे निदर्शनासस्थापत्य विभागाच्या वतीने महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटीसनागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सदर इमारतीचा संबंधित भाग दुरुस्त करावाशक्य नसल्यासमहापालिकेला कळवावे.दुरुस्तीचा खर्च पालिकेला दिल्यास पालिका दुरुस्तकरून घेईल.‘‘नागरिकांनी नोटिसांचा गंबीरपणे विचार करावा व इमारतींची दुरुस्ती करावी. संबंधित मालकांना शक्य नसल्यास त्यांनी स्थापत्य विभागास कळवावे. आवश्यक शुल्क जमा करून महापालिकेकडून दुरुस्ती करून दिली जाईल. नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची आहे.- अंबादास चव्हाण, शहर अभियंता, स्थापत्य विभाग