शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

णेश तलावातील शेकडो माशांचा मृत्यू, महापालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 03:23 IST

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील सेक्टर २३ मधील गणेश तलावातील पाण्याची पातळी खाली गेल्याने तसेच दूषित पाणी आल्याने माशांचा मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या भोंगळ कारभाराबद्दल पक्षी आणि प्राणी प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

 पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील सेक्टर २३ मधील गणेश तलावातील पाण्याची पातळी खाली गेल्याने तसेच दूषित पाणी आल्याने माशांचा मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या भोंगळ कारभाराबद्दल पक्षी आणि प्राणी प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक २३ मध्ये आकुर्डीत रेल्वे स्थानकाजवळ गणेश तलाव आहे. या तलावातील गाळ अनेक वर्षे काढला गेलेला नाही. या तलावात चित्रबलाक, खंड्या, वारकरी, बगळे असे विविध पक्षी मोठ्या प्रमाणावर असतात. ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात ‘पक्षांची शाळा भरली’ असे वृत्त प्रकाशित केले होते.पाण्याची पातळी कमी झाल्याने या तलावात चित्रबलाक आले होते. जलचरांचा जीव धोक्यात आणि जल आणि पक्षी, प्राणी वैभव वाचविण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, या प्रश्नाकडे ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते. त्यानंतर उपमहापौर शैलजा मोरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. गाळ तातडीने काढावा, जलचरांचे संवर्धन करावे, अशी मागणी केली आहे. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उद्यान विभागास तातडीने कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, दूषित पाण्यामुळे तलावातील अनेक मासे मृत्युमुखी पडले आहेत. सकाळी आठच्या सुमारास अनेक मासे पाण्यावर तरंगत होते. ते खाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पक्षी एकत्रित झाले होते. गुरुवारी सकाळी तलावातील पाणी दूषित, गढूळ झाल्याचे दिसून आले.माशांचा मृत्यू होण्यास कोण जबाबदार आहे, याची तपासणी करावी, अशी मागणी पक्षीमित्र संघटनांनी केली आहे.गणेश तलावांच्या गाळ काढण्यासाठी उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. गणेश तलावातील पाण्यातून जवळच्या उद्यानांना पाणीपुरवठा होतो. संबंधित उद्यानांचा पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था केली आहे. त्यामुळे लवकरच गाळ काढण्यात येईल.- श्रावण हर्डीकर, आयुक्तदूषित पाण्यासाठी जबाबदार कोण?गणेश तलावातील गाळ काढण्यासंदर्भात उपमहापौर शैलजा मोरे यांनी महिनाभरापूर्वीच पत्र दिले होते. त्यानंतर माजी उपमहापौर राजू मिसाळ, स्थायी समिती सदस्य अमित गावडे यांनीही पत्रव्यवहार केला आहे. तसेच नगरसेविका शर्मिला बाबर यांनीही मागणी केली आहे. मात्र, महिनाभरानंतरही पत्रव्यवहारावर कार्यवाही झालेली नाही. गणेश तलावातील अनेक माशांचा मृत्यू झाल्याचे गुरुवारी सकाळी दिसून आले. त्यामुळे आज नेहमीपेक्षा पक्ष्यांची संख्याही अधिक असल्याचे दिसून आले. या तलावात सांडपाणीही मोठ्या प्रमाणात येत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या