शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

णेश तलावातील शेकडो माशांचा मृत्यू, महापालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 03:23 IST

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील सेक्टर २३ मधील गणेश तलावातील पाण्याची पातळी खाली गेल्याने तसेच दूषित पाणी आल्याने माशांचा मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या भोंगळ कारभाराबद्दल पक्षी आणि प्राणी प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

 पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील सेक्टर २३ मधील गणेश तलावातील पाण्याची पातळी खाली गेल्याने तसेच दूषित पाणी आल्याने माशांचा मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या भोंगळ कारभाराबद्दल पक्षी आणि प्राणी प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक २३ मध्ये आकुर्डीत रेल्वे स्थानकाजवळ गणेश तलाव आहे. या तलावातील गाळ अनेक वर्षे काढला गेलेला नाही. या तलावात चित्रबलाक, खंड्या, वारकरी, बगळे असे विविध पक्षी मोठ्या प्रमाणावर असतात. ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात ‘पक्षांची शाळा भरली’ असे वृत्त प्रकाशित केले होते.पाण्याची पातळी कमी झाल्याने या तलावात चित्रबलाक आले होते. जलचरांचा जीव धोक्यात आणि जल आणि पक्षी, प्राणी वैभव वाचविण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, या प्रश्नाकडे ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते. त्यानंतर उपमहापौर शैलजा मोरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. गाळ तातडीने काढावा, जलचरांचे संवर्धन करावे, अशी मागणी केली आहे. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उद्यान विभागास तातडीने कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, दूषित पाण्यामुळे तलावातील अनेक मासे मृत्युमुखी पडले आहेत. सकाळी आठच्या सुमारास अनेक मासे पाण्यावर तरंगत होते. ते खाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पक्षी एकत्रित झाले होते. गुरुवारी सकाळी तलावातील पाणी दूषित, गढूळ झाल्याचे दिसून आले.माशांचा मृत्यू होण्यास कोण जबाबदार आहे, याची तपासणी करावी, अशी मागणी पक्षीमित्र संघटनांनी केली आहे.गणेश तलावांच्या गाळ काढण्यासाठी उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. गणेश तलावातील पाण्यातून जवळच्या उद्यानांना पाणीपुरवठा होतो. संबंधित उद्यानांचा पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था केली आहे. त्यामुळे लवकरच गाळ काढण्यात येईल.- श्रावण हर्डीकर, आयुक्तदूषित पाण्यासाठी जबाबदार कोण?गणेश तलावातील गाळ काढण्यासंदर्भात उपमहापौर शैलजा मोरे यांनी महिनाभरापूर्वीच पत्र दिले होते. त्यानंतर माजी उपमहापौर राजू मिसाळ, स्थायी समिती सदस्य अमित गावडे यांनीही पत्रव्यवहार केला आहे. तसेच नगरसेविका शर्मिला बाबर यांनीही मागणी केली आहे. मात्र, महिनाभरानंतरही पत्रव्यवहारावर कार्यवाही झालेली नाही. गणेश तलावातील अनेक माशांचा मृत्यू झाल्याचे गुरुवारी सकाळी दिसून आले. त्यामुळे आज नेहमीपेक्षा पक्ष्यांची संख्याही अधिक असल्याचे दिसून आले. या तलावात सांडपाणीही मोठ्या प्रमाणात येत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या